Skip to main content

भोग आणि ईश्वर २६२

भोग आणि ईश्वर  २६२

कालचा विषय पुढे नेऊया. आत्मा जो चैतन्यरूपात अनंतात भ्रमण करत असतो, त्यावेळी त्याला असलेलं ज्ञान, अनुभवातून आलेलं शहाणपण, शांतपणा, गांभीर्य किंवा या विरुद्ध प्रवृत्तीचे संस्कार, हे सर्व, देहात प्रवेश करताच, पूर्ण लुप्त, वा विस्मृतीत जातं का.? तर याचं उत्तर नाही असंच देता येईल. याचं कारण असं की, देहात आल्यानंतर वयाच्या तीन ते चार वर्षापर्यंत, आधीच्या जन्मापर्यंत मिळालेलं ज्ञान, अनुभवांचं गाठोडं हे सर्व हळूहळू विस्मृतीत जातं. 

म्हणजे बाह्य जगताचे जसे संस्कार घडत जातील, तसतसं ते आधीचं ज्ञान वा अनुभवांचं संचित, मागे पडत जातं. माणूस या देहातील सर्व अवस्थांमध्ये झिरपत जातो. हळूहळू या देहातील गुण व अवगुण आत्म्याच्या मूळ संस्कारांना मागे सोडत जातात आणि देहाचे संस्कार वा त्या संस्कारांची पुटं आत्म्याच्या संस्कारांवर चढत जातात. परिणामस्वरूप एक भिन्न व्यक्तित्व उदयाला येतं. 

असे हे संस्कार जे लुप्त झालेत, ते सुप्त मनाच्या कोपऱ्यात पार मागे जाऊन बसतात. बाह्यांगी भिन्न व्यक्ती, अंतरात भिन्न असू शकते. यामध्ये देहाच्या संस्काराने, मूळ आत्मव्यक्तित्वात फक्त  नकारात्मक बदलच होतात, असा निष्कर्ष काढू नका. तर हे बदल मूळ नकारात्मक व्यक्तित्वा वर झालेले सकारात्मक बदलसुद्धा असू शकतात. 


म्हणजे बाहेरील संस्कार हे, आपल्याला दिसणाऱ्या व्यक्तीच्या, आपल्यासमोर सादर झालेल्या, रूपातून आपण काढलेलं अनुमान आहे. पण आतील मूळ स्वरूप वा प्रवृत्ती भिन्न असू शकते. अशी आतील भिन्न प्रकृती वा प्रवृत्ती एखाद्या वेळी आलेल्या, आणीबाणीच्या प्रसंगात दिसून येते आणि आपण आश्चर्याने म्हणतो की, तो असा वागेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे अश्या गंभीर आणि समर प्रसंगी माणूस आपल्या मूळ वृत्तीवर येतो, जो आत्म्याचा मूळ संस्कार आहे. 

कारण सुप्त मनाची प्रवृत्ती वा वागणं हे अश्या प्रसंगीच बाहेर येतं, ज्यावेळी बाह्य वा जागृत मन गोंधळून जातं किंवा त्यावर एखाद्या गोष्टीचा धक्का बसतो. म्हणूनच एखाद्या धक्कादायक वा दुःखद प्रसंगात भलेभले भावनिक होतात, त्यावेळी  अनपेक्षित, एखादी व्यक्ती, खूप धीराने व शांतचित्ताने त्यातून सावरून, इतरांनाही सावरण्यास मदत करते किंवा उदाहरण घालून देते. म्हणजे हे झाले आत्म्याचे मूळ संस्कार. 

पण म्हणजे यातून एक निष्कर्ष काढता येतो की, आत्म्याचे मूळ संस्कार बाहेर येऊ शकतात, एखाद्या प्रसंगांमध्ये किंवा प्रयत्न पूर्वक. एखाद्या प्रसंगात म्हणजे धक्का वा शक्तीचा किंवा आघात यांचा परिणाम म्हणून, पण येतात वा येऊ शकतात. आता हे अचानक येणारे संस्कार हे प्रारब्धातील योगांवर अवलंबून आहेत. 

त्यावर विचार करण्याआधी आपण हे संस्कार काय असतात आणि ते इष्ट असतील तर, त्यांना बाहेर काढून वा ते अनिष्ट असतील तर, त्यांना सुधारून, या जन्मात ते पुढे नेऊन, पुढील जन्मासाठीची तयारी नक्कीच करता येऊ शकेल. पण याचं चिंतन आपण पुढील भागात करूया. तोपर्यंत नामाचे संस्कार, आपल्या देहात स्थित आत्म्यावर, करण्याचं आपलं कर्तव्य आपण नित्य करत राहूया. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...