Skip to main content

भोग आणि ईश्वर २०२

भोग आणि ईश्वर २०२

आत्मविश्वास आणि आत्मसंयम असलेल्या व्यक्तीचं मन शांत असतं वा होतं. कारण स्वतःच्या कर्मावर ठाम विश्वास आणि आपल्या ध्येयावर पूर्ण श्रद्धा असल्या कारणाने , किंतुपरंतु वा शंकाकुशंका यांना मनात कुठेही थारा नसतो. किंबहुना आलेले सर्व अनुभव, भेटलेल्या सर्व व्यक्ती व समोर आलेले सुखदुःखाचे प्रसंग आणि आयुष्यातील चढउतार हे आपल्या कर्मफलाची परिणती आहे आणि पुढील कर्म हे ईश्वरार्पण भावाने, पण ठामपणे केलं जात असल्यामुळे, सदर व्यक्ती पुढील कर्मगती बाबत साशंकीत नसते.

म्हणूनच अशी व्यक्ती प्रत्येक कर्म आत्मविश्वास व आत्म संयमाने करत असल्याचे, मन पूर्णपणे कर्मात रत असतं. अश्या शांत मनात, फक्त सकारात्मक तरंग लहरी उत्पन्न होतात. त्या लहरी या, त्या व्यक्तीसह आजूबाजूचा परिसर, यांना व्यापून, सकारात्मकतेची लाट निर्माण करतात. या शिवाय स्थिर मनाला स्थिर बुद्धीचा आधार असतो. ज्यामुळे मन निर्विकार, बुद्धी स्थिर आणि व्यक्ती विचारी होतो.

मनाच्या शांततेमुळे वृत्ती निर्गुण निराकार होते. म्हणजेच, त्या व्यक्तीला सर्व ठिकाणी आपल्या ध्येयाचा व सद्गुरूंचाच वास दिसतो. यामुळे व्यक्तिमत्व सर्वव्यापी आणि प्रगल्भ होतं. मुख्य म्हणजे बऱ्याच वेळा होणारा प्रसंगोपात क्रोध, आवेग, दुःख इत्यादींमुळे होणारा त्रास कमी होतो, किंवा पूर्ण नाहीसा होतो. सर्वात महत्वाची गोष्ट शांत संयत आत्मविश्वासू व्यक्ती मायेच्या, मोहाच्या, प्रलोभनांच्या सापळ्यात न अडकता सुखरूपपणे आपल्या मार्गावर चालत राहते.

अश्या व्यक्तीला अडचणी येतच नाहीत असं नाही. किंबहुना आपल्यापेक्षा जास्त अडचणी येऊ शकतात. पण संयत, शांत माणूस त्या सर्वांचा शांतपणे आणि धीराने सामना करत, जणू काही फार मोठं झालंच नाही असं दाखवून , निर्विकार राहू शकतो. कोणत्याही बिकट प्रश्नाकडे तो सकारात्मक दृष्टीने बघतो, जे अत्यंत गरजेचं आहे.

मन स्थिर आणि बुद्धीचा तोल जमला की, मनात सकारात्मक भावच प्रकटतात. म्हणजेच प्रत्येक विचारामागे, तीव्र इच्छाशक्ती कार्य करते. ज्यामुळे उत्पन्न लहरी तरंग, उच्च क्षमतेच्या, अर्थात हाय फ्रिक्वेन्सीच्या असतात. अश्या लोकांच्या आजूबाजूला एक विलक्षण प्रभा असते. जो या व्यक्तींच्या संपर्कात येतो, त्याला याचा प्रत्यय येतो. त्या प्रभेच्या प्रभावाने, अर्थात सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने, आपणही भारित होऊन, आपल्या विचारात त्या काळात उत्तम बदल जाणवतात.

अश्या उच्च क्षमतेच्या लहरींचा अनुभव व परिणाम, आपल्याला मंदिरात, सद्गुरू, स्वामी व महाराज यांच्या मठात वा आश्रमात अनुभवायला मिळतो. त्या ठिकाणी जाऊन आल्यावर बॅटरी चार्ज झाल्यासारखं वाटतं, अर्थात मानसिक बळ उंचावून, कर्मात सकारात्मकता अनुभवायला मिळते. म्हणून अश्या ठिकाणी मध्ये मध्ये जावसं वाटतं आणि तिथे काही काळ राहून यावसं वाटतं.

परंतु अश्या लहरी व त्यांचा संचार आणि प्रभाव आपण स्वतः, आपल्या भोवती व घरामध्ये उत्पन्न करून अनुभवू शकतो. मुळात आत्म्यावरील विश्वास व श्रद्धा दृढ व ठाम करून, संयम प्राप्त करून, मन शांत व बुद्धी स्थिरमार्गी करून, उत्तम सकारात्मक मनःस्थिती प्राप्त करून, शुभ व शीतल लहरींची तीव्रता व शक्ती वाढवून आपलं साधन व त्यातील सातत्य वाढवू शकतो.

त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे परम दयाळू परम शक्ती, जीचा अंश आपल्या हृदयात वास करतो आहे आणि जो चराचरा मध्ये भरलेला आहे, त्यावर ठाम विश्वास व श्रद्धा ठेवावी. विश्वास आणि श्रद्धा हे दोन भिन्न शब्द आहेत. त्यांचा विस्तृत अर्थ पुढील भागात पाहूया. तोपर्यंत नाम घ्या, शुद्ध आणि शांत लहरी निर्माण करा.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...