Skip to main content

भोग आणि ईश्वर २६४

भोग आणि ईश्वर  २६४

स्थूल पातळीवर आपण काल पाहिलं की, आज जे अत्याचार सहन करत आहेत, त्यांनी आधी अत्याचार केले होते आणि त्या कर्मफलाने पुढील काळात त्याचे परिणाम त्या जीवाला भोगावे लागतात. यात एक महत्वाची गोष्ट ही की, हा जीवाचा प्रवास एखाद्या गतिशील नदीच्या प्रवासाप्रमाणे आहे. किंवा एखाद्या इमारतीच्या जिन्यासमान आहे. 

नदी जशी प्रवाहानुसार वाहात जाते, जशी दिशा मिळेल, जसे मार्ग असतील, त्यानुसार पुढे जाते. जिन्यासमान म्हणजे आपण एखादी इमारत चढत असताना, त्यात अनेक मजले चढतो. आत्म्याचा प्रवास हा असाच आहे, प्रवाहप्रमाणे.  काळ फक्त या प्रवाहाला जाणतो, त्या जीवाला त्याच्या कर्मानुसार, त्या त्या कर्माचं फल समोर आणून ठेवतो. बदलणारे देह हे त्या नदीच्या मार्गाप्रमाणे आहेत किंवा बदलत जाणाऱ्या मजल्यांप्रमाणे आहेत. 

ते मजले जसे एकामागून एक येतात व जातात. किंवा नदीच्या प्रवाहात अनेक गोष्टी व अनेक टप्पे येतात आणि जातात. म्हणूनच,  एका देहाने केलेल्या कर्माचं फलित, भलताच देह भोगतो. ते फल सुख असेल किंवा दुःख असेल. तर्कसंगती लागो अथवा न लागो. पण नीट पाहिलं तर, ज्याअर्थी आपण भोगतो त्याअर्थी तत्वतः आपण केलं होतं हे नक्की. 

पण सरतेशेवटी सर्व गोष्टी मनाच्या द्वारी येऊनच थांबतं. कारण सर्व निर्णय, बुद्धी मन हेच घेतात आणि हे दोन्ही विचारा धीन असतात. विचार हे मनाला स्पर्श करून फक्त तरंग निर्माण करतात. त्या तरंगाच्या परिणामाने मनात जी आंदोलनं होतात त्यानुसार वा त्यावर आधारित असे, निर्णय घेतले जातात. मना तील हे तरंग आणि त्या विचारांच्या लहरी, मनाच्या खोलीचा वा स्पेसचा किती भाग व्यापतात, त्यावर त्या लहरींचे परिणाम अवलंबून असतात. 

मनाला, या कर्म व कर्मफलाच्या खेळात, अनन्यसाधारण महत्व आहे, याचं कारण ते एकबाजूला प्रत्यक्ष आत्म्याशी निगडित आहे आणि दुसऱ्या बाजूला देहाशी निगडित आहे. घडणाऱ्या गोष्टी, या मागील कर्माचा परिणाम आहेत आणि आता घडत असलेली कर्म पुढील परिणाम ठरवणार. या सर्वात मनाचा आलेख, एक सारखा ठेवून त्या मनाला कोणत्याही अनिष्ट तरंग लहरींच्या अधीन न होऊ देता, तोल सांभाळून देहाच्या व्यवहारात न गुंतता, आत्म्याच्या व्यवहाराचा विचार करायला लावणं, हे महत्वाचं काम, बुद्धी करू शकते. 

या बुद्धीला चालना वा चैतन्य आत्मा देतो. म्हणून देह जरी संसारात रमला असला तरी,मन त्यात गुंतू न देता बुद्धीच्या बळावर समतोल साधून, इथपर केलेला प्रवास पुढे न नेता, पुढे दुसरा विचार वा मार्ग शोधणं आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक जन्मात, पुढील जन्मांचा आणि जन्माच्या प्रारब्धाचा विचार करणं, हाच आत्मकल्याण साधण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. 

म्हणून अश्याच मार्गाच्या शोधार्थ अनेक शास्त्रज्ञ कामाला लागले, त्यांनी तो मार्ग शोधून काढला, त्या मार्गाच्या खाचाखोचा माहीत करून घेतल्या आणि आपल्यापुढे त्यातील सर्वोत्तम मार्ग वेचून ठेवले. यावर उद्या चर्चा करूया. तोपर्यंत सर्वात सोपा उपाय आपण करत राहूया, नाम घेत राहू, मार्गात पुढे पुढे जात राहू. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...