Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

जय महाराष्ट्र !!!🚩🚩🚩

सर्वात प्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!💐💐  खरतर गत वैभवाच्या शिखरावर अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचं कौतुक करायचं की, भविष्यात पुनः एकदा कधीतरी त्या वैभवाप्रत पोहोचू या आशेने शुभेच्छा द्यायच्या हा एक संभ्रमच आहे. कारण सलग पंधरा वर्षे राज्य करूनही राज्याला त्या वैभवाला न पोचवू शकलेले, पाच।वर्षात तुम्ही काय केलंत म्हणत निवडणूक मैदानात उतरले. मतदारांनी त्यांना पूर्ण परास्त करूनसुद्धा जवळजवळ सत्तेत पोहोचलेल्या युतीला शह देत त्यातील एक मोठा पक्ष फोडत त्यांना नाममात्र मुख्यमंत्रीपद देत सर्व सत्तेचं नियंत्रण आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झाले.  म्हणजे 20% मिळवलेले दोन आणि 20% वाला तिसरा मिळवून आमचं बहुमत असं येनकेनप्रकारेण करून सत्तेत तर पोहोचले. परंतु त्यातील खरा आनंद त्यांनाही नियतीने मिळू दिला नाही. आधी तिजोरी रिकामी असल्याचं नाटक करून झालं. त्यांनतर लगेचच करोनाचं जागतिक संकट आलं. यात सत्तेतील पक्षांची होत असलेली तारांबळ, ताळमेळाचा गोंधळ, अंमलबजावणीतील अनियमितता आणि समन्वयाचा अभाव हा ठायी ठायी जाणवतोय. त्यातही कमजोर नेतृत्व आणि बलशाली सत्ताबाह्य केंद्र यामुळे सत्तेत रा...

सुभद्राहरण ३७

सुभद्राहरण ३७ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll विवाह सोहळा उत्तमरीत्या पार पडला. भोजनसमारंभ, उपस्थितांनी मनसोक्त जेवून तृप्तीच्या ढेकरा देत, गाजवून सोडला. समस्तांना असे तृप्त बघून, कृष्णाला आधीच समाधान प्राप्त झाले होते. तरीही विवाहोत्तर मान्यवरांसह राजकुळातील सर्वांनी उत्तम अश्या भोजनाचा लाभ घेतला.  कृष्णाच्या भगिनीच्या लग्नाचा डामडौल , थाटमाट, सुसज्जता, खाद्यानांची रेलचेल, रेशमी वस्त्रांचा थाट, अलंकारांची विविधता हे पाहून स्वर्गीचे देव देखील थक्क झाले. प्रत्यक्ष देवेंद्र अचंबित होऊन सोहळा पाहात होते. परंतु ही सुबत्ता फक्त राजपरिवारातच नव्हती तर जनसामान्यां पर्यंत या सुबत्तेचा प्रवाह पोहोचला होता. राजा सुखेनैव वैभव मात्र स्वतःसाठी नव्हे तर समस्तांना त्यांचा त्यांचा अधिकार, भाग देऊन आणि याचक दीन यांना उत्तम दानधर्म करून ती सुबत्ता ते वैभव सढळहस्ते लुटून, मग बाकी भागाचा उपभोग स्वतःसाठी करत असे, असा तो काळ. त्यातही हे यादवनरेश श्रीकृष्णाचं राज्य.  उत्तमरीत्या पार पडलेल्या कार्याचं समाधान सर्वांच्या मुख कमलावर विराजित होतं. कार्य...

सुभद्राहरण ३६

सुभद्राहरण ३६ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll माता पिता दोघेही कन्यादानासाठी येऊन उभे राहिले. सर्व पुण्यांमध्ये अलौकिक असं समजलं जाणारं आणि पित्याला मोक्षप्रत नेणारं असं महत्तम दान म्हणजे कन्यादान. पित्याला मोक्ष यासाठी की, स्त्री,  गर्भ नऊ मास उदरात धारण करून आधीच मोक्षाच्या मार्गावर अग्रेशीत झालेली असते. म्हणून पुरुषाला कोणतंही पुण्यकर्म पदरी नसेल तरी मोक्षाच्या प्राप्तीचा हा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे केवळ एक कार्य, कन्येच्या विवाहानिमित्त, विधिवत तीच कन्यादान करणं. इथे लोकापवाद दान या शब्दावरून होऊ शकतो. परंतु कन्येच्या बाबत ते दान हे वस्तू म्हणून नव्हे, तर प्रचलित रितीनुसार, तिच्या पुढील आयुष्याची पूर्ण चिंता वाहू शकणाऱ्या सक्षम हातात तिला सुपूर्द करणं, जेणेकरून ती त्यात पूर्ण रममाण होऊन मनापासून वा आत्म्यापासून आपला संसार करेल व माता पित्यांना मनापासून त्याचे श्रेय देत राहील आणि त्यायोगे मातेची पुत्रीबद्दलची चिंता दूर होईल, या अर्थाने तिचा हात  सुयोग्य हातात देणं इति कन्यादान. कन्यादानम महापुण्यम. सुभद्रेला इतक्या सक्षम...

सुभद्राहरण ३५

सुभद्राहरण ३५ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll मंगलाष्टके सुरू झाली. दशदिशांना त्या सुमधुर मंगल शब्दांनी जणू भरून आणि भारून टाकलं. मंगलाष्टके सुरू झाली आणि अत्यंत रूपवान दिसणारी, वधूवेशात लज्जित होऊन, अंतरपाटा पलीकडे असलेल्या अर्जुनाला पाहण्यास, आतुर झालेली, सुभद्रा विवाहवेदिवर येऊन उभी राहिली.  तिच्या समस्त सख्यांच्या, रेवतीसह घरातील सर्वांच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू आहेत. स्वतः दादा आणि कृष्णदेखील आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. दोन भावात एकुलती एक असलेली बहीण. कृष्णाच्या नेत्रापुढे लहान पणीची नाजूक सुकुमार भाबडी सुभद्रा उभी राहिली. कृष्ण खोड्या काढून सतावत असताना दादांकडे तक्रार घेऊन गेलेली. दादांनी कृष्णाला रागे भरताच अत्यंत हर्षित होऊन टाळ्या वाजवणारी. दादांच्या नेत्रापुढेसुद्धा तोच जीवनपट, सुभद्रेचा, आजपर्यंतचा,  तरळला. दोघे बंधू भावविभोर होऊन गेले.  इकडे मंगलाष्टके सुरू आहेत. वधू वर दोघेही हातात पुष्पमाला घेऊन उभे आहेत. प्रत्येक कडव्यानन्तर सावधानच्या अक्षता वधूवरांच्या मस्तकी पडत आहेत. पुरोहित मंगलाष्टक...

सुभद्राहरण ३४

सुभद्राहरण ३४ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll सर्वजण उपस्थित होऊन स्थिरस्थावर झाले आणि पुरोहितांनी मंत्रोच्चाराला सुरवात केली आणि  विवाहविधीं प्रारंभ झाले.  तत्कालीन प्रथेनुसार विधींना सुरवात झाली. अर्थातच सर्वांना प्रतीक्षा होती ती वधूच्या आगमनाची. केशरी रंगाची सुंदर पैठणी नेसलेली, नखशिखांत अलंकारांनी सजलेली, मुळात रूपवती असलेली सुभद्रा आज वधूच्या शृंगारात अलौकिक दिसत होती.  जणू तिच्या प्रभेमुळे प्रत्यक्ष सूर्याची तप्त किरणं आपला ताप विसरून सुभद्रेला पाहायला आरक्त झाली आहेत. नील नभात सुरवर, देवादिकांना ज्यांच्यावर मत्सर उत्पन्न होतो ते गंधर्वसुद्धा,  तिला पाहायला उत्सुक आहेत, रती स्वतः सुभद्रेच्या सौन्दर्याकडे पाहून , खिन्न झाली आहे अशी रुपसंपन्न सुभद्रा आलेली पाहून अर्जुनाचे नेत्र पापण्या मिटायचेच विसरले की काय असाच भास होतोय. ते पाहून सुभद्रा लज्जित होऊन तिच्या सौंदर्यात वृद्धी होत आहे. वधू वर दोन्ही स्थानापन्न झाले. होमात हवनाच्या आहुत्या पडायला सुरुवात झाली. पुरोहित मंत्रोच्चाराच्या गजरात एक एक विधी पूर्ण करत ह...

