Skip to main content

भोग आणि ईश्वर २६८

भोग आणि ईश्वर  २६८

कालचाच विषय पुढे नेऊ. वास्तविक आपण भोग भोगत असताना हे विसरतो की, आपण फक्त कर्मच करू शकतो. अन्य काही आपल्या हातात ईश्वराने ठेवलंच नाही. म्हणजे याची दुसरी बाजू अशी की, मनात बुद्धीत व आत्म्याच्या अंतरंगात फक्त आणि फक्त पुढचा विचार असावा. काय बिघडलं यावर विस्तृत आणि निरर्थक चर्चा करुन आपण, उपलब्ध वेळेचा दुरुपयोग करतो. 

यामध्ये वास्तविक ईश्वरसुद्धा आपल्यावर हसत असेल की, जी गोष्ट तुझ्या हातातच नाही किंवा ज्या कर्मांना तू भूतकाळात करून इथपर्यंत आला आहेस आणि त्याचे परिणाम आज कर्मफलरुपात भोगत आहेस, त्या भोगांचा इतका विचार किंवा सुख व ऐश्वर्य प्राप्तीदेखील कर्मफल आहे हे माहीत असूनही, दोन्ही काळात फक्त त्यावर आरूढ होऊन, त्यांनाच वाहन समजून, त्यातूनच त्या त्या काळात, मनाची व बुद्धीची सर्व यात्रा देहाला व आत्म्याला घडवतोस. पण यातून साध्य काहीच होत नसूनसुद्धा, त्यातच व्यर्थ काळ घालवून, काळाचासुद्धा अपमान करतो आहेस. 

कारण फक्त चिंता, क्लेश, काळजी यांनी मन,  काळीज, देह व देहातील प्रत्येक इंद्रिय, धमन्या, रुधिर अर्थात रक्त यांचा अकारण अतिरिक्त दाह घडवून आणतोस. अनेक वेळा सांगूनही, ही गोष्ट कळत नाही किंवा कळली तर वळत नाही की, कर्म एकदा घडल्यानंतर त्याच्या फलाची चिंता सोडून दे. कारण ते योग्यवेळी तुझ्यासमोर येईलच. ते चुकणार नाही. मात्र ते समोर येईल तेंव्हा किंवा त्यावेळी त्याचा विचारसुद्धा न करता, ते फल, फक्त भोग.जर कटू असेल तर, तुला आत्मशुद्धी घडवून पुढे जाईल आणि गोड असेल तर, दुःखाच्या काळासाठी, त्याचा साठवणूक म्हणून उपयोग होईल. 

म्हणजेच विधातासुद्धा, ज्या संकल्पाने आपला अंश या जगतात पाठवतो आणि मनरुपात स्वये येऊन त्याच आत्मतत्वाची पाठराखण करत असताना, तेच मन हे, कधी बुद्धी, देह, कधी माया, षड्रिपु यांच्या गुंत्यामध्ये अडकून, अहित साधत आहे आणि अनंत काळापर्यंत भटकत राहण्याचा संकल्प कर्मातून घडवत आहे. बर हा प्रवास, सर्व नीतिनियम पाळूनसुदधा, सहज सोपा खचितच नाही. मग अनंत कर्माच्या अनंत राशी उभ्या करून, त्यातून जन्ममरण फेरा घडवून घेत चक्रात फिरत राहणाऱ्या आत्म्याला पाहून, विधाता वैकुंठलोकात, क्लेशवश हताश होत असेल. 

तरीही त्या विधात्याने हरप्रकारे समजावून सांगण्याचा नित्य आणि आटोकाट प्रयत्न केलाच असणार व करतच राहणार. कारण विश्वापिता व विश्वमाऊली  असलेला ईश्वर सर्व भुतांना दयायुक्त अंतःकरणाने पाहतो आणि त्याच करुणेने आपल्याकडे बाहतो म्हणजे साद घालतो. 

पण ती साद ऐकण्यासाठी चित्त व आत्मा शुद्ध करून मग ऐकणं गरजेचं आहे. त्यावर उद्या चर्चा करूया. पण नाम घेत रहा, चित्तशुद्धी साधत रहा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...