Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१३

भोग आणि ईश्वर  ३१३

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

कालचाच विषय पुढे नेऊ. मुळात सर्वत्र चैतन्य भरून राहिलेलं असताना, एखाद्या मूर्तीत वेगळं चैतन्य, आवाहन करून बोलवावं का लागतं. त्यासाठी आपण एखाद्या विजेच्या उपकरणाकडे बघूया. वीज वायरमध्ये आहे आणि बटन लावताच ती उपकरणात जाते आणि कार्य सुरू होतं. आता वीज आधीपासूनच वायरमध्ये आहेच, मग बटन वेगळं का दाबावं लागतं. तर त्या विजेला त्या उपकरणात जाऊन, उपकरण सुरू करण्या साठी ती एक आवश्यक प्रक्रिया आहे. 

पण प्रत्येक उपकरणाची विजेची गरज वेगवेगळी असते, हे तर सर्वश्रुत आहे आणि त्याचं नियंत्रण विशिष्ट पद्धतीने प्लगमधून किंवा वेगळी जोडणी देऊन केलेलं असतं. म्हणजेच त्या त्या उपकरणाप्रमाणे, विजेचा दाब नियंत्रित केला जातो. अगदी हेच तत्व प्रत्येक देवतेसाठीच्या मंत्रोच्चारात आहे. प्रत्येक देवता ही, विशिष्ट कार्यासाठी असणाऱ्या उपकरणांप्रमाणे आहे. प्रत्येक देवतेचं कार्य, त्यासाठी लागणारी ऊर्जा व बल आणि त्या शक्तीच्या वापरासाठीची मर्यादा भिन्न भिन्न स्वरूपाची असते. 

म्हणून प्रत्येक देवतारुप वा स्वरूप शक्तीला आवाहन करताना, ते करण्यासाठी केलेलं आवाहन, वेगळ्या मंत्रोच्चारात आहे. तो मंत्रोच्चार म्हणजे त्या देवतेसाठीचं बटन या तत्वात आहे. जसं चुकीच्या उपकरणासाठी चुकीच्या क्षमतेची वीज वापरली तर, एकतर ते उपकरण चालणार नाही, बंद पडेल किंवा अपघात होऊ शकतो. त्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट देवतेच्या मंत्राने दुसऱ्या  देवतेला आवाहन करता येणार नाही, कारण त्या देवतेचं बल अर्थात त्या शक्तीला जागृत करणारं बटन म्हणजे तो मंत्रोच्चार, हा त्या शक्तीसाठी वेगळा आहे. 

म्हणूनच आपण तत्वतः जरी म्हटलं की, सर्व देव एकच आहेत आणि कुठल्याही देवापुढे जाऊन आपण आवाहन केलं की त्यांच्यापर्यंत ते पोचणार, तरीही त्या देवतेला अर्थात त्या शक्तीला जागृत करण्यारी कळ वा बटन, जर आपण वापरलं नाही तर, त्या देवतेपर्यंत आपलं म्हणणं पोचणार नाही. म्हणजेच आपण योग्य त्या शक्तीपूढे योग्य त्या मंत्राचा उच्चार व घोष केल्यास, त्या शक्तीच्या देवते पर्यंत ती साद, ते आवाहन, तो आवाज पोचेल. सरते शेवटी आपण जे करणार ते त्या शक्तीपर्यंत पोचावं म्हणूनच करतो आहोत. 

आता विशिष्ट शक्तीला वा देवतेला, विशिष्ट मंत्रोच्चार करून, आपण त्या त्या पार्थिवात येण्याचं आवाहन केल्यानंतर,आपल्या आवाहनानुसार त्या त्या पार्थिवात, त्या त्या देवतेचा प्रवेश चैतन्य रूपाने होतो. असा प्रवेश झाल्यानंतर आपण मनाने केलेली पूजा, अर्चना, इत्यादी आपल्या मनातील भावाप्रमाणे त्या त्या देवतेला अथवा त्या पार्थिव मूर्तीतील शक्तीला प्राप्त होतं. देहधारी मानव अथवा प्राणी यांना ज्याप्रमाणे, प्रत्यक्ष अन्नभक्षण करूनच आपलं अस्तित्व टिकवावं लागतं किंवा त्यांच्या जगण्याची ती आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे,  देवतांची पूजा, अर्चना, प्रार्थना व नैवेद्य ग्रहण करण्याची पद्धत वा माध्यम वेगळं आहे. त्यांना मनातील भाव, शुद्ध वातावरणात मिळालेलं, अन्ना तील गन्ध यामुळे प्राप्त होतं. 

मानवी मनातील भाव हे संवेदना, लहरी यास्वरूपात त्यांच्या पर्यंत पोचतं आणि त्यानुसार त्याला प्रतिसाद देण्याची त्याना चेतना उत्पन्न होते. वातावरणातील लहरी, मग त्या भावांच्या असोत की गंधांच्या असोत, त्यांच्या साठी जाणण्याचं किंवा ज्ञानाचं, आपलं म्हणणं व आपण केलेलं आवाहन, प्रार्थना इत्यादी समजून घेण्याचं, तेच माध्यम आहे. त्यामुळे त्यावर त्यांचा प्रतिसाद त्याच स्वरूपात असणार हे उघड आहे. 

यावर अजून विस्तृतपणे चिंतन अपेक्षित व आवश्यक आहे, तरच खोलात जाता येईल. पण तोपर्यंत आपण नित्य उपासनेचा मन्त्रघोष करत राहू, नामस्मरण या रुपात. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...