Skip to main content

भोग आणि ईश्वर २४६

भोग आणि ईश्वर  २४६

मन हे एकमेव माध्यम आहे, ज्यामार्गे देहातील आत्मा ईश्वरी आत्म्याशी संधान साधू शकतो आणि ईश्वरी संदेश प्राप्त करू शकतो. मन हे मानवी देहाचं नेटवर्क आहे , ज्यामुळे आर आणि पार दोन्ही जगाशी जसा हवा तसा संपर्क ठेवता येतो. उत्तम स्थितीतील मन हे, अडथळ्या शिवाय असलेल्या नेटवर्क प्रमाणे आहे. यात नेटवर्क म्हणजे कार्यालयीन अंतर्गत आणि बाह्य जगतासाठीचं असलेलं इंटरनेट अर्थात आंतरजाल दोन्हीसुद्धा आहे. 

मानवी व्यवस्थेत या दोन्हींसाठी दोन वेगळ्या सोयी वा व्यवस्था असतात. पण ईश्वरनिर्मित या देहाच्या व्यवस्थेत भौतिक आणि पारलौकिक जगताच्या संपर्कात येण्या साठी, मन हे एकच माध्यम तयार करून, ईश्वराने हे सिद्ध केलं आहे की, तोच सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आहे. या मनाला प्रचंड लवचिकता आणि वज्राचं काठिण्य अश्या दोन्ही अवस्थाप्रत जाण्याची अपार शक्ती देऊन विधात्याने, मानवाला अमूल्य देणगी दिली आहे. 

याच मनाला सक्षम, कार्यक्षम व सबल करण्यासाठी, समर्थांनी मनाचे श्लोक लिहून, त्या मनाची उपयुक्तता अधोरेखित केली आहेच. विचार करा प्रसंगी वज्राहून कठीण व कठोर होणारं हे मन, याच देहाकडून अशक्य कार्य सुलभतेने करून घेतं. तेच मन प्रसंगी हळवं वा संवेदनशील झाल्यानंतर याच देहातून अश्रूरूप भावना प्रसारित करू शकतं. तेच मन उन्मत्त झाल्यानंतर अतिरेकी  होतं, तर तेच मन निर्विकार झाल्यानंतर अलौकिक सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतं. 

मनाच्या या शक्तीला पूर्ण क्षमतेने उपयोगात आणून, या देहाच्या मोबाईल, कॉम्प्युटर आणि सर्व व्यवस्थेचा सक्षम वापर करून, बाह्य जगतातील देहरहित शक्तींशी संपर्क साधून, आपण त्या प्रगत लोकांशी संवाद साधू शकतो. त्यासाठीचं माध्यम व तंत्रज्ञान विकसित करून, त्याचा नित्यनेमाने वापर करण्यात, या भूमीतील, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ म्हणजेच, ऋषीमुनी, बाह्य जगताशी नित्य संपर्कात होते. त्या जगतातील अतिप्रगत व अतिशक्तीमान पंचमहाभूत रुप देह नसलेल्या, शक्तींशी संपर्क, आधुनिक जगतातील मानव अजून साधू  शकलेला नाही. 

पण प्रगत तंत्राद्वारे सर्वोत्तम संपर्कव्यवस्था व अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त केलेले आणि अतिविकसित असे,  ते जीव व जिवात्मे, नित्य या ऋषीमुनींच्या संपर्कात असायचे. अश्या सक्षम व्यवस्थेसाठी मनाची उच्चावस्था प्राप्त करुन घेणं हे खूप कठीणतम कार्य आहे. पण मन हे इतकं सक्षम माध्यम आहे की, ते हे काम घडवून आणू शकतं. यासाठी मनाला विशिष्ट प्रकारच्या गती, वाता वरण रहित स्थितीत नेणं जरुरी असते.

अश्या स्थितीलाच वेद पुराण इत्यादींनी निर्गुण व निराकार स्थिती अशी संज्ञा दिली आहे. या अवस्थेप्रत जाणं गरजेचं आहे, कारण ज्या शक्तींशी आपल्याला संपर्क प्रस्थापित करायचा आहे, ते निर्गुण व निराकार स्थितीत आहेत. याच अवस्थेला ज्ञानोबा माऊली, देही असोन विदेही, अश्या संज्ञेने संबोधतात. निर्गुण निराकार ब्रम्ह, जे या जगताच्या निर्मितीचं कारण आहे आणि तरीही ते ब्रम्ह,  या त्रिमिती जगतातून भिन्न आहे.  

त्या ब्रह्मतत्वाशी, संपर्क हा फक्त मन या इंद्रियाच्या माध्यमातून आणि एकाग्रतेची, परमोच्च स्थिती प्राप्त करून, त्या मनाला निर्गुण निराकार स्थितीत नेऊन, त्याला त्या स्थितीत राहण्यात यश मिळवून, त्या लयीची, स्थितीची वा शून्यत्वाची अवस्था, काळविरहित स्थितीप्रत नेल्यास, पारलौकिक जगातील, शक्तींशी संपर्क प्रस्थापित करता येतो.

हे उच्चकोटीचं तंत्र विकसित करून, त्या ज्ञानाचा उपयोग, या देहाच्या पलीकडे असलेल्या शक्तींपासून लाभ करून घेत, अखिल मानव जातीचं कल्याण साधण्याची क्षमता व कार्य, अद्भुततेने, पूर्वीचे ऋषीमुनी सहजी करत असत. त्यासाठीचं तंत्र त्यांनी विकसित करून, ते या जगतातील, सामान्य माणसाला योगयाग, कर्मकांड, यज्ञयाग, नवविधा भक्तीच्या माध्यमात जनसामान्यांना सुलभ करून दिलं.

यावर अजून विवेचन पुढील भागात करू. तोपर्यंत नामाच्या माध्यमात रहा, कार्यसिद्ध होत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...