Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१२

भोग आणि ईश्वर  ३१२ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

असे नवरात्र गणेशोत्सव या प्रकारचे सण आले की आपण , नक्कीच खूप भक्तिभावाने, श्रद्धेने आपल्या आरध्यांची प्राणप्रतिष्ठापना आणि घटस्थापना करतो. दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून गंध, शेंदूर, विविध सुवासाची फुल वाहतो आणि अप्रतिम असा नैवेद्य अर्पण करतो. उद्देश काय तर आपल्या घरी आलेला हा अतिथी आहे आणि प्राणप्रतिष्ठापना किंवा घटस्थापना करून, त्या निराकार निर्गुण मूर्तीत, काही संस्कार कल्पून आत्मबल आणि ऊर्जा यांची स्थापना करतो. 

त्यानंतर त्या पार्थिव वा धातूच्या मूर्तीत किंवा टाक असेल, प्रतिमा असेल तर त्यामध्ये देवत्व येतं, ही ती संकल्पना आहे. यात खरा मुद्दा आहे की असं देवत्व किंव चैतन्य येतं का. यामध्ये श्रद्धा आणि मानसिकता किती, अशी शंका, प्रत्येक व्यक्तीला, मग तो भक्त असो वा विभक्त असो, असतेच असते. आज जरा यावर चिंतन करूया. बघू काय नवनीत हाती लागतं ते. 

अशी कल्पना करा की, सजीव आणि निर्जीव यात फरक काय आहे. जर एखाद्या निर्जीव वस्तूत चैतन्य स्थापित केलं तर ती वस्तू सजीव होईल का किंवा हालचाल करेल का. खरतर याचा विचारसुद्धा करायची आवश्यकता नाही. कारण याचं उत्तर बाराव्या शतकात, संतश्रेष्ठ विश्वमाऊली श्रीज्ञानेश्वर महाराज यांनी भिंत चालवून, संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांनी पाषाणाच्या पांडुरंगाला जेवू घालून, सोदाहरण सिद्ध केलं आहे. 

पण हे चैतन्य आणलं कुठून, तर ते आणलं नाहीच, आत प्रस्थापित होतच. फक्त ते जागृत करणं आवश्यक असतं. विश्वरूप विश्वात्मा, विश्वातील चराचरात भरून दशांगुळे उरला आहे,  ह्याचं, हे दोन प्रसंग म्हणजे जिवंत उदाहरणं आहेत. खांबातून प्रकट झालेले भगवान श्रीनरसिंह हे त्यांनी असुर शक्तींना दिलेलं उत्तरच नसून, भक्तांनासुदधा सांगितलेला सूचक इशारा आहे. आता आपण एखाद्या मूर्तीत, प्रतिष्ठापना करून, काय करतो. तर त्यामध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या ईश्वरी शक्तीला आवाहन करून,जागृत करतो. 

निर्गुण निराकार हे चैतन्याचं स्वरूपच आहे. त्याला प्रकट होण्यासाठी घट हा लागतोच. मग तो मानवी देहाचा घट असो किंवा देवीदेवतांच्या मूर्तीचा घट असो. म्हणूनच स्थापना आणि कार्यसिद्धीनंतर, उत्तरपूजा आणि पार्थिवाचं पुनःविसर्जन हे महत्वाचं ठरतं. कारण काही विशिष्ट हेतूने, मंत्रोच्चारांच्या गजरात मूर्तीत स्थापलेलं चैतन्य, कार्यानंतर तसंच राहिल्यास, विघातक ठरू शकतं. कारण शेवटी चैतन्य ही एक शक्ती आहे. 

चैतन्य म्हणजे ऊर्जा आणि बल यांचा संयोग. त्यामुळे त्यांना स्थापित केल्यानंतर, आपण काही उद्देश कल्पून पूजा अर्चना प्रार्थना या माध्यमातून, सदहेतूने प्रेरित, आळवणी व इच्छा प्रकटन केल्यानंतर, त्या शक्तीला कार्य करायला अवधी देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपला हेतू हा स्वागत,प्रार्थना,भोजन भजन व पूजन हा आहे, जो मर्यादित काळा साठी संकल्पित असतो व असला पाहिजे.  त्या शक्तीच्या पुनरागमनासाठी प्रस्थान जरुरी आहे. अन्यथा काय होऊ शकतं, याचं उदाहरण पाहूया. 

आपल्या घरातील गीझरचं उदाहरण पाहूया. आपण नळ सुरू करून गीझरची कळ अर्थात बटन सुरू करणं, हे झालं आवाहन व स्थापना. गरजेपुरतं पाणी जमा करणं हे झालं, इच्छित कार्य आणि त्याची पूर्तता झाल्यानंतर, आधी बटन बंद करून, मग सावकाशीने नळ बंद करणं, हे झालं विसर्जन. आता जर त्या क्रियेत विसर्जन विसरलो तर ओढवला ना सत्यानाश. म्हणजेच कोणतीही ऊर्जा आणि बल अर्थात चैतन्य, त्याचं कार्य झालं की, विसर्जित करणं, म्हणजेच बटन बंद करणं, हे तितकंच महत्वाचं आहे. 

आता स्थापना करण्याच्या विधीत, मंत्रोचार हे त्या बटनासारखे आहेत. आपल्या घरातील सत्यनारायण, गणपतिउत्सव, नवरात्री हे त्या कार्यासारखं आहे आणि नंतरची उत्तरपूजा हे त्या शक्तीला मुक्त करण्यासाठीचं बटन आहे. आता यामध्ये पुन्हा अनेक प्रश्न उपप्रश्न आहेत. चैतन्य खरच येतं का, अश्या शक्ती फक्त शुभच असतात की इतरसुद्धा, चैतन्याचा वास सर्वत्र आहे, मग त्याला वेगळं आवाहन करावं का लागावं इत्यादी अनेक. त्यावर उद्या चिंतन करूया. पण तोपर्यंत नामसाधनेतून आपण ईश्वरी शक्तीला करत असलेलं आवाहन तसंच सुरू ठेवायचं आहे. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...