Skip to main content

भोग आणि ईश्वर २६६

भोग आणि ईश्वर  २६६

बहुमिती आणि अतर्क्य किंवा गुह्य जगतातून, या भूलोकी आलेला आत्मा, पुन्हा त्याच जगतात परत जावा, हा उद्देश विधात्याने आत्मतत्त्व या लोकी पाठवताना, योजला. नव्हे हाच संकल्प विधात्याने योजला, सर्व सृष्टी निर्माण करताना. यासाठी पंचमहाभूतरुप देह निर्माण करून एकप्रकारे आत्म्याला परतीच्या प्रवासासाठी इंद्रियांनी युक्त अशी एक सुसज्ज यंत्रणा दिली. 

या यंत्रणेला आपल्या स्वतःच्या बळावर हा योग किंवा हे कार्य साधणं शक्य नव्हतं. हे जाणूनच, विधात्याने आपला हुकुमाचा एक्का दिला.  म्हणजेच या सर्वातून हा देहाचा डोलारा घेऊन बुद्धीच्या सहाय्याने आत्म्याची शुद्धता साधत परम ईश्वराला पुन्हा भेटण्यासाठी जावं, यासाठी. तो एक्का म्हणजे मन. पुन्हा पुन्हा येऊन, सांगितलं की, इंद्रियांमध्ये मी मन आहे, म्हणजे त्या मनाचं महत्व अधोरेखित होईल. 

हा देह प्रारब्धाचे चटके, भोग व उपभोग यात गुंतलेला असताना, याच्या जाळ्यात अडकता व चित्ताची शुद्धता राखत, आत्म्याला निजधामी पोचवण्याची नैतिक जबाबदारी, मनाचीच आहे. खरतर मनाचं सामर्थ्य, आवेग, आवाका इतका प्रचंड आहे की, तेच मन प्रसंगी हळवेपणाची सीमा गाठतं, तर प्रसंगी कठोरतेची वा क्रौर्याची सुद्धा परिसीमा गाठू शकतं. 

आपण कधी क्रोध आल्यावर एका गोष्टीची नोंद घेतली असेल की, त्या क्षणी शरीरात अतिरिक्त ऊर्जा व रक्त प्रवाह यांचा संचार होतो आणि काही विशिष्ट स्त्राव शरीरात पाझरून, शरीराला अनियंत्रित बळ प्राप्त होतं. हे बळ वा शक्ती बाहेरून कुठूनतरी आली का, तर नक्कीच नाही.  एखाद्या संकटसमयी आपण आपल्या क्षमते पेक्षा जास्त कार्य करतो किंवा आपल्याकडून ते करून घेतलं जातं. 

अश्या अनेक प्रसंगी, आपण म्हणतो की, नक्कीच देवाने ती अतिरिक्त शक्ती देऊन, माझ्या पाठीशी उभा राहिला. पण खरं पाहिलं तर, ती शक्ती, ऊर्जा, तेज, त्याने आपल्याकडे मनाच्या रुपात, दिलीच आहे. ती प्रसंगा नुरूप माणसाला, त्याच्या शक्ती बाहेरील गोष्टी करण्यास प्रवृत्त करते आणि त्या त्या प्रसंगापूरते आवश्यक शारीरिक व मानसिक बदल, घडवून आणते. 

मनाच्या या शक्तीला प्रसंगोपात वापरून, सोडून देण्याऐवजी, त्या उर्जेला, शक्तीला आपण योग्य मार्गाने, योग्य गतीने, योग्य दिशेला नेत गेलो व त्याचा नियमित सराव करत गेलो, तर मनाच्या या अफाट शक्तीचा वापर, आपण उन्नती व उद्धार यांसाठी, करून घेऊ शकतो. नियमित व नियमबद्ध पद्धतीने मनाला योग्य दिशेने, योग्य पद्धतीने वळवून, त्या मनाच्या अत्युच्च नैसर्गिक शक्तीला जागृत करणं गरजेचं आहे. 

प्रसंगानुरूप उद्दीपित होऊन, कार्य करणारं मन, योग्य दिशेने केंद्रित करून, योग्य गतीने व ठराविक काळ, ठराविक वेळ त्याला शिक्षित करत गेल्यास, उत्तम कार्य घडून, नैसर्गिक ऊर्जा व बल यांचं सुनियोजित चलन होऊन, आपण मनाकडून, आत्म्यासाठी उत्तम कार्य अर्थात कर्म करवून घेऊ शकतो. त्या मनातील अग्नीला जागृत करून, त्याद्वारे, आत्मचिंतन यज्ञ, आपण साधू शकतो. 

मनाच्या या ऊर्जा, शक्ती व तेज यावर उद्या विचार करूया. पण ते जाणण्याचा प्रयत्न करत असताना, नामस्मरण हे सुरूच राहू दे. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...