Skip to main content

भोग आणि ईश्वर २६०

भोग आणि ईश्वर  २६०

आत्मा आणि देह हे दोन भिन्न घटक आहेत आणि काही विशिष्ट परिस्थितीत आणि कारणांसाठी ते एकत्र आलेत. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असाही होतो का, की सदर एकत्रीकरण हे काही उद्देश्यपूर्तीसाठी आणि उद्देशापर्यंत आहे. ती उद्देश्य काय हे आपण पाहूया, मगच पुढे जाऊ. 

उद्देश्य म्हणजे अनेकवचनी शब्द आहे. म्हणजेच यांच्या एकत्र येण्याचा व काही काळ सहवासाचा नक्कीच काही तरी हेतू असणार. एक देह सोडल्यानंतर आत्मतत्त्व हे नवीन देहाच्या व त्या देहधारणेसाठीच्या अनुकूल वेळे पर्यंत अविरत प्रयत्नशील राहून फिरत असतो. इथे काही गोष्टी ज्ञानासाठी आवश्यक म्हणून मुद्दाम सांगतो.

आत्मा हा चैतन्यमय असल्यामुळे व लहरी वा तरंग या स्वरूपात असल्याकारणाने, त्याला नवीन देह धारणे साठी माध्यम लागतं. ते म्हणजे वीर्य. कारण जन्मासाठी विधात्याने केलेली ती व्यवस्था आहे आणि सर्व प्राणीमात्र देहधारणेसाठी, त्या व्यवस्थेचा भाग आहेत. आता तिथ पर्यंत पोचण्यासाठी पुन्हा अजून एक माध्यम जरुरी आहे. 

चैतन्यशक्ती ही लहरींसम असल्यामुळे खरंतर हवेतून, प्राणीदेहात जाऊन, देहधारणेसाठी विर्यतत्वात प्रवेश करू शकतात का. तर नाही. कारण त्यांना त्यासाठी माध्यम जरुरी आहे. शक्ती असूनही, तशी व्यवस्था विधात्याने, निर्माण केलेली आहे. मग काय माध्यम असेल. तर, सर्व प्राणीमात्र हे अन्न पाणी या मुख्य घटकां तून जीवन मूल्य प्राप्त करून, जगतात. म्हणजे अन्न व पाणी या माध्यमातून ही चैतन्यशक्ती देहात प्रवेश करून आपलं कार्य साध्य करून घेते.

यात पुन्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सदर माध्यम हे सात्विक असेल तर, फक्त सात्विक व पुण्यवान आत्मेच, या माध्यमातून पुरुषदेहात प्रवेश करतात. म्हणून नैष्ठीक ब्रम्हचर्य पालन करणारे, फक्त सात्विक अन्नसेवन करतात.  पण म्हणजेच राजसी व तामसी अन्नातून, त्या त्या आत्मतत्वाला प्रवेश प्राप्त होऊ शकतो. आपण अन्न घेतल्या नंतर, त्याचं पचन शरीराकडून होतं आणि त्या त्या जीवन सत्व व अन्नातील मूल्यांना, शरीरातील त्या त्या इंद्रियात वा भागात, रक्ता मार्फत पोचवलं जातं.

या प्रक्रियेतून शक्ती, आपल्या इष्ट स्थानी जाऊन आपला कार्यभाग साधून, देहधारणा प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. अर्थात यातील यश व अपयश हे पुन्हा, त्या आत्म्या
सोबत असलेल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. म्हणजे एका देहप्राप्तीसाठी, एका आत्मशक्तीला किती प्रयास पडत असतील, याचा अंदाज येईल.

यात पुन्हा प्रारब्धाने चुकीच्या देहात प्रवेश झाला तर, पुन्हा त्या देहाच्या कर्माचा भार, सोबत घेऊन, पुन्हा नवीन देहप्राप्तीसाठी प्रयास आणि त्या देहात जाऊन, पुन्हा भोग उपभोग यांच्या चक्रात फिरून, पुन्हा एकदा, देह प्राप्तीसाठी प्रयास करणं, हा नित्याचा खेळ, करत बसणं, हे चक्र तयार होतं. म्हणजे एका देहाचे खेळ वा चुका या त्या आत्म्याला पुन्हा पून्हा जन्म घेऊन, तेच कर्मफल, प्रारब्ध, संचित या फेऱ्यात अडकवू शकतं.

म्हणजे विचार करा, आपण किती हेतुपूर्वक व सावधान राहून, प्रत्येक कृती करणं गरजेचं आहे. आता या दोघांना म्हणजे, देह व आत्मा यांना,आपल्या विशिष्ट जबाबदाऱ्या उद्देश्य असणार किंवा आहेच. आत्म्याचं उद्देश प्राप्त प्रारब्ध व संचितातील जास्तीत जास्त भोग संपवून, निर्माता ईश्वर, याच्या चरणी देहाला स्थिर ठेवून, त्या देहा कडून, अश्या कर्मांची अपेक्षा करणं, ज्यायोगे, भोग भोगत असतानासुद्धा बुद्धी व मन स्थिर राहून, उद्देश्यपूर्ती साठी, वाटचाल होत राहील.

विषयाचा आवाका पाहता, एका लेखात पूर्ण होणार नाही म्हणून उद्या यावर पुढे चर्चा करू, आज इथेच थांबू. पण नित्य नाम घेत रहा, आत्म्याच्या खऱ्या उद्देश्यपूर्तीसाठी देहाने कार्यरत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...