Skip to main content

भोग आणि ईश्वर २६९

भोग आणि ईश्वर  २६९

ईश्वर हा खूप कोमलहृदयी , दयाळू आणि अत्यंत प्रेमळ अंतःकरणाचा आहे. आपण आपलं मन पूर्णपणे ईश्वराच्या स्वाधीन केलं की, तो त्याचा निर्वाह सहज करवून घेतो. सहज करवून घेतो म्हणजे, ज्या देहात ते मन आहे, त्या देहाची नित्य व्यवस्था पाहून, त्या देहात स्थित आत्म्याच्या उद्धाराची चिंता स्वतः वाहतो आणि त्यानुसार कर्म त्या देहाकडून मन बुद्धी आत्मा यांच्या सहाय्याने घडवून घेतो. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की, ईश्वर आत्मा पाहतो आणि फक्त मनाची भाषा जाणतो. 

म्हणजेच मनात, मनाने केलेले विचार व त्या विचारांची, संकल्पांची, भाषा हिच ईश्वराला ज्ञात आहे किंवा ईश्वरा पर्यंत तीच भाषा व तिचाच संवाद, पोचतो. म्हणजे मनाने घातलेली साद ईश्वर ऐकतो. ईश्वर हा हृदयाने ऐकतो, त्यामुळे जी साद मनातून अंतर्मनाने व आर्ततेने घातली जाते, ती साद भगवन्त हृदयात पोचते. 

भगवंत हा इतका कृपाळू व दयाळू आहे, की तो पापांचे पर्वत सुद्धा क्षणात नष्ट करून, कोणत्याही जिवामात्राला पावन करून घेऊ शकतो. वास्तविक तो एखाद्या माते समान आहे. म्हणजे माता ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांच्या शत चुकांना आपल्या मायेच्या पदराआड सामावून घेते. त्याचप्रमाणे ईश्वर, जो जगत पालक व जगन्माता आहे, तो मोठ्यातल्या मोठ्या पापी, दुर्जन असुर जनांनाही क्षमा करून, दयायुक्त बुद्धीने शुद्ध करून घेऊ शकतो, नव्हे घेतोच. 

अर्थात अशी शुद्धता ही आत्म्याची असल्यामुळे,शक्य असल्यास देहाने वा शक्य नसल्यास देह नष्ट करून, ही शुद्धता साधली जाते. ती गोष्ट ईश्वराधीन असल्यामुळे, आपण फक्त आपल्या चुका वा अपराध किंवा प्रमाद शुद्ध अंतःकरणाने, ईश्वराच्या हृदयापर्यंत पोचतील, हे करणं आवश्यक आहे. प्रत्येक कर्म हे फलासाठी बाध्य असल्या मुळे ते आपलं फल दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे कर्मसिद्धांताप्रमाणे निर्विवाद सत्य आहेच. परंतु आपली साधना, नामस्मरण, प्रार्थना हे मनापासून केलं तर, तेही कर्मच आहे. 

किंबहुना नित्य नामस्मरण हे शुद्धीकरण क्रियेसमान आहे.  जर कर्मसिद्धांत हे सांगतं की, कर्म केल्यावर फल भोगण्याची तयारी ठेवावी, तर त्याच सिद्धांतानुसार, नित्य ईश्वरस्मरण हे मूर्तीवर केलेल्या वा करण्यात येणाऱ्या अभिषेकासमान आहे. अभिषेक प्रक्रियेत एका संकल्पाने एकसमान सूत्राने, विशिष्ट स्तोत्र, मंत्र वा जाप यांचं, ठराविक संख्येने स्मरण व चिंतन करून, आपण त्या त्या इष्टदेवतेला प्रार्थनापूर्वक, साद घालून,आपली प्रार्थना त्या इष्टदेवतेच्या हृदयापर्यंत वा अंतरापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. 

असा अभिषेक हा संकल्पपूर्वक व प्रासंगिक केला जातो. त्याचा निश्चित सकारात्मक परिणाम, आपला देह, आपली बुद्धी व आपलं मन यांसह आपल्या सर्व इच्छा आकांक्षा यांवर नक्कीच होतो. हे अर्थातच, संकल्पाची दृढता, मनाचा यातील सहभाग यावर अवलंबून आहे. अश्या प्रासंगिक व संकल्पपूर्वक केलेल्या अभिषेकाने जो परिणाम साधला जातो, तो आपण नित्य जीवनात मनात येईल तेंव्हा आणि बसल्या जागी साधू शकत नाही. 

याचं कारण की, सदर अभिषेकाला विधी, वेळकाळ, तयारी, संकल्प, सिद्धता इत्यादींची बंधनं असतात व वेळेच्या, सामग्रीच्या उपलब्धतेच्या मर्यादा असतात. म्हणूनच असं संकल्प पूर्वक अभिषेककर्म आपण नित्य करू शकत नाही. पण म्हणून आपली साद ईश्वरी हृदयापर्यंत पोचू शकण्याचा अभिषेका समान व तितकाच, किंबहुना जास्त परिणाम साधणारा उपाय, सर्वसामान्य जनांसाठी अस्तित्वात नाहीच का. पण भगवंत तर सहृदयी व भक्तवत्सल म्हणून ओळखले जातात. 

नव्हे तसं त्यांचे ब्रीदच आहे. त्यामुळे असे शास्त्र विधीयुक्त उपाय न करता, तोच योग साधण्याचा काही मार्ग त्यांनी जरूर निवडला असेल. जो मार्ग कर्मकांड रहित, सहज पणे करता येणारा, कोणत्याही उपचाराची वा उपाधींची आवश्यकता नसलेला मार्ग निश्चित असणारच व आहे देखील. पण त्यावर उद्या चर्चा करूया. आज इथेच थांबू. अर्थात नित्याचा नामस्मरणाचा अभ्यास सुरूच ठेवा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...