भोग आणि ईश्वर ३१७
माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.
आवर्तन म्हणजे एखादी गोष्ट, एखादा मंत्र, एखादं स्तोत्र, एकदा संपलं की लगेचच, पुन्हा पुन्हा पठण करणं. पहिल्यांदा म्हणतो त्याला एक आवर्तन आणि पुढे प्रत्येक वेळी म्हणू त्याला दुसरं, तिसरं अशी आवर्तन संख्या जोडली जाते. म्हणजेच जर अकरावेळा म्हटलं तर अकरा आवर्तनं, याच क्रमाने सहस्त्रवेळा म्हटल्यास, सहस्त्रावर्तन म्हटलं जातं.
श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंची सहस्त्र नामं आहेत. म्हणजेच सहस्त्रनाम घेतल्याचं पुण्य व लाभ एकाच अवर्तनात प्राप्त होतं. पण श्रीरामरक्षा स्तोत्राची महती त्याहीपेक्षा जास्त आहे आणि तसा उल्लेख श्रीरामरक्षेत आहेच. "राम रामेती रामेती रमेरामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने" म्हणजे विष्णुसहस्रनामाच्या तुलनेइतकं पुण्य वा लाभ हे, एक रामनाम घेतल्यास प्राप्त होतं आणि हे सांगणारं दुसरं तिसरं कोणी नसून, श्रीबुधकौशिक ऋषींच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भगवान श्रीशंकर यांनीच ही खात्री वा आजच्या भाषेत guarantee व warantee दिली आहे.
अवर्तनात एक नियम आहे वा असतो. प्रत्येक स्तोत्रामध्ये एक श्लोक असतो वा अधिक किंवा वेगळी श्लोकरचना असते. ज्याला फलश्रुती म्हणतात. अशी फलश्रुती असतेच असते, कारण त्याशिवाय कोणत्याही स्तोत्राला संपूर्णता येऊ शकत नाही. अगदी सर्वात छोटं श्रीनारद विरचित श्रीगणपती स्तोत्रातसुद्धा दोन श्लोक फलश्रुतीचे आहेत. फलश्रुती म्हणजे, साधकाला, या स्तोत्राच्या ठराविक, म्हणजे एक दोन इत्यादी अवर्तनात किंवा प्रतिदिन, नित्य म्हटल्यास, काय लाभ होतील, याचा उल्लेख असतो.
श्रीगणपतीअथर्वशीर्षात तर, एक पूर्ण फलश्रुती रचना सुंदरीत्या श्लोकबद्ध करून श्रीगणकऋषींनी, वेगळी जोडलेली आहे. ज्यावेळी आवर्तन केलं जातं, त्यावेळी शेवटच्या अवर्तनाची, फलश्रुतीने, समाप्ती करावी. प्रत्येक स्तोत्राच्या अवर्तनात ही फलश्रुती, सर्व आवर्तन झाल्या नंतर म्हणावी. पण काही स्तोत्रात ती मधेच येऊ शकते, अश्यावेळी फलश्रुतीसह प्रत्येक आवर्तन करावं. स्तोत्र कर्त्याची तशी इच्छा समजावी. कारण स्तोत्रं ही प्रेरणेतून येतात व लिहिली जातात. त्यामुळे त्याची रचना हा ईश्वरी हेतू वा संकेत असतो. म्हणून अवर्तनांती फलश्रुती असं सामान्यपणे म्हणण्याची प्रथा व प्रघात आहे.
फलश्रुती हा प्रलोभनाचा भाग नसून, त्यातून, त्या विशिष्ट स्तोत्र
पठणासाठी लागणारी अवर्तनसंख्या सांगणं, हाच उद्देश असतो. किंवा साधकाला, त्या स्तोत्राच्या देवतेला प्राप्त वा प्रसन्न करून घेण्याची, किल्ली वा कळ समजावी. जसं, काल पाहिल्याप्रमाणे ते कुलूप उघडायला, किती वेळा चावी फिरवावी, ते सांगितलं आहे. मुळात प्रत्येक स्तोत्राचा उद्देश, त्या इष्ट शक्तीला, साद घालून, त्या शक्तीच्या ऊर्जा व बल, यांचा लाभ प्राप्त करून, आत्मोन्नती व आत्मउद्धार साधला जावा, हा असतो.
म्हणून नुसतं एकवेळ म्हटल्याने फार काही साधत नसेल, तरीही प्रतिदिन म्हणत गेल्यास, दिवसाचं एक याप्रमाणे जितके दिवस म्हणू, तितकी आवर्तनं नक्की होतील. कारण कोणतंही कर्म,सत् वा दूष, हे कधीही वाया जात नाही.लाभ व हानी हा नंतरचा भाग, पण कर्म आपलं फल दिल्याशिवाय शांत होणार नाही.
त्यातूनही लाभ वा हानी याचा विचार न करता, सद्गुरु चरणी वा ईश्वरचरणी अर्पण, या निरिच्छ भावाने पठण केल्यास, त्याचा कधी पुढे लाभ होईल, ईश्वर जाणे. पण अश्या निरिच्छ भावाने केल्यास, एकमात्र नक्की होईल, ते म्हणजे,योग्यवेळी तोच ईश्वर वा सद्गुरू, त्याची परत फेड वा परतावा नक्की प्राप्त करून देईल. कारण ईश्वर कधीही, त्याला अर्पण भावनेने किंवा निरिच्छ भावनेने सादर वा समर्पित केलेली कोणतीही गोष्ट वा सेवा यांचा, परतावा दिल्याशिवाय रहात नाही.
ईश्वर कधीही स्वतःकडे काहीही ठेवत नाही, हे नक्की. तू कर्म कर, पण फलाची अपेक्षा ठेवू नकोस, याचा वास्तविक अर्थ हा आहे की, त्या कर्माच्या फलाचा परतावा, तुला, त्याची जेंव्हा जास्त गरज आहे, असं मला (ईश्वराला) वाटेल, त्यावेळी नक्कीच देईन. याच कारणाने, शिशुपाल वधानंतर,, सुदर्शनचक्र परत घेताना, बोटाला झालेल्या जखमेवर, द्रौपदीने बांधलेल्या चिंधीच्या प्रत्येक धाग्याचा परतावा, श्रीयोगेश्वराने, तिला ज्यावेळी मदतीची अत्यंत गरज होती, त्यावेळी, प्रत्येक धाग्या गणिक एक, याप्रमाणे वस्त्रे पुरवून, केला.
या विषयावर अजून चिंतन जरुरी आहे,म्हणून उद्या सुरू ठेवू. पण नामाच्या धाग्याने भगवंताला गुंफण्याचा आपला धर्म सुरूच ठेवू.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment