Skip to main content

भोग आणि ईश्वर २६५



भोग आणि ईश्वर  २६५

विश्वाच्या रचनेचे गूढ खरतर त्याचक्षणी उलगडलं, ज्यावेळी सर्व सृष्टीची रचना समजली. कारण इतकी गणितीय नियमात्मक, प्रमेयात्मक, कलाकौशल्याने युक्त, सजीव, अखंड प्रवाही अद्वितीय रचना ज्याने केली, तो स्वतः नक्कीच सर्वज्ञ व सर्वशक्तिमान असणार. हे तर्कयुक्त आणि तर्कसंगत आहे की, अश्या रचनेचा शिल्पकार कुशल आणि निपुण असणार हे नक्कीच. मुळात इथे त्रिमितीय जगतवर्तुळात राहून, बहुमिती जगताची कल्पना करणं हे बुद्धी पलीकडील आहे. 

आपण प्रत्येक गोष्टीकडे कार्यकारण भाव धरून आणि शास्त्राची परिमाणं लावून बघतो. ते या जगतासाठी योग्य आहे. कारण या जगताच्या रचजेचा पाया तोच आहे. पण बहुमिती जगतातील तत्व, विचार व नियम कदाचित वेगळेच असतील. म्हणूनच आपल्या परिमाणात त्या विश्वनिर्मात्याला मोजू पाहणं हाच मुळात तर्कहीन विचार आहे. महाभारतातील मुचकुंद राजाची गोष्ट आपण वाचली आहेच. जो देवासुर संग्रामात देवांच्या बाजूने लढण्यासाठी स्वर्गात युद्धाला गेला होता. स्वर्गातील कालमाना नुसार तिकडे एक वर्ष पूर्ण झालं, युद्ध संपायला. 



राजा मुचकुंद ज्यावेळी परत पृथ्वीवर येण्यासाठी निघाला, तेंव्हा देवेन्द्राने राजाला माहिती दिली की, एक वर्ष हा येथील कालावधी आहे, पण पृथ्वीवर साधारण हजार वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे मधल्या काळात त्याच्या अनेक पिढ्या राज्य करून, पृथ्वीवर त्याच्या व इतर राज्यांच्या संदर्भात अनेक भौगोलिक बदल झाले आहेत. पुढे याच राजाचा उपयोग करून भगवान श्रीकृष्ण यांनी कालयवनाला संपवलं. असो. 

एक गोष्ट नक्की, व्यासांनी जे जे लिहिलं, त्यामागे प्रत्यक्ष श्रीविष्णूंची प्रेरणा आणि शक्ती आहे. कारण श्रीविष्णुसहस्र नामात म्हटलं आहे त्याप्रमाणे, " व्यासाय विष्णुरूपाय, व्यास रूपाय विष्णवे". म्हणजेच त्यामागे तथ्यांश नक्कीच असणार. 

म्हणजेच तिथली कालगणना, परिमाणं, मिती, शास्त्र, प्रमेये हे सर्व भिन्न असणार. अश्या बहुविध जगतात असलेला आत्मा, श्रीमहाविष्णू संकल्पाने, या त्रिमिती जगतात येतो आणि येथील नियमात बांधला जातो. यात एक गोष्ट अशी आहे की, या त्रिमिती व शास्त्रयुक्त नियमबद्ध जगतातून, बाहेर पडण्याचा नक्कीच काहीतरी गुह्य मार्ग असणार. तो मार्ग मानवी मनातून जातो. 

म्हणजे असं की, या जगतातील नियमाच्या कसोट्या सांभाळत, मनाला या सर्व परिमाणातून बाहेर काढून, बहुमिती जगतातील वाट शोधण्याचं व त्या जगात जाण्याचं गुह्य ज्ञान, मनाला प्राप्त होऊ शकतं. मन हे एकच माध्यम आहे ज्यायोगे हे अवघड शिवधनुष्य पेलता येऊ शकतं. त्यायोगे या देही स्थित आत्मा, या त्रिमिती जगतातून पार जाऊ शकतो. मनाची तयारी, ऊर्जा, बल, क्षमता हे सर्व अनंत आहे.  त्या सर्व क्षमतांचा सदुपयोग करून त्याला या कार्यार्थ सिद्ध करण्याचे अनेक उपाय, विश्वनिर्मात्या च्याच कृपेने ऋषींनी, सिद्धपुरुषांनी आपल्या हातात दिले आहेत. 

याचा विचार उद्या करूया. मनाची ही अपरिमित ऊर्जा आणि चैतन्य यांना उद्दीपित करण्याच्या मार्गाचा व त्याच्या शक्तीचा विचार करा. पण नाम घ्या आणि सिद्धतेकडे जात रहा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...