Skip to main content

भोग आणि ईश्वर २७०

भोग आणि ईश्वर  २७०

काल म्हटल्याप्रमाणे आणि वेद, श्रुती, स्मृती पुराणं यातून , ईश्वराचं महात्म्य सांगताना, हे नेहमी सांगितलं जातं की, ईश्वर या जगताचा मातापिता, पालक, चालक असा सर्व काही आहे.  म्हणूनच समस्त सजीव व निर्जीव दोन्हीवरती तो मातृपितृवत प्रेम करतो. हे प्रेम सर्व जगता वर एकसमान आहे. खरतर एकाच समान धाग्याने हे जगत फक्त आणि फक्त ईश्वराभोवतीच गुंफलेलं आहे. आपण जगताच्या, जीवनाच्या आणि संसाराच्या तापात, भोगात बरेचवेळा हे दुर्लक्षित करतो किंवा विसरतो. 

या गोष्टीची जाणीव होणं, किंवा ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान. मी ईश्वरी अंशाचाच एक भाग आहे, माझं आणि ईश्वराचं, ज्याअर्थी मातापिता व पुत्र यासमान नातं आहे आणि मला ते स्मरत नसलं तरी,माझे माता व पिता म्हणून, ईश्वराला नक्कीच स्मरत आहे. विषय आहे तो मला स्मरण होण्याचा किंवा मी स्मरण करण्याचा. 

आपण हा विषय थोडा खोलात जाऊन बघूया. विचार करा की, या देशातील आई वडिलांचा मुलगा वा मुलगी दुरदेशात जाऊन, स्थायिक झाला आहे. कार्यबाहुल्या मुळे, मोहवश, लोभापायी, मायेच्या प्रभावात, त्याला मातापित्यांचं विस्मरण झालं. तरीही मातापिता, त्या पुत्राला वा कन्येला विसरू शकत नाहीत. म्हणजेच यांच्या प्रेमाच्या वा मनातील स्नेहाच्या लहरी, संदेश वा स्पंदनं, हे त्या पुत्र वा कन्येपर्यंत पोचत असणारच. कारण त्या स्पंदनांना वा लहरींना, हृदयाची व आत्म्याची भाषा अवगत असते. कदाचित विज्ञानाने हे सिद्ध केलं असेल किंवा काळाच्या ओघात ते सिद्ध होईल, 

की मनातून निघालेली स्पंदनं वा लहरी या ज्या मनातून निघालेल्या असतात,  व त्या लहरी, ज्यांच्यासाठी असतात, त्यांना शोधून तिथपर्यंत त्या पोचतात आणि आपलं कार्य करत असतात. म्हणूनच खूपवेळा असं सहज घडतं की, आपण एखाद्याचा किंवा एखाद्याबद्दल विचार करतो आणि त्याचाच किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तीचा संदेश फोन, आपल्याला त्याच सुमारास किंवा काही वेळातच, योगायोगाने,येतो. 

आपण त्यावेळी त्या व्यक्तीला म्हणतो सुद्धा की, अरे आताच तुझा विषय किंवा विचार डोक्यात आला आणि तुझा फोन आला. कदाचित बोलण्याच्या ओघात आपण म्हणतोसुद्धा की, बघ याला प्रेम म्हणतात. पण योगा योगाने घडलेल्या आणि योगायोग म्हणून आपण म्हटलेल्या, त्या मताला, वास्तविक वैज्ञानिक वा शास्त्रीय अर्थ आहे. कारण एखाद्याबद्दलच्या तीव्र विचारांच्या लहरी, ज्यावेळी मनातून निघतात वा उत्सर्जित केल्या
जातात, त्यावेळी त्या लहरी तितक्याच तीव्रतेने प्रवास करत, त्या व्यक्तीला शोधून काढत, त्याच्या मनात व मनातून बुद्धीत अर्थात देहात पोचतात. 

एक सहज संदर्भ म्हणून सांगतो की एखाद्याला मोहित संमोहित वा वश करण्याच्या शास्त्रमागे हेच तत्व आहे. अर्थात ते अभ्यासाने सिद्ध व्हावं लागतं. किंबहुना रेकी, प्राणिक हिलींग यासारख्या सर्व शास्त्रात, हेच वैज्ञानिक तत्व सामावलेलं आहे किंवा तोच त्यांचा आधार आहे.  अर्थात ते सिद्ध करण्यासाठी पुरेसा अभ्यास, सातत्य, चिकाटी, त्या शास्त्रावर पूर्ण श्रद्धा, आत्मविश्वास, विचारांवर संपूर्ण नियंत्रण, याबरोबरच तटस्थपणे कार्य करण्याची प्रवृत्ती वा वृत्ती असली पाहिजे. 

या लहरींच्या वा स्पंदनांच्या आधाराने आपले विचार वा आपले भाव आपण प्रसारित करू शकतो. पण त्याची तीव्रता,ही आपले भाव काय आहेत, किती खोलवर आहेत आणि त्याची मनातील व्याप्ती किती आहे, यावर अवलंबून आहे.  आपण जाणतो की, मन हे अवकाशा समान आहे. म्हणजेच एखाद्या तलाव, नदी वा सागरा प्रमाणे त्यातून विचार, इच्छा, आकांशा, प्रेम, सद्भाव, हेटाळणी, मत्सर, राग वा क्रोध, द्वेष, दंभ, मद, अहंकार, गर्व इत्यादींच्या लाटा उसळत असतात. 

या लाटांसदर्भात आणि लहरी नियंत्रणाच्या अभ्यासाबद्दल थोडं चिंतन, आपण उद्याच्या भागात करूया. तरीही आपला नामस्मरणाचा अभ्यास नित्य सुरूच राहुदेत. तोच ईश्वर आहे हे समजून असा.

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...