भोग आणि ईश्वर २६१
काल आपण जे चिंतन केलं, त्यातून काही गोष्टी कळल्या पण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यावर अजून थोडं चिंतन,आज करूया. ज्याप्रमाणे आपण अन्न ग्रहण करतो वा करू, त्याप्रमाणे पुढे त्यातून, प्रवेश करणारं चैतन्य आपल्या समोर येणार. म्हणजेच आपलं आपल्या खाण्यावर किती नियंत्रण असावं, याचा विचार व्हायला हवा.
म्हणूनच, कदाचित, पूर्वीच्या काळी, जन्माला आलेली संतति, ही अनेक कारणांनी व गुणांनी युक्त अशी असायची. किंबहुना तशी ती जन्माला यावी , यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जायचे, शुद्ध सकस आणि पूर्ण घरगुती जेवण खायला घालून. अर्थात पूर्वी बाहेरून आणून खायची पद्धत नव्हतीच आणि बहुतेक घरातून शेती हा प्रधान उद्योग असल्यामुळे, सकस व उत्तम जीवनसत्वांनी युक्त भोजनच घेतले जायचे. उत्तम प्रतीची संतती निपजण्यासाठी त्या प्रकारचा आहार विहार अत्यंत जरुरी आहेच.
आता चैतन्यशक्ती जी, चैतन्यमय अवस्थेतून, पंचमहाभूत रुप देहात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून पार पडली. पण आता ज्या देहात प्रवेश करता झाला, तो देह, कसा काय व कुठे आहे, हे देखील जाणण्याची काही सोय विधात्याने केली आहे का. तर नक्कीच आहे. गर्भात असेपर्यंत त्या चैतन्याला हे ज्ञात असतं की, तो कोण होता आणि काय उद्देश घेऊन, हा देह धारण केला आहे. कारण तोपर्यंत बाह्य संस्कार त्या आत्म्यावर झालेले नसतात.
पण एकदा का या जगात प्रवेश झाला, अर्थात म्हणजे उदरातून जन्म मिळाला की, सर्व उलटा प्रवास सुरु झाला.
म्हणजे , जन्म घेण्याआधी गर्भात असेपर्यंत,जे ज्ञात होतं
ते ज्ञान हळूहळू, जगाच्या संस्कारांमुळे ओझरत जाऊन, माणूस वयात येईपर्यंत, पूर्ण विस्मृतीत गेलेले असते. म्हणजेच जर पहिली दोन ते चार वर्षे उत्तम संस्कारांची गेली, तर ती संतती, उत्तम गुणांनी युक्त निपजेल.
म्हणजेच गर्भात असल्यापासून ते साधारण तीन ते चार वर्षे, जर उत्तम संस्कार मिळाले, तर त्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरेलच, पण योग्य वयात, आत्म उद्धाराचा योग्य मार्ग, जोपासण्याची बुद्धी होईल, मनाला जाणीव होईल आणि आपोआप त्या मार्गाने वाटचाल सुरू होईल. यामध्ये पुन्हा प्रारब्ध, संचित आपला खेळ खेळणार आहेच. पण पूर्वसंस्कार जर योग्य असतील तर, योगवेळी बुद्धी योग्य मार्गाने जाईल.
कारण शेवटी, हे जग व आयुष्य, कर्मावर आधारित आहे. मिळणारं फल कर्मानुसारच असेल, यात शंका नाही. पण प्रयत्न करणं आणि कर्माधिष्टीत राहून, अनिष्ट होण्या पासून स्वतःला वाचवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. हे सर्व घडण्यात, या देहाचा, त्यातील मनाचा आणि बुद्धीचा नक्कीच अमूल्य वाटा वा सहभाग आहे. आत्म्या तील चैतन्य, मनाच्या माध्यमातूनच बुद्धी व देह यांना ऊर्जा, चेतना आणि सामर्थ्य पुरवते.
म्हणजे पून्हा आपण त्याच चौकोनात आलो जिथे, देह बुद्धी मन व आत्मा या चारही माध्यमांचा उपयुक्त वापर करून, त्यांच्या द्वारे, सन्मार्गी,सुसंस्कारी राहून आत्म्याला त्याच्या इष्ट उद्देशाप्रत पोचवण्यासाठी प्राप्त मार्गाचा सदुपयोग करू देणं व देत राहणं, हेच देह मन व बुद्धी या तिघांचं आद्य कर्तव्य आहे. किंबहुना जन्म घेताना, चैतन्य शक्तीने, ज्या उद्देशाने, हा देह धारण करण्यासाठी प्रयत्न केले, ते प्रयत्न निदान आपण व्यर्थ जाऊ न देणं, हे तरी आपल्याच हातात आहे.
आता आत्म्याचा उद्देश नक्की काय असेल. हा उद्देश, मुख्यत्वे, उन्नती व उद्धार हाच आहे. पण या उद्देशापर्यंत जाताना, मार्गात प्रत्येक जन्मात जे चांगले वा वाईट संस्कार घडले, जे अनिष्ट, चुकीचं कर्मफल प्राप्त झालेलं आहे, तोच पुढे जाण्याचा आधार वा पाया आहे. ते जर भोगरूपात समोर आलं, तर प्राप्त परिस्थिती स्वीकारून, त्याबद्दल कोणतीही तक्रार न करता,त्यातून,बाहेर पडण्या साठी, आत्म्याचाच आधार घेऊन,मार्ग सुकर होण्यासाठी, प्रयत्नशील राहणं, आपल्या हातात आहे.
यात मार्गभ्रष्ट व्हायचं आणि आत्म्याला पुढील वाटचालीत
अजून कष्टप्रद आयुष्यातून जायला लावायचं की,पुढचा मार्ग सुकर होईल हे पाहायचं,ते आपल्या हातात आहे. नव्हे देह म्हणून ते कर्तव्य आहे. उद्या विषय पुढे नेऊ. म्हणूनच नाम घेत रहा, पुढे पुढे जात रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
काल आपण जे चिंतन केलं, त्यातून काही गोष्टी कळल्या पण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यावर अजून थोडं चिंतन,आज करूया. ज्याप्रमाणे आपण अन्न ग्रहण करतो वा करू, त्याप्रमाणे पुढे त्यातून, प्रवेश करणारं चैतन्य आपल्या समोर येणार. म्हणजेच आपलं आपल्या खाण्यावर किती नियंत्रण असावं, याचा विचार व्हायला हवा.
म्हणूनच, कदाचित, पूर्वीच्या काळी, जन्माला आलेली संतति, ही अनेक कारणांनी व गुणांनी युक्त अशी असायची. किंबहुना तशी ती जन्माला यावी , यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जायचे, शुद्ध सकस आणि पूर्ण घरगुती जेवण खायला घालून. अर्थात पूर्वी बाहेरून आणून खायची पद्धत नव्हतीच आणि बहुतेक घरातून शेती हा प्रधान उद्योग असल्यामुळे, सकस व उत्तम जीवनसत्वांनी युक्त भोजनच घेतले जायचे. उत्तम प्रतीची संतती निपजण्यासाठी त्या प्रकारचा आहार विहार अत्यंत जरुरी आहेच.
आता चैतन्यशक्ती जी, चैतन्यमय अवस्थेतून, पंचमहाभूत रुप देहात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून पार पडली. पण आता ज्या देहात प्रवेश करता झाला, तो देह, कसा काय व कुठे आहे, हे देखील जाणण्याची काही सोय विधात्याने केली आहे का. तर नक्कीच आहे. गर्भात असेपर्यंत त्या चैतन्याला हे ज्ञात असतं की, तो कोण होता आणि काय उद्देश घेऊन, हा देह धारण केला आहे. कारण तोपर्यंत बाह्य संस्कार त्या आत्म्यावर झालेले नसतात.
पण एकदा का या जगात प्रवेश झाला, अर्थात म्हणजे उदरातून जन्म मिळाला की, सर्व उलटा प्रवास सुरु झाला.
म्हणजे , जन्म घेण्याआधी गर्भात असेपर्यंत,जे ज्ञात होतं
ते ज्ञान हळूहळू, जगाच्या संस्कारांमुळे ओझरत जाऊन, माणूस वयात येईपर्यंत, पूर्ण विस्मृतीत गेलेले असते. म्हणजेच जर पहिली दोन ते चार वर्षे उत्तम संस्कारांची गेली, तर ती संतती, उत्तम गुणांनी युक्त निपजेल.
म्हणजेच गर्भात असल्यापासून ते साधारण तीन ते चार वर्षे, जर उत्तम संस्कार मिळाले, तर त्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरेलच, पण योग्य वयात, आत्म उद्धाराचा योग्य मार्ग, जोपासण्याची बुद्धी होईल, मनाला जाणीव होईल आणि आपोआप त्या मार्गाने वाटचाल सुरू होईल. यामध्ये पुन्हा प्रारब्ध, संचित आपला खेळ खेळणार आहेच. पण पूर्वसंस्कार जर योग्य असतील तर, योगवेळी बुद्धी योग्य मार्गाने जाईल.
कारण शेवटी, हे जग व आयुष्य, कर्मावर आधारित आहे. मिळणारं फल कर्मानुसारच असेल, यात शंका नाही. पण प्रयत्न करणं आणि कर्माधिष्टीत राहून, अनिष्ट होण्या पासून स्वतःला वाचवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. हे सर्व घडण्यात, या देहाचा, त्यातील मनाचा आणि बुद्धीचा नक्कीच अमूल्य वाटा वा सहभाग आहे. आत्म्या तील चैतन्य, मनाच्या माध्यमातूनच बुद्धी व देह यांना ऊर्जा, चेतना आणि सामर्थ्य पुरवते.
म्हणजे पून्हा आपण त्याच चौकोनात आलो जिथे, देह बुद्धी मन व आत्मा या चारही माध्यमांचा उपयुक्त वापर करून, त्यांच्या द्वारे, सन्मार्गी,सुसंस्कारी राहून आत्म्याला त्याच्या इष्ट उद्देशाप्रत पोचवण्यासाठी प्राप्त मार्गाचा सदुपयोग करू देणं व देत राहणं, हेच देह मन व बुद्धी या तिघांचं आद्य कर्तव्य आहे. किंबहुना जन्म घेताना, चैतन्य शक्तीने, ज्या उद्देशाने, हा देह धारण करण्यासाठी प्रयत्न केले, ते प्रयत्न निदान आपण व्यर्थ जाऊ न देणं, हे तरी आपल्याच हातात आहे.
आता आत्म्याचा उद्देश नक्की काय असेल. हा उद्देश, मुख्यत्वे, उन्नती व उद्धार हाच आहे. पण या उद्देशापर्यंत जाताना, मार्गात प्रत्येक जन्मात जे चांगले वा वाईट संस्कार घडले, जे अनिष्ट, चुकीचं कर्मफल प्राप्त झालेलं आहे, तोच पुढे जाण्याचा आधार वा पाया आहे. ते जर भोगरूपात समोर आलं, तर प्राप्त परिस्थिती स्वीकारून, त्याबद्दल कोणतीही तक्रार न करता,त्यातून,बाहेर पडण्या साठी, आत्म्याचाच आधार घेऊन,मार्ग सुकर होण्यासाठी, प्रयत्नशील राहणं, आपल्या हातात आहे.
यात मार्गभ्रष्ट व्हायचं आणि आत्म्याला पुढील वाटचालीत
अजून कष्टप्रद आयुष्यातून जायला लावायचं की,पुढचा मार्ग सुकर होईल हे पाहायचं,ते आपल्या हातात आहे. नव्हे देह म्हणून ते कर्तव्य आहे. उद्या विषय पुढे नेऊ. म्हणूनच नाम घेत रहा, पुढे पुढे जात रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment