Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०७

भोग आणि ईश्वर  ३०७ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

मुळात ही कल्पना कशी करता येईल की, प्रत्येक चेंडू फेकताना समोर भिंत नाहीये आणि आपण एखाद्या खेळाडुकडे किंवा एखाद्याच्या हातात चेंडू फेकत आहोत आणि तो परत येणार नाही. इथे या कल्पनेत, अनेक इतर उपकल्पना दडलेल्या आहेत. खरतर हा विषय मुळात जुना आहे. अनेकांनी तो अनेकवेळा सांगितला आहे. पण मानवी मनाचं एक वैशिष्ट्य आहे की, काही गोष्टी, एकाच पिढीला किंवा व्यक्तीला अनेकदा सांगून सतत आठवण करत रहावं लागतं. 

ते काम निर्व्याजपणे संत महंत यांनी अनेक जन्म घेऊन, आपल्या उदाहरणाने दाखवून दिलं आहे. तरीही तीच गोष्ट अनेकदा पुन्हा पुन्हा सांगणं क्रमप्राप्त होतं. मुळात ही चेंडू फेकण्याची क्रिया आपण कर्माशी कल्पून जे चिंतन करतो आहोत, त्यातूनच आपण आता हा विषय सुद्धा समजावून घेऊ. 

आपण फेकलेला चेंडू, जर कोणत्याही लक्षावर न आपटता, कोणाच्या हातात फेकला तर, नक्कीच तो परत येणार नाही, हे तर सामान्य ज्ञान. यात एकच शक्यता की, त्या समोरील  व्यक्तीच्या हातातून तो चेंडू सुटला तर, मागे जाईल आणि ३६० अंशात वर्तुळाकार विश्व असल्यामुळे, तो आपल्याच एखाद्या पुढील जन्मात आपल्याला फलद्रूप प्राप्त होईल किंवा झेलावा लागेल. म्हणजे मग आपण अशी कल्पना करण्याचं प्रयोजन नष्ट होतं का. किंवा त्याला काहीच अर्थ उरत नाही का. 

तर याचं सकारात्मक उत्तर, हे आहे की, भीष्मांच्या उदाहरणा वरून काढलेला दुसरा निष्कर्ष इथे लागू होतो. म्हणजे असं की, त्या कर्माचं फल विधात्याच्या इच्छेने किंवा आपल्या पूर्वपुण्याई मध्ये असलेल्या कर्माच्या संचितामुळे अथवा सद्गुरुकृपेने, आपल्याला ते  फल, जर अनिष्ट असेल तर, आपल्या पडत्या काळात न भोगावं लागता, सुलभ काळात ते भोगता येईल. म्हणजे आपण काही प्रमाणात सद्गुरू व ईश्वर यांच्या कृपा प्रसादाने, ही सुलभता प्राप्त करून घेऊ शकतो. 

जर ते फल आपल्या एखाद्या इष्ट कर्माचं असल्यामुळे, उपभोग किंवा लाभरूपात असेल तर, त्याची प्राप्ती पडत्या  काळात होऊन, आपल्या त्या पडत्या किंवा भोगांच्या काळात, एखादं सहाय्य, गुरुकृपा, ईश्वरी प्रेरणा व मार्गप्राप्तीच्या स्वरूपात, सुलभतेने घेता येईल. म्हणजे अश्या प्रकारची सुलभता मानव प्राप्त करू शकतो. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे शिशुपाल, ज्याच्या मातेला श्रीकृष्णाने दिलेल्या वचनामुळे, शंभर अपराधांपर्यंत सूट मिळाली. म्हणजे हा लाभ शिशुपालाला आजन्म भोगता आला असता. 

श्रीकृष्णकृपेने शिशुपाल, पूर्ण नैसर्गिक जीवन जगू शकला असता. हे त्याच्याच संचितातील, एखाद्या पुण्याचे फलित असणार की, देवाने स्वतः त्याला, कर्म सुधारण्याची संधी, वचन रुपात प्राप्त करून दिली. म्हणजे भीष्मांना अनिष्ट कर्माचं फल कालांतराने किंवा अंतिम समयी भोगण्याची सुलभता आणि शिशुपालाला इष्ट कर्मामुळे पापांचं शतक पार न करता जीवन जगण्याची सुलभता मिळवून दिली. 

अश्याप्रकारची भाग्य प्राप्ती, त्याप्रकारचं कर्म नित्य केल्यानंतर, नक्कीच होईल. पण असं पुण्यकारक कर्म म्हणजेच विधात्याने आपला चेंडू, त्याच्या हातून, आपल्या सोयीनुसार, पुढे जाऊ देण्याची सुलभता, आपणच प्राप्त करून घेऊ, शकतो. कारण आतापर्यंतच्या सर्व लेखातून व विशेषकरून, या चेंडूच्या उदाहरणापासून, हे नक्कीच पक्कं ध्यानात आलं असेल की, कोणतीही गोष्ट वा क्षण, लाभ आणि हानी,प्राप्ती वा परतावा हे आपणच आपल्या कर्माने लिहून, आपणच आपल्याकडे मागवून घेतलेलं असतं. 

मग यासंदर्भात आपल्याच सोयीने ही सुलभता कशी प्राप्त होईल, यावर चिंतन, उद्याच्या भागात, करूया. पण आपण आणि नाम हा नित्य सहवास कायम राहूदे. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...