Skip to main content

भोग आणि ईश्वर २५१

भोग आणि ईश्वर  २५१

खूपवेळा असं होतं की, आपण नाम घेत असतो आणि आपलं मन भलताच विचार करत असतं. अशावेळी खरच आपण करत असलेल्या नामाचा लाभ होतो की, ते हवेत मारलेल्या तीर किंवा बाणाप्रमाणे विरून जातं, हा एक प्रश्न काय मनाला सतावत असतो. कारण आपण सांसारिक जीव असल्याकारणाने, विरक्त व वैराग्यपूर्ण जीवन जगणाऱ्यांप्रमाणे, आपण निर्विकार वा निर्विचार होऊ शकत नाही, म्हणजे पूर्णपणे विचाररहीत होणं अवघड आहे. 

यावर विचार करण्याआधी एक गोष्ट ध्यानात घ्या की, ईश्वराने या गोष्टीचा विचार केला नसेल असं शक्य नाही. कारण या सर्वांचा कर्ता धर्ता आणि हर्ता तोच आहे. म्हणजे मन निर्माण करताना किंवा, मनरुपात मानवी देहाचा भाग म्हणून प्रस्थापित होत असताना, ईश्वराला देह, देहाच्या मर्यादा, त्याच्या जबाबदाऱ्या, त्यावरील माया व इतर अनिष्ट गोष्टी व विकार यांचा होणारा प्रभाव, माहीतच असणार. 

दुसरं महत्वाचं तत्व लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे ईश्वराने गीतेत सांगताना काही गोष्टी स्पष्ट केल्यात, त्या म्हणजे, मनाचा व्यापार, बुद्धीची गणितं, देहाच्या अवस्था, या सर्व सांभाळणं, हे अत्यंत कठीण आहे. त्यात प्रत्येकाला आपलं मन आपल्या इच्छेनुसार वळवणं जमणार नाही. बरं हे इतकंच आहे वा असेल तर ठीक. पण या सर्व व्यापात, पुन्हा पूर्वकर्मांचा फलरूप येणारा वेढा व त्या जोडीला, निसर्गाच्या चक्राचा परिणाम देखील आहेच. मग सांसारिक जीव भरकटला नाही तरच नवल.

असा भरकटलेला जीव हा भावसागराच्या वादळात, सापडलेल्या एखाद्या नौकेप्रमाणे असतो. मग त्यावर दोनच शक्यता दिसतात. एक म्हणजे प्रारब्ध, संचित आणि वर्तमान कर्म या चक्रात, जन्मोजन्मी, अडकत जाणं आणि ज्यावेळी त्या जीवाला बुद्धी व प्रेरणा मिळेल,  त्यावेळी तो जीव किनाऱ्याकडे येण्यासाठी निघेल. जेंव्हा तो किनाऱ्याच्या शोधात निघेल, किंवा असा शोध सुरू करेल, त्यावेळी तो योग्य अयोग्य याचा विचार कदाचित करेल.

पण असा विचार आलाच नाही आणि कर्मभोग आणि कर्म करत राहून, असंच जन्मोजन्मी भटकत तो राहील. कारण खूपवेळा आपण कुठे जातोय, का जातोय, पुढे जावं की, न जावं, हे देखील सुचत नाही. जसं कुरुक्षेत्रा वरील युद्धात अर्जुनाला प्रश्न पडला, त्यातून त्याला विषाद निर्माण झाला आणि नन्तर त्याच्या बुद्धीने त्याला तो मधुसूदनाला विचारायची प्रेरणा दिली. पण प्रत्येक जीव हा अर्जुन असेलच असं नाही. 

अर्जुनासारखं व्यक्तित्व, युगायुगात एकदा जन्माला येतं. अन्यथा बाकी सारे जीव हे, त्याच चक्रात पिचूनसुद्धा त्यांना हे सुचतच नाही की हे काहीतरी चुकीचं घडतंय आणि यावर काही उपाय असू शकतो. साधारण अशीच स्थिती, बाराव्या शतकाच्या आसपास होती. सर्वसामान्य जीवाला हेदेखील माहीत नव्हतं की, आपण जगतोय ते जीवन, एका प्राण्यासामान आहे. या जीवनचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. 

हा उपाय,  युगानुयुगापूर्वीच प्रत्यक्ष ईश्वराने, वेद, शास्त्रं, पुराणं इत्यादी माध्यमातून, स्वतः, विविध रुपात येऊन, शास्त्रबद्ध, समीकरणात मांडून सर्वांसाठी लिहून ठेवला आहे. पण ज्यावेळी ही स्थिती बदलत बदलत गेली आणि हे ज्ञान संकुचित झालं आणि सामान्य माणूस हा या ज्ञाना पासून वंचित राहिला, हे ईश्वराला जाणवलं, दिसलं, त्यावेळी त्याने स्वतः हे सर्व पुनः जनसामान्यांना पोचवण्याची व्यवस्था केली. 

यावर आणि पहिल्या परिच्छेदात सुरू केलेल्या विषयाच्या उत्तराचं चिंतन, उद्या आपण सुरू ठेवू. पण आपलं नित्यनैमित्तिक नाम घेत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...