प्रश्न १ :
नाम हे आपल्या मनाने च घ्यायला सुरुवात केली तर त्याचा प्रभाव किती असतो, किंवा ज्यांना श्री सद्गुरूंकडून प्राप्त झाले आहे, त्याचा प्रभाव जास्त असतो?कारण असे नाम हे शक्तीने भारीत असते ना?
उत्तर :
*नाम हे नाम आहे, ते शुद्ध मनाने घेतलं तर कार्य करतच. कारण शेवटी नामाची शक्ती त्यासोबत असते. पण ते गुरूंकडून मिळतं वा प्राप्त होत, त्यावेळी तुमच्या संकल्पमागे गुरुशक्ती कार्य करते, जी तुमच्या ध्येयाच्या आणि निश्चयाच्या मागे उभी असते. प्रभाव दोन्ही स्थितीत तुमच्या आत्मशक्तीच्या जागृतीवर अवलंबून आहे आणि आत्मशक्ती मनाच्या कार्यावर. गुरू याबाबत आपलं मनोधैर्य वाढवून, आत्मबळ देण्याचं कार्य जरूर करतात. म्हणजे काही कारणाने मन विचलित झालं, भ्रमित झालं तर, त्या सर्व काळात सद्गुरू पाठीशी असतात हा मुख्य लाभ*
प्रश्न २ :
ते प्राप्त झाल्यानंतर, ते वाणीचे एकूण4प्रकार आहेत ना?त्यातील कोणत्यापद्धतीने घ्यायला हवे?वैखरी, मध्यमा, परा, पश्यन्ति कृपया 4ही वाणीची व्याख्या सांगावी ही नम्र विनंती
उत्तर:
*वाणीचे चार प्रकार आहेत
वैखरी, मध्यमा परा आणि पश्यन्ति
वैखरी म्हणजे आपण सर्वसामान्यपणे बोलतो ती , म्हणजेच जी ओठ व जिव्हा यांच्या संयोगाने नाम घेताना उच्चारली जाते ती वाणी. नामाची सुरवात याच वाणीने होते
मध्यमा म्हणजे जेंव्हा नाम गळ्यातून येतं, त्या वाणीला मध्यमा म्हणतात. इथे नाम मुखातून उतरून गळ्यापर्यंत पोचलेलं असतं.
जेंव्हा नाम हृदयातून यायला लागतं तेंव्हा त्या वाणीला परा वाणी म्हणतात, या स्थितीत नाम हृदयापर्यंत पोचलेलं असतं. परा शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पण त्यातील मुख्य दोन अर्थ आहेत एक ब्रह्मविद्या किंवा दोन अशी विद्या किंवा ज्ञान जे भौतिक जगतापलीकडे आहे. म्हणजेच जेंव्हा जप या वाणीत पोचतो, तेंव्हा जगताच्या ज्ञानाकडे, ब्रह्मांडाच्या ज्ञानाकडे वाटचाल होते, ते आतून आपोआप यायला सुरुवात होते. जी नामजपाची अक्षरसंख्या आहे, तितके कोटी जपसंख्या झाला की नाम परा वाणीत पोचतं.
पश्यंती म्हणजे वाणीचा शेवटचा प्रकार आहे. ज्यावेळी जप हा नाभीचक्रातून यायला लागतो. म्हणजे मुलाधारात असलेला वायू आता नाभीचक्रातून यायला लागतो . म्हणजेच साधक सहजावस्थेत पोचतो. नाभी हे जन्मतः आईच्या गर्भाशी जोडलं गेलेलं असतं आणि जप तिथे पोचतो आणि तिथून येतो म्हणजेच जन्ममृत्यूचं चक्र भेदण्यासाठी नाम या स्थितीपर्यंत पोचणं जरुरी आहे. पश्यचा दुसरा अर्थ आहे दृश्य अर्थात दिसणे म्हणजेच साधकाचा जप दिसण्याच्या पलीकडे म्हणजे अंतापर्यंत पोचतो. अर्थातच साधक जप करतो या दृश्यापलीकडे जातो, म्हणजेच त्याचा जप होतो , घडतो, केला जात नाही.
