Skip to main content

भोग आणि ईश्वर २५६

भोग आणि ईश्वर २५६

खरतर सद्गुरुचरणी स्थिर राहून, आपलं किंबहुना आपल्या आत्म्याचं, हित साधण्यासाठी नामस्मरण हा एकमेव उत्तम मार्ग, सहजसाध्य आणि अत्यंत परिणाम कारक आहे. याची जाणीव जागृत होणं किंवा जाणं येणं किंवा ज्ञान येणं हे मात्र सद्भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे मुळात आपल्याला असलेल्या सर्व समस्या, या भौतिक मार्गाने सिद्ध करता येण्याजोग्या नसून, काही समस्या या पूर्वकर्मांचा परिणाम आहे, हे मान्य करून पुढे गेल्यासच काही मार्ग वा उत्तरं शोधणं शक्य होईल.

हे मान्य केल्यानंतर , यात पूर्वकर्मात काही सुधारणा शक्य नाही, मग जे घडतंय वा ज्या चक्रातून आपण जात आहोत, त्या चक्रातून, मन बुद्धी व देह या माध्यमातून आत्मतत्वाला वा आत्म्याला बाहेर काढून, पुढे घेऊन जाण्याबाबत काही करता येऊ शकेल. मी बरेचवेळा या आधीच्या लेखांमध्ये किंवा आता दोन ते तीन वेळा हे म्हटलं की, देह, बुद्धी आणि मन यांच्या सहाय्याने आपण आत्म्याला पुढे न्यायचं आहे.

याचा सरळसरळ अर्थ हा आहे, किंवा बोलण्याचा उद्देश हा आहे किंवा इथपर्यंत ह्या मालिकेतील लेख वाचून व त्यांचं चिंतन करून, हे लक्षात आलं असेल की, आपण म्हणजे देह ही आपली मानसिकता चुकीची आहे. याचं खूप महत्वाचं कारण, कर्ममार्गाचा व कर्मफलाचा नीट अभ्यास केल्यानंतर आणि कित्येकवेळा आपण त्याचा अनुभव घेतल्यानंतर काही गोष्टी लक्षात, जाणिवेत आल्याच असतील.

एक अत्यंत सोप्प उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लक्षात येईल. आपण अनेक भोग, दुःख, मनस्ताप, किंवा उपभोग लाभ असे अनुभवतो की, त्याचा वास्तविक अर्थाने, या जन्मातील कोणत्याही ज्ञात वा अज्ञात गोष्टींशी संबंध नसतो. तो तसा नसतो हे सिद्ध देखील करता येऊ शकतं. जसं आपल्याला एखाद्या अज्ञात वा नवीन स्थळी किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात आजू बाजूला एखादी अनोळखी व्यक्ती सहाय्यक बनून येते किंवा ताप देऊन जाते.

आपल्याला एखादी अडचण येते आणि एखादा सत्शील सद्गृहस्थ, आपल्याला सहज मदत करून आपलं काम सुलभ करून जातो. अगदी पत्ता शोधताना तर नक्कीच एखादा अनोळखी कधी मदत करतो किंवा कधी काम वाढवून ठेवतो. अश्यावेळी जी व्यक्ती आयुष्यात कधीही भेटलीच नाही, ती काम सुलभ करून किंवा वाढवून का जाते.

म्हणजे कुठेतरी आपण त्या व्यक्तीला नक्कीच या आधी भेटलो असणार, काहीतरी मदत आपण केलीच असणार, ज्याचे ऋण त्या व्यक्तीने फेडले. एखादं विरुद्ध उदाहरण घेऊ. जगात इतक्या व्यक्ती आहेत, इतके व्यवहार होतात पण काही व्यक्तीच, एखाद्या व्यक्तीकडून फसवल्या जातात आणि काही व्यक्ती फसतात. अगदी बँकिंग व्यवहारातसुद्धा आपण बघतो की, काही व्यक्ती कमालीच्या सरळ स्वभावी असतात आणि नेमक्या एखाद्या अट्टल गुन्हेगाराच्या तावडीत बरोबर सापडतात.

अशी अनेक उदाहरणं घेता येतील, ही वानगीदाखल काही सांगितली. पण म्हणजेच यातून हे सिद्धच होतं की, आपण म्हणजेच या देहाने, या जन्मात न केलेल्या गोष्टींचा लाभ मिळतो अथवा तोटा या जन्मात या देहाला भोगावा लागतो. पण असं का. याचं उत्तर कर्मबंधनात मिळतं. जे कधीतरी कोणत्यातरी देहाने केलेलं असतं, जे आत्म्याने आपल्या सोबत ऋण म्हणून वा धन म्हणून पुढे आणलं जातं आणि सदर व्यक्ती जेंव्हा आणि ज्यारूपात समोर येईल, त्या वेळी ते धन परत केलं जातं वा ऋण फेडून घेतलं जातं.

या सर्वाचा एकूण विवेचनाशी काय संबंध हे उद्या पाहू, आज इथेच थांबू. पण या देहाने आत्म्याचे ऋण फेडत रहा, नामरूपात.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...