Skip to main content

भोग आणि ईश्वर २४५

भोग आणि ईश्वर  २४५

मनाच्या अवस्थेनुसार आपली नामातील गती अवलंबून आहे, हे तर वादातीत सत्य आहे. पण मनाची अवस्था ही आपल्याबाबत आणि आपल्या सभोवती घडणाऱ्या, छोट्या ते मोठ्या,  अश्या सर्व घटनांवर मुख्यतः अवलंबून असते. म्हणजेच नामातील एकाग्रता ही आपल्या सभोवती घडणाऱ्या घटना ठरवतात असं अप्रत्यक्षपणे म्हणता येऊ शकेल. यातील सभोवती घडणाऱ्या घटना या वस्तुतः आपल्याच कर्माचा फलस्वरूप परिणाम असतो, हे अजून एक सत्य आहे, मान्य असो वा नसो.

परंतु यातील घडत असलेल्या  घटना म्हणजे,   आपण केलेली कर्म, आपल्या हातून आधीच घडून गेलेली असल्यामुळे, त्यावर आपलं नियंत्रण असूच शकत नाही. पण म्हणजे एकाग्रता होऊच शकत नाही असा अर्थ घ्यायचा का. याचं उत्तर नक्कीच नाही असं देता येईल. कारण विधात्याने मनाच्या माध्यमातून व मनाच्या ऊर्जा व शक्ती याद्वारे, बुद्धीचा उपयुक्त वापर करून, विवेकाचा दोर हाती ठेवण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता दोन्ही मानवी देहात दिलेलं आहे. 

पण कर्मगती आणि माया, यांचा फेरा इतका प्रभावी असतो, की ते माणसाला, प्रत्येक क्षणी व वर्तमानातील प्रत्येक कर्म आणि वर्तमान व भविष्यातील प्रत्येक फलाच्या वेळी, सतत मागे ओढण्याचा किंवा प्रवाहात ओढण्याचा प्रयत्न करत असतात आणि करत राहणार. वृत्तीतील विकार हे आणखी काही दानव आहेत, जे मनाला स्वस्थता लाभणार नाही, याची पूर्ण व्यवस्था करतात. 

आता या सर्व चक्रात नामासाठी व नामात एकाग्रता मिळवणं परम कठीण होत जातं. पण म्हणून काहीच शक्य नाही, असा यातून निष्कर्ष काढायचा नाही. यात सर्वात महत्वाचं जे आपल्या हाती आहे, ते म्हणजे, विचार आणि बुद्धी. किंबहुना अश्या तापदायक, त्रास दायक आणि दुःख व भोगातिरेकाच्या प्रसंगांमध्ये नामच एक उत्तम जडिबुटी वा औषधी मुळी आहे. तुम्ही प्रयोग करून बघू शकता. 

ज्यावेळी मनःस्थिती ठीक नसते आणि मनःस्वास्थ्य नकारात्मक स्थितीत असतं, त्यावेळी, थोडे क्षण शांत राहून, नाम घेण्याचा प्रयत्न करा, कारण उद्विग्न वा अस्वस्थ अथवा क्रोधाच्या मनःस्थितीत घेतलेला कोणताही निर्णय हा नेहमीच नकारात्मक परिणाम करणारा असू शकतो. म्हणून मनःस्थिती पूर्ववत आणण्यासाठीसुद्धा नामरूप मुळी, मनःस्थिती अस्वस्थ करणाऱ्या रिपुंवर एक रामबाण उपाय आहे. 

एकदा मनःस्थिती सामान्य झाली की, आपल्या हाती विवेकाची दोर आलीच म्हणून समजा. अश्या सामान्य स्थितीत मन आल्यानंतर, आपल्याला स्वतःलाच जाणवेल की, आपण अविवेकी होतो आणि सारासार विचार हरवून बसलो होतो.  म्हणजेच नाम हे सर्वसाध्य एक अत्यंत गुणकारी औषध आहे. भवाच्या आणि भवतापाच्या सर्व अडचणींवर पूर्ण लागू होऊ शकणाऱ्या या नामरूपी औषधाची मात्रा रोज अत्यंत योग्य प्रमाणात घेत गेल्यास, अश्या अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगात ते नक्कीच साथ देईल आणि लक्षात येईल. 

कारण ज्या ज्या गोष्टी आपण नित्य बोलत वा करत असतो, त्यांची आठवण, संकटात वा दुःखात होऊ शकते. म्हणूनही नाम नित्य घेत जा, दुःख, क्लेश देणाऱ्या घटनाकाळात या सद्गुरुकृपेने प्राप्त व ईश्वराचा सूक्ष्म अंश असलेलं हे नाम, मनाचा दाह नक्कीच कमी करेल व मनाला उभारी देऊन, विचार करायला उसंत देईल. त्या द्वारे विवेक ज्याला rational thinking म्हणतात, ते साध्य होतं. म्हणून संकटकाळात, दुःखात धैर्य आणि मनाला ऊर्जा व बल देण्यासाठी नाम हे नित्य घेतलं पाहिजे. 

याच विषयावर उद्या पुढे बोलूया. नाम घेत रहा, मनः स्वास्थ्य उत्तम ठेवत रहा, ते उत्तम मनःस्वास्थ्यच,  मनःस्थिती सुदृढ ठेवायला मदत करेल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...