वरील सर्व स्थितीत मन त्या जपात वा जपसंख्येत आहे हे गृहीतक धरून वरील सर्व वाचणे.*
©® संकलन व मांडणी : प्रसन्न आठवले
२७/०६/२०२१
नाम हे आपल्या मनाने च घ्यायला सुरुवात केली तर त्याचा प्रभाव किती असतो, किंवा ज्यांना श्री सद्गुरूंकडून प्राप्त झाले आहे, त्याचा प्रभाव जास्त असतो?कारण असे नाम हे शक्तीने भारीत असते ना?
उत्तर :
*नाम हे नाम आहे, ते शुद्ध मनाने घेतलं तर कार्य करतच. कारण शेवटी नामाची शक्ती त्यासोबत असते. पण ते गुरूंकडून मिळतं वा प्राप्त होत, त्यावेळी तुमच्या संकल्पमागे गुरुशक्ती कार्य करते, जी तुमच्या ध्येयाच्या आणि निश्चयाच्या मागे उभी असते. प्रभाव दोन्ही स्थितीत तुमच्या आत्मशक्तीच्या जागृतीवर अवलंबून आहे आणि आत्मशक्ती मनाच्या कार्यावर. गुरू याबाबत आपलं मनोधैर्य वाढवून, आत्मबळ देण्याचं कार्य जरूर करतात. म्हणजे काही कारणाने मन विचलित झालं, भ्रमित झालं तर, त्या सर्व काळात सद्गुरू पाठीशी असतात हा मुख्य लाभ*
प्रश्न २ :
ते प्राप्त झाल्यानंतर, ते वाणीचे एकूण4प्रकार आहेत ना?त्यातील कोणत्यापद्धतीने घ्यायला हवे?वैखरी, मध्यमा, परा, पश्यन्ति कृपया 4ही वाणीची व्याख्या सांगावी ही नम्र विनंती
उत्तर:
*वाणीचे चार प्रकार आहेत
वैखरी, मध्यमा परा आणि पश्यन्ति
वैखरी म्हणजे आपण सर्वसामान्यपणे बोलतो ती , म्हणजेच जी ओठ व जिव्हा यांच्या संयोगाने नाम घेताना उच्चारली जाते ती वाणी. नामाची सुरवात याच वाणीने होते
मध्यमा म्हणजे जेंव्हा नाम गळ्यातून येतं, त्या वाणीला मध्यमा म्हणतात. इथे नाम मुखातून उतरून गळ्यापर्यंत पोचलेलं असतं.
जेंव्हा नाम हृदयातून यायला लागतं तेंव्हा त्या वाणीला परा वाणी म्हणतात, या स्थितीत नाम हृदयापर्यंत पोचलेलं असतं. परा शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पण त्यातील मुख्य दोन अर्थ आहेत एक ब्रह्मविद्या किंवा दोन अशी विद्या किंवा ज्ञान जे भौतिक जगतापलीकडे आहे. म्हणजेच जेंव्हा जप या वाणीत पोचतो, तेंव्हा जगताच्या ज्ञानाकडे, ब्रह्मांडाच्या ज्ञानाकडे वाटचाल होते, ते आतून आपोआप यायला सुरुवात होते. जी नामजपाची अक्षरसंख्या आहे, तितके कोटी जपसंख्या झाला की नाम परा वाणीत पोचतं.
पश्यंती म्हणजे वाणीचा शेवटचा प्रकार आहे. ज्यावेळी जप हा नाभीचक्रातून यायला लागतो. म्हणजे मुलाधारात असलेला वायू आता नाभीचक्रातून यायला लागतो . म्हणजेच साधक सहजावस्थेत पोचतो. नाभी हे जन्मतः आईच्या गर्भाशी जोडलं गेलेलं असतं आणि जप तिथे पोचतो आणि तिथून येतो म्हणजेच जन्ममृत्यूचं चक्र भेदण्यासाठी नाम या स्थितीपर्यंत पोचणं जरुरी आहे. पश्यचा दुसरा अर्थ आहे दृश्य अर्थात दिसणे म्हणजेच साधकाचा जप दिसण्याच्या पलीकडे म्हणजे अंतापर्यंत पोचतो. अर्थातच साधक जप करतो या दृश्यापलीकडे जातो, म्हणजेच त्याचा जप होतो , घडतो, केला जात नाही.
वरील सर्व स्थितीत मन त्या जपात वा जपसंख्येत आहे हे गृहीतक धरून वरील सर्व वाचणे.*
©® संकलन व मांडणी : प्रसन्न आठवले
२७/०६/२०२१
Comments
Post a Comment