Skip to main content

भोग आणि ईश्वर ३२४

भोग आणि ईश्वर  ३२४ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

आपण काल पाहिलं की, आधीच्या जन्मात, ज्या स्थितीत आयुष्यभर, एखादी इच्छा वा अनेक इच्छांचा समूह, मनात ठेवून,आपण या जन्मात पुढे आलो, त्या इच्छा वा वासना, या balance sheet प्रमाणे,मनोमय कोषातून पुढे ओढल्या जातात. त्यामुळे, जी मती आणि मनःस्थिती अंत समयी राहील, तीच पुढील जन्मांच्या प्रेरणेचा वा स्वभाव व वागणूक, यांचा भाग असेल. 

म्हणजेच मती,जी देहामुळे वा देहातील मेंदू या घटकामुळे त्या जन्मात, विचार, आचार यातून कर्म करत गेली किंवा विचारांचं गाठोडं जपत गेली, ती, त्या देहाचा भाग असलेली बुद्धी, या देहातील मनःस्थितीला कारणीभूत ठरते. अर्थातच देह या जन्मीचा स्वतंत्र असूनही, त्यातील, बुद्धी, मन व या दोन्हीनी केला जाणारा विचार आणि त्या विचारांच्या प्रेरणेतून, या जन्मी केलं जाणारं, आचार, विचार व उच्चार यांचं प्रत्येक कर्म, प्रत्यक्षात मनःस्थितीचा दुवा हा आधीच्या जन्मातून पुढे या जन्मात प्राप्त झालेला असल्यामुळे, आधीच्या जन्मातील योग्य वा अयोग्य, चूक वा बरोबर, यामुळे, या जन्मात, फक्त घडत जातं. 

थोडं क्लिष्ट आणि चक्कर आणणारी गोष्ट वाटते. थोडं फोड करून बघूया. म्हणजे आधीच्या जन्मातील, मृत्यू पर्यंत जपलेली मती, मनःस्थिती ही, त्या जन्मात मृत्यू समयी, त्या देहातील मनोमय कोष, आत्म्यासोबत पुढे घेऊन जातं. त्याच मनःस्थिती वर तो देह संपला आहे, पण संचितरुपात, प्राप्त मनःस्थिती व इच्छा आकांक्षा यांचा डोलारा, या जन्मातील मनःस्थिती, स्वभाव व वागणूक ठरवतो. त्यानुसार या जन्मात आपण त्या अपेक्षांचं ओझं, (वास्तव वा अवास्तव दोन्ही अपेक्षा), या जन्मात, या देहाचा त्याच्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसताना, घेऊन जगतो, वर्ततो आणि कर्मरत होतो. 

म्हणजेच हे जे या जन्मासाठी, आधीच्या जन्मातून आलं व लागू झालं, तेच, या जन्मातून पुढे जाताना लागू होणार. Balance sheet तयार करताना आम्ही, मागील येणी वा देणी, जी दोन तीन वर्ष आधीची असतील तर, एका ठराविक वर्षी write off म्हणजेच काढून टाकतो आणि balance sheet स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. ही प्रक्रिया अनेक कंपन्या वेळोवेळी करत असतात. मग आपल्याबाबत हे शक्य आहे का. कारण ही जन्मोजन्मीची ओझी, आपण किति काळ पुढे ओढून, मागील जन्मातून, पुढील जन्माची स्थिती व मती ठरवणार. 

नक्कीच हे शक्य आहे. सर्व संत महंत, वेद शास्त्रे, पुराणं इत्यादी वेळोवेळी एक गोष्ट सांगतात. विवेकाची कास धरून पुढे जावे. आता आपण म्हणू की, जर स्वभाव, वागणूक, कर्म हे जर आधीच्या जन्मातूनच, पुढे या जन्मात प्राप्त झालेलं आहे तर, हे असं वेगळं वागणं कसं काय शक्य आहे. यासाठी सारासार विचार, विवेक या आयुधाची निर्मिती विधात्याने करून, फक्त आणि फक्त मानवालाच हे वरदान दिलं आहे. ते म्हणजे, तो विचार पूर्वक, विवेकाने, मन संयत करून, काया वाचा व मन यांतून घडणारं, प्रत्येक कर्म नियंत्रित करू शकतो. 

हे कसं शक्य आहे, ते पुढील लेखात पाहूया. पण तोपर्यंत आपल्या मनाचा अश्व,आपल्या ईश्वराच्या हाती सोपवण्या साठी, त्या ईश्वराचं नित्य स्मरण जरूर करूया, त्याचं नाम घेऊन. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...