Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३२

भोग आणि ईश्वर  ३३२

मनाचा थकवा घालवण्यासाठी आपण काल एक प्रयोग पाहिला. याचा अभ्यास केल्यास हे जाणवेल की मनाला, विशेषतः चंचल मनाला, शांत करण्यापेक्षा, हा उपाय जास्त श्रेयस्कर वाटतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, मन हे सतत विचार करत असल्याने, विचारातील बदल हे मनासाठी, एक उत्तम शक्ति वर्धक खाद्य आणि उपचार, असं दोन्ही आहे. 

हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला जाणवेल की, मन हे शांत बसवून वा स्थिर ठेवून, विश्रांती साधण्यापेक्षा विचारात, सकारात्मकता आणि सशक्तपणा आणून, एखादा उपयुक्त विचार करून, काही काळासाठी मनाला रोजच्या त्रासदायक विचारातून बाहेर काढता येतं. फक्त यामध्ये एकच काळजी घ्यायची की, असा केला जाणारा विचार हा सकारात्मक व सुदृढ असावा.  म्हणजेच त्याद्वारे एखादा चुकीचा विचार केल्यास, होणारी हानी मूळ थकवा वा नैराश्य, यापेक्षा जास्त घातक असता कामा नये. 

म्हणूनच असा जाणीवपूर्वक एखादा चांगला विचार मनात धरून, मनाला त्यात गुंतवून, नैराश्य वा थकवा घालवण्यासाठी केलेला प्रयत्न, नक्कीच यशस्वी होतो. म्हणूनच यासाठी गत आयुष्यातील सुखाचा किंवा आल्हाददायक प्रसंग वा असा काळ, यांच्या आठवणी जाग्या कराव्यात. किंवा एखादं उत्तम गीत, संगीत इत्यादी माध्यमातून आपण मनाला विचारप्रवृत्त करून,  झालेला थकवा घालवून, पुन्हा मूळ ऊर्जा आणि बल प्राप्त करून घेऊ शकतो. 

यासर्वामागे मनात असलेली शक्तिकेंद्रे, जी अति श्रमाने, अति मानसिक दबावाने व बदललेल्या जीवनशैलीमुळे अति वापरली जाऊन,त्यांची दमणूक होते. मन जरी अति शक्तिमान व अति कार्यक्षम असलं, तरीही एकाच प्रकारच्या कार्यात सतत गुंतून राहिल्यास, त्यातील शक्तिकेंद्रांना अतिदाब ग्रासून, त्यांना अकार्यक्षम करू शकतो. म्हणून अश्या प्रयोगाने, आपण त्या त्या शक्तिकेंद्रांची मूळ कार्यक्षमता पुनः प्राप्त करू शकतो. 

यासाठी फक्त एखादा प्रसन्न करणारा, आल्हाददायक विचार किंवा गीत संगीत तर  उपयोगात येतच. पण यासाठी आपण आपली साधना किंवा नामस्मरण किंवा आपल्या आराध्याची प्रतिमा वा सद्गुरूंचं चित्र डोळ्यासमोर आणून, त्यावर मनाला वा मनातील विचारांना स्थिर करून, त्यावर मनातील अतिश्रम व अतिसंवेदनशीलता यांना मूळ बलाकडे पुनः नेऊ शकतो.  यासाठी आपण एक जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो. 

या प्रयोगाला स्थळ,काळ, स्थिती यांचं काहीही बंधन नसल्या मुळे हा प्रयोग, आपण दिवसा रात्री पहाटे केंव्हाही करू शकतो. पण यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं असा प्रयोग करून, मग झोपी गेल्यास, सकाळी उठताना, आपल्याला ताजेतवाने, प्रसन्न वाटेल. यासाठी रोज रात्री झोपताना, आपल्या आवडीचं एखादं छानसं गाणं, धून, संगीत, ओम सारखा एखादा जाप, आपलं नाम किंवा सद्गुरू अथवा आपलं आराध्य यांची प्रतिमा डोळ्यासमोर आणून, हा अभ्यास नित्य करून बघा. 

आपल्याला मनाची मरगळ,नैराश्य व नकारात्मकता यातून, नित्य सुटका मिळेल. प्रतिरात्री शक्य नसेल तर, आठवड्यातून एक दोन वेळा तरी हा प्रयोग करून, मनाला आवश्यक असलेली, विश्रांती, या माध्यमातून मिळवून देऊ शकता. एक लक्षात घ्या, आपण आपल्या सर्वात जवळच्या जिवलग मित्राची, म्हणजेच मनाची, जितकी काळजी घेऊ, तितकंच ते आपल्याला सहाय्यभूत व हितकारी ठरेल. 

उद्या आपण अजून एका विषयावर चिंतन करूया. पण तोपर्यंत नामातून आपलं हित साधण्याचा प्रयत्न करत राहूया. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...