Skip to main content

भोग आणि ईश्वर १९३

भोग आणि ईश्वर  १९३
 
या जगाचा सर्व खेळ हा खरतर दोन गोष्टींवर अवलंबून आहे. श्रद्धा असणं किंवा श्रद्धा नसणं. श्रद्धा नसेल तर फक्त चर्मचक्षूंच्या पातळीवर जे दिसेल, ते सत्य आणि तितकंच सिद्ध. पण श्रद्धा असेल तर, जे मनाच्या नेत्रांना दिसेल जाणवेल आणि पटेल, ते ते सर्व ब्रह्ममय जगत. पुन्हा जर शब्दांचा खेळ करायचाच असेल तर श्रद्धा कशावर असेल त्यावर अवलंबून आहे.

म्हणजे श्रद्धा बाह्य जगतावर असेल तर दृष्टी बहिर्यामी असेल. म्हणजेच बुद्धी तेच प्रमाण मानेल जे मेंदूच्या कक्षेत मावेल. म्हणजे तर्क आणि विचार हे त्याचं गोष्टीपर्यंत पोचतील, ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत. किंबहुना ज्या ज्या गोष्टी, स्थूलपणे दाखवता येतात. ज्यांचं गणितीय समीकरण मांडता येतं, प्रमेयात्मक स्वरूपात सांगता येतं आणि शेवटी ज्या क्षला दाखवता येतं. एकप्रकारे ही देखील श्रद्धाच आहे, पण भौतिक जगतावर आणि स्थूलरूपात असणाऱ्या जगतावर. म्हणजे कुठेतरी श्रद्धा ही असावीच लागते. 

दुसरीकडे ज्यांची श्रद्धा बुद्धी आणि तर्क या पलीकडील गोष्टी पाहू, समजू वा मनःचक्षूंनी जाणू शकते, ते या जगात असूनही जगापलीकडे असलेल्या जगाच्या निर्मात्याकडे त्याच श्रद्धेने पाहू शकते. ही अंतर्यामी दृष्टी होय. म्हणजे या लोकांची श्रद्धा, दृष्टी ही व्यापक असते. म्हणजेच जे स्थूलपणे दाखवता व मांडता येतं, ते तर पाहतातच, पण या सर्वांपलीकडे, ज्याचे हात हे सर्व निर्माण करू शकतात, त्यांनाही जाणण्याची, समजून घेण्याची क्षमता, निदान दृष्टिकोन बाळगून असतात. म्हणजे जगत असण्याचं खरं कारण जाणणं म्हणजे अंतर्यामी असणं. 

या दोन्ही श्रद्धा आपापल्या स्थानी ठीकच आहेत.पण एका मर्यादित अर्थाने जगापलीकडे पाहू न शकणाऱ्या किंवा पाहूनही मान्य करू न शकणाऱ्या लोकांची मुख्य समस्या ही असते की,काही समिकरणांमध्ये क्ष हा गणिता बाहेरील उत्तर असू शकतं हे त्यांना जाणवलेलं असतं , पण बुद्धीचा अहंकार दृष्टीची कमतरता, बुद्धीची मर्यादित झेप, जाणिवांची अप्रगल्भता,  यां लोकांना संकुचित विचार आणि क्ष च्या दुसऱ्या उत्तराची शक्यता मान्य करू देत नाही. 

या विरुद्ध श्रद्धावान, म्हणजे जगतपित्याबद्दल श्रद्धा आणि विश्वास बाळगून असलेला माणूस, मुळातच आपल्या माणूस म्हणून जन्माबद्दल कृतज्ञ असतो. म्हणजेच जगताच्या कर्त्याला, आपल्या शरणागतीची सुरवात, यांनी स्वतःच्या जन्मा पासूनच केलेली असते. थोडक्यात  मी आहे म्हणजे विश्वनिर्माता आहे. 

या शरणागतीला खरतर व्यापक रूप देत जाणं, म्हणजेच खऱ्या अर्थाने श्रध्दायुक्त असणं. म्हणजेच या क्षणी माझा श्वास सुरू आहे, म्हणजे विधात्याची किती अगणित कृपा आहे. कारण ज्यांचे श्वास संपले त्यांचा भक्तीवरील, कर्मावरील, श्रद्धेवरील अधिकार त्या देहापुरता संपला. पुढे तो अधिकार पुढील जन्म मिळेल तेंव्हाच सुरू होईल. म्हणजेच मिळालेला प्रत्येक क्षण विधात्याने, मला माझ्या अहंकाराला बांधून, शरणागतीला दृढ करण्यासाठी दिला आहे.

म्हणून त्या प्रत्येक क्षणाबद्दल, मी त्या विधात्याचा कृतज्ञ आहे. मला पुढचा क्षण प्रदान केला, ही केवढी कृपा, विश्व पालकाने माझ्यावर केली आहे. त्या प्रत्येक क्षणाचा मी आभारी आहे. मला या वादात का पडावसं वाटतं की मला काय मिळालं आणि काय गमवावं लागलं. हा एकच विचार पुरेसा नाही का, श्रद्धेने, अंतःकरणापासून त्याला स्मरायला की, त्याची आठवण न काढता, त्याला न स्मरता,  त्याचं नाम न घेता, अकारण चिंता करत मी एक क्षण वाया घालवला. 

इतका विचार पुरेसा नाही का की, मागचा एक क्षण मी त्याला न स्मरतासुद्धा, माझे श्वास चालू आहेत, का तर, पुढच्या क्षणी तरी मला जाणीव होऊन, मी त्याची कृतज्ञता व्यक्त करीत, त्याचे आभार मानीन, त्याला नित्य स्मरण्याचं ध्यानात ठेवून. या पातळीपर्यंत श्रद्धा आली तरच काही तरणोपाय आहे. अन्यथा नुसतं पाण्यावर तरुन काय उपाय आहे. जगण्याचा खरा अर्थ पुढचा विचार करणं, हे फक्त भौतिक अर्थाने नाही, तर पारमार्थिक अर्थानेसुद्धा अंतिम सत्य आहे.

विचार करा की, म्हातारपण सुखाचं जावं, पुढील पिढीला कमी त्रास व्हावा, म्हणून संपूर्ण तारुण्य उधळून कष्ट करणारे आपण, एक जन्म विधात्याने दिला, पुढील जन्मांची बेगमी करण्यासाठी, त्यातील प्रत्येक क्षणाचा उपयोग, त्याच्या स्मरणासाठी न करता, व्यर्थ चिंता, काळज्या, भूतकाळातील चुका, उणिवा काढून, न्यूनपणा मानण्यात वाया घालवतो. त्यापेक्षा, प्रत्येक क्षण कर्म, कर्तव्य करता करता, त्याला स्मरून त्याचे आभार मानत, तेच क्षण सत्कारणी लावू शकतो. आयुष्य तितकंच राहील कदाचित, पण त्या प्रत्येक क्षणाचं मोल वाढेल. का तर तो प्रत्येक क्षण आपण विधात्याच्या समीप राहून जगलेला असेल. कारण त्याचं स्मरण हे त्याच्या समीप असण्यासारखंच आहे. 

म्हणूनच नित्य याच गोष्टीचा विचार करा की, मी किती क्षण वाया घालवतो, त्याच्या स्मरणाशिवाय, तितकी माझीच गती मी बिघडवत आहे. म्हणून नित्य नाम घ्या, नित्य जगत रहा. उद्या भेटूच पुढील चर्चेसाठी. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...