Skip to main content

भोग आणि ईश्वर ३२०

भोग आणि ईश्वर  ३२० 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

आवर्तनं का करावी, असा एक प्रश्न नेहमी येतो. त्याचं एक कारण आपण, दोन तीन लेखांपूर्वी बघितलं आहे की, त्या त्या शक्तीची प्राप्ती करण्याची, त्या त्या मंत्राची गणना करून, मगच ती शक्ती जागृत होत असेल. म्हणून तितकी आवर्तनं. पण तरीही आवर्तन करून पुनः पुनः त्या देवतेचं स्मरण करून खरच काही प्राप्ती होते का, असा एक प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. 

यावर एक मानसिक दृष्टीने विचार करूया. मनात इच्छा उत्पन्न झाली आणि ती दृढ असेल तर, मनात उत्पन्न झालेली इच्छा, वारंवार, मनात तरंग व लहरी उत्पन्न करते. त्या लहरी वा तरंग, इच्छेच्या तीव्रतेनुसार, तेवढया शक्तीने वा ऊर्जेने तयार होऊन आपल्या लक्षावर पोचण्या साठी, सतत वा नियमितपणे उत्पन्न होतात. 

म्हणजे इच्छेची दृढता वाढून, टिकण्यासाठी, ती इच्छा, मनात धरून ठेवणं महत्वाचं आहे. याच गोष्टीसाठी तो विचार सतत मनात उत्पन्न होऊन, त्याने मनात वारंवार घर्षण निर्माण करून, ऊर्जा निर्मिती करणं आवश्यक आहे. तरच मनात त्या ऊर्जेने, त्या इच्छेला शक्ती व बल मिळून, इच्छा फलद्रूप होण्यासाठी पार्श्वभूमी तयार होऊन, कार्य सिद्धीस जाण्यास मदत होते. आपण जाणतोच की, मनातील दृढ इच्छा आणि त्या दृढ इच्छेची  शक्ती, किती फलदायी असते. 

म्हणजे या सर्व, विचार सतत येऊन, त्यांनी सतत घर्षण व त्यातून शक्ती निर्माण होण्यालाच आवर्तन म्हणतात. आवर्तन म्हणजे repeatition. हे आवर्तन मनातील इच्छाचं पुन्हा पुन्हा होण्यासाठी सतत एखादा मंत्र, स्तोत्र, जागर, पूजन, अर्चन हे सतत नियमित, काही काळपर्यंत केल्यास, मनातील क्षीण भाव दृढ होतात, त्या शक्तीवर श्रद्धा विश्वास अधिक दृढ होऊन, त्यायोगे मनातून निर्माण होणारी स्पंदनं, इच्छित शक्तीप्रत पोचण्यास मदत होईल. म्हणूनही आपण आवर्तन करतो. 

आता आवर्तन या संज्ञेबद्दल इतकं विस्तृतपणे जाणून घेतल्या नंतर ठराविक काळात ठराविक स्तोत्र, मंत्र, आरत्या इत्यादी का जास्त गुणकारी वा मनाला उभारी देणारी असतात ते पाहूया. आपण जर लक्षात आणलं तर समजेल की, काही ठराविक स्तोत्र किंवा मंत्र वा आरत्या, ठराविक वेळी किंवा वर्षाच्या वा दिवसाच्या ठराविक काळामध्ये म्हटल्यास मनात इच्छित तरंग निर्माण करतात किंवा जास्त आनंद देतात. 

म्हणजेच मनात त्या आवाजाच्या कंपनातून सर्वात उत्तम व जास्त प्रमाणात लहरी उत्पन्न होतात, आपण हे जाणतो की,हे मन अवकाशाप्रमाणे आहे. म्हणजेच मनातील विचारांची वादळं, स्थित्यंतरं, हेलकावे इत्यादी सर्व  अवकाशातसुद्धा होतात. त्याचप्रमाणे, जसं मनात सकारात्मकता येण्याचा किंवा ती सकारात्मक ऊर्जा, बल जास्तीतजास्त प्रमाणात असण्याचा वा निर्माण होण्याचा, जसा काळ असतो, साधारण ब्रह्ममुहूर्ती ते प्रभात समयी किंवा थंडीच्या काळात पूर्ण दिवस, त्याचप्रमाणे अवकाशातसुद्धा, ह्या स्थित्यंतराचे, त्यासम ऋतुचक्र, ठराविक काळात फिरतात. 

म्हणून दिवसाच्या, तसंच वर्षाच्या, ठराविक काळात स्तोत्रांचं अनुष्ठान वा मंत्रांचं किंवा आरत्या, यांचं पठण व आवर्तन जास्त सकारात्मक परिणाम घडवतं. म्हणूनच त्या ठराविक काळात स्तोत्र व मंत्र यांचं पठण, उच्चारण व आवर्तन करावं किंवा केलं जावं. यातसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी की, हे पठण वैखरीत व मोठ्या आवाजात जास्त परिणाम करतं. कारण ध्वनी, जितका जास्त, तितकी त्याची कंपनं जास्त निर्माण होऊन, वातावरणा तील प्रदूषित, दूषित तत्वांना दूर सारून, इष्ट शक्तींना ऊर्जा प्रदान करतं. म्हणून ठराविक काळात व वेळेत ती ती स्तोत्र, मंत्र यांचं पठण व उच्चारण करा. 

उद्या पुन्हा भेटू, पण तोपर्यंत नामाचं उच्चारण व आवर्तन सुरूच राहूदे. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...