Skip to main content

भोग आणि ईश्वर २५२

भोग आणि ईश्वर  २५२

वास्तविक जे आत्मज्ञान वा मोक्षप्राप्तीसाठीचं ज्ञान ईश्वरी संकल्पातून प्रकट झालेलं,  गुह्य पण सर्वजनांसाठी असलेलं ज्ञान, सर्वांनाच प्राप्त व्हावं, हा जगतपिता ईश्वराचा स्वच्छ आणि शुद्ध हेतू. मूळ संस्कृत असलेल्या, देवभाषेत ते युगानुयुगे मांडलं  गेलं. त्याचा अर्थ, अन्वयार्थ, मतितार्थ, गुह्यार्थ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून, त्यांनाही या जीवनातून, मुक्त होऊन, ईश्वरप्राप्ती व्हावी या हेतूने प्रेरित होऊन, ज्ञानी व मुमुक्षूंनी हे सत्कार्य करावं, जेणेकरून सद्हेतू साध्य होईल, हा ईश्वरी हेतू यामागे होता. 

पण काळाच्या, विकारांच्या ओघात, हे ज्ञान काही मोजक्या हातात राहिलं आणि उद्देश असफल राहिला. कर्म ज्ञान व या दोन्हीना जोडणारी आणि ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग असलेली भक्ती, आपलं स्वरूप हरवून बसली. त्यामुळे प्रथम कुरुक्षेत्रावरील युद्धप्रसंगी श्रीकृष्णांनी आणि नन्तर कलियुगात बाराव्या शतकात, स्वतः श्रीविष्णूंचा अंश असलेल्या, ज्ञानोबामाऊलीनी, ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलं. 

म्हणजेच सर्व जीवांची चिंता वाहणारे, स्वतः वेळोवेळी येऊ शकतात, येतात हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. इतकंच नाही तर या भक्तिमार्गाचे द्वार पुनः एकदा उघडून,धर्म साधू सज्जन यांचं रक्षण करण्याचं कार्यसुद्धा लीलया पार पाडलं. हे द्वापारयुगात अवतारातील कार्य झालं. पण अगदी नजीकच्या काळातसुद्धा तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी म्लेंच्छन्च्या आक्रमणातून धर्म, साधू, सज्जन रक्षणाचं काम पुन्हा येऊन केलं.

म्हणजेच भक्ती, धर्म, मानवता या सर्वच ठिकाणी, आपल्या कर्तव्याला कधीही ईश्वर चुकत नाही. आपल्या पर्यंत भक्तांची साद पोचल्यास त्वरेने भक्तांच्या सादाला प्रतिसाद देऊन, भक्तीच्या व धर्माच्या मार्गातील अडथळे दूर करून, मूळ उद्देशापर्यंत सामान्यांना जाता यावं यासाठी मार्ग प्रशस्त करण्याचं काम देखील ईश्वर करतो.

ज्ञान कर्म व भक्ती या तिन्ही मार्गाने विधात्याने आपल्या पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे, करत आहे आणि करत राहणार. म्हणून आपल्याला आपल्या सहभागाचं कार्य,  त्याच्या आपल्यावरील प्रेमाचं उतराई होऊन, प्रेमपूर्वक, निष्ठापूर्वक, भक्तीरसपूर्वक ईश्वर स्मरणात रममाण होऊन, त्याला आळवून साद घालण्याचं काम मनापासून, प्रेमाने केलंच पाहिजे. 

म्हणूनच आपल्या मनातील विविध विचार, विकार, क्रोध आदी आजार यांना आंजारून, गोंजारून, समजावून ईश्वराच्या आपल्याप्रती असलेल्या प्रेमाची सतत जाणीव करून देत राहणं, अत्यंत गरजेचं आहे. कारण ईश्वराचं या ब्रह्मांडावरील, त्यातील चराचरावरील , त्यातील त्याच्या प्रत्येक रचनेवरील प्रेम हे अद्वितीय आहे. म्हणजे जर त्याचं प्रेम इतकं अलौकिक आहे आणि त्यासाठी तो सर्व काही करण्यास तत्पर असतो, तर आपण आपल्या सहभागात तीच तत्परता, तेच प्रेम आणि तोच भक्तिभाव ओतून, मनापासून त्याला साद घालणं किती जरुरी आहे, हे आपणच जाणलं पाहिजे

उद्या पुढे बोलूच, तोपर्यंत विश्वापालकाला नाम घेऊन साद घाला, तो नक्कीच आपल्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देईल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...