Skip to main content

भोग आणि ईश्वर २५३

भोग आणि ईश्वर  २५३

 भोगाच्या वाटेवर किंवा उपभोगाच्या राजमार्गावर, मन हे नेहमी आपल्याच विचारात असतं. त्यातून, म्हणजे मनातून, जे विचार येतील, त्यामागे आपण कायम ओढले जातो. कोणतीही चांगली, सात्विक, शुभ गोष्ट करण्याचं योजताना,  मन सर्वात प्रथम साशंकता हे आपलं पहिलं आणि नकारात्मकता हे दुसरं हत्यार परजतं. आपण कोणतीही शुभ, सात्विक, चांगली गोष्ट करताना ती नीट होईल का हा विचार करतो.

याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे, आत्मविश्वास व श्रद्धा यांचा अभाव. किंबहुना या अभावामुळेच मन नकारात्मक व साशंकता या अवगुणांना नेहमी सर्वात पुढे करतं. आता मन करतं म्हणजे आपणच, असा एक सहज विचार येईल. वास्तविक अर्थाने तसंच असायला हवं. म्हणजे आपणच नकारात्मक व साशंक असतो का किंवा आहोत का. याचा खोलात जाऊन विचार केला तर हे लक्षात  येईल की, खूपवेळा मन आणि आपण भिन्न आहोत असा भास काही काही वेळा होईल. कारण आपण म्हणजे देह, की बुद्धी की मन की आत्मा. यावर नन्तर विचार करू. 

म्हणजे आपण वेगळंच योजन करत असताना, मन मात्र वेगळ्या दिशेने चालत असतं. त्याच्याबरोबर ते आपल्याला सुद्धा सोबत घेऊन जात असतं. बरेचदा आपण असे ओढले जातोय, हे आपल्याला जाणवत देखील नाही. म्हणजेच आपण त्या मनाच्या तरंगावर आपसूक स्वार होतो आणि मन वायूवेगाने आपल्याला नकारात्मक जगात सफर घडवून आणतं. 

ज्याला इंग्लिशमध्ये got carried away म्हणतात तसं. तुम्ही आठवून बघा, ज्यावेळी मन असं नकारात्मक विचारात बुद्धी आणि देह यांना गुंतवून ठेवतं, त्यावेळी त्या विचारात हरवून गेल्यानंतर, भानावर आल्यानंतर, आपल्याला प्रचंड थकवा जाणवतो. नव्हे आपण खरच थकलेले असतो, देहाने अर्थात ,  physically सुद्धा. कारण विचार दौडतात म्हणजे काय होतं, तर त्यावेळी काही विशिष्ट घातक हार्मोन्स अर्थात दोषपूर्ण रस नसांमधून पाझरून सर्व शरीरात पसरतात. ते पसरण्या साठी रक्तसुद्धा वेगाने दौडत असतं.

म्हणजे जे धर्मशास्त्रात लिहिलं आहे किंवा वेद पुराणं यात म्हटलं आहे, नेहमी चांगले, शुद्ध, शुभ व सात्विक आणि सकस विचार करा, त्याला शास्त्राधार आहे. अर्थात आपल्याला आज कळलं, पण पूर्वजांना आधीच माहीत होतं. तेसुद्धा त्यांनी त्या काळात मांडून ठेवलं, त्याकाळात तणावाची साधनं, इतकी विकसित नव्हती आणि जीवन शैली, आजच्या मानाने कित्येकपट, साधी आणि सोपी होती आणि इच्छा आकांक्षा फार नव्हत्या किंवा नसायच्या. माणसं फार ध्येयासक्त किंवा ambitious नव्हती. 

म्हणजे ध्येय असणं यात काहीच गैर नाही. पण ते सकारात्मक विचारांनी आणि मार्गाने साध्य करता येणारं असावं. ध्येयासक्ती ही काही चांगलं मिळवण्याची असावी, ज्यामुळे मनाला नकारात्मक मार्गाने व विचाराने जावं लागणार नाही. कारण ध्येयाचा पाठलाग करताना सुद्धा मन, बुद्धी व देह सुदृढ, निरोगी व सात्विक असणं गरजेचं आहे. इथे सात्विकता ही खाण्याची नव्हे,  पण शारीरिला सशक्त व मनाला उभारी देणारी असावी. 

म्हणजेच आपण ध्येयाने प्रेरित असो वा साधे जीवन जगणारे असो, नकारात्मक विचार व मनाची त्यामागे आपल्याला घेऊन जाण्याची सक्ती असो, त्रास देह बुद्धी व मन याद्वारे आत्म्याला सुद्धा होतो. यासाठी मुळात नकारात्मक व साशंक मनःस्थिती असेल त्यावेळी, कोणताही दुसरा विचार न करता, प्रथम मनाला सशक्त, सकारात्मक करण्याला प्राधान्य द्यावं. कारण आपण त्या मनःस्थितीत काहीही विचार वा कृती केली , तरी ती अपूर्ण प्रयत्नाने केलेली आणि चुकीचे परिणाम देणारीच होते. 

म्हणून आपण विचार सुरू केला किंवा मनाने आपल्याला विचारात ओढत नेण्याचा प्रयत्न केलाच, तर सर्वात प्रथम सावध होऊन, शांत बसावं. अशी शांतता तोपर्यंत असावी जोपर्यंत ते विचार आपला माग किंवा पिच्छा सोडत नाहीत. पण असे येणारे विचार बदलता किंवा थांबवता येतात का. यावर उद्या विचार करू. पण नाम घेतच रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...