देवकी ८

देवकी - ८ सुरक्षेसाठी नेमलेल्या सेनेचा मुख्य त्या संदेशवाहकाच्या दिशेने निघाला. संदेशवाहकाने आदरपूर्वक सेनाप्रमुखाकडे महाराजांचा संदेश असलेला लखोटा दिला. मी मात्र पाहण्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हते. स्तंभित आणि मूढ भावाने जे घडतंय ते पहात राहण्याव्यतिरिक्त अन्य काहीही हातात ठेवलं नव्हतं,नियतीने. त्यामुळे नियतीचे फासे जसे पडतील तसं आपल्याला पुढे ढकलायचं, किंबहुना ढकललं जायचं. कदाचित इतकंच आता आपल्या हातात उरलंय हे लक्षात आलं. परंतु कितीही म्हटलं वा ठरवलं तरी मानवी भावना आणि मन काही गोष्टी स्वीकारून सुद्धा त्यासाठी स्वतःला बदलायला तयार नसतं. कारण आशा खूप वेडी असते. मनाचा गाभारा अंधःकाराने व्यापला होता तरी त्याच्या  कोपऱ्यात कुठंतरी एक आशा शिल्लक होती, ती अजून आस धरून होती, दादाला कदाचित पश्चाताप होईल. त्याच वेड्या आशेने मी संदेशाचा लखोटा हातात घेऊन येणाऱ्या सेनापतीकडे पहात होते.  अर्थातच वसुदेव अजूनही निश्चल आणि अविचल होते. त्यांच्या चर्येवर तसूभरदेखील बदल दिसत नव्हता. सेनापती रथाजवळ येऊन , वसुदेव व मला ऐकू येईल इतक्या उंच आवाजात सारथी आणि सोबतची सेना यांना उद्देशून म्हटले...

देवकी ७

देवकी - ७ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवरून आणि अविर्भावारून त्याच्या चेहऱ्याचा अंदाज येत होता. कंसदादांचा नव्हे महाराज कंसाचा संताप आणि संताप दिसत होता.त्यामुळे,  जरी आता त्याने खड्ग म्यान केलं, तरी ते नवीन रुपात पुन्हा प्रकट होणार हा अंदाज होता. तो गेला आणि सारथ्याने रथ उलट मधुरेच्या महालाच्या दिशेने वळवला. मी प्रचंड हादरून गेले होते.  इतक्या वेळानंतर त्याक्षणी प्रथम वसुदेवांना पाहिलं. त्यांचा शांत धीरगंभीर चेहरा पाहून माझं थरथरणारं काळीज , धडधडणारं हृदय, सुन्न झालेलं मन, थिजलेला अंतरात्मा, स्तब्ध मेंदू आणि धमन्यांमधील गोठलेलं रुधिर एक क्षण मृत्यूच्या दारात आपण जाऊन आलोय हे सांगत होते. माझ्या चर्येवरून त्यांना आलेला अंदाज मला त्यांच्या  डोळ्यातील भाव सांगून गेला. माझ्या काना मागील नसा तप्त झाल्या होत्या.  घशाला कोरड पडली होती. छातीतील धडधड अजून तशीच होती. यादवराजांनी माझ्या खाद्यावर हात ठेवला, नन्तर तो मस्तकावर ठेवला. मला भानावर यायला आणि विश्वास द्यायला एवढं पुरेसं होतं. त्यांनीच आपल्या उपरण्याने माझा घाम पुसण्यासाठी, माझ्या चेहऱ्याकडे हात नेला, त्यावेळी मला जाणवलं की ...

सुभद्राहरण ३३

सुभद्राहरण ३३ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll दादा परतून गेले आणि काही काळ शांततेत गेला. कृष्णाने अर्जुनाला पुढील यात्रेच्या व्यवस्थेबाबत विचारले. अर्जुन म्हणाला  " अजून एक संवत्सर बाकी आहे बारा संवत्सर पूर्ण होण्यास. त्यामुळे हा एक संवत्सराचा काळ पुष्कर क्षेत्री सुभद्रेसह व्यतीत करून ततपश्चात इंद्रप्रस्थास परत जाईन असा मानस आहे."  कृष्ण यावर समाधान व्यक्त करून ठीक आहे म्हणाला. इतक्यात दादांचा संदेश आला आणि मागोमाग उग्रसेन, माता देवकी, पिता वसुदेव, दादा बलराम आणि निवडक यादववीर येताना दिसले. सर्वांनी विविध रंगांचे गर्भरेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे संपूर्ण परिसर शोभून दिसत होता. माता देवकी पुढे झाली. तिने क्षीर जल यांनी अर्जुनाचं पाद्य पूजन केलं. त्याला ओवाळलं. अर्थात कृष्णसखा आज वर पक्षाकडून असल्याकारणे त्याचाही उचित मानसन्मान मातेने केला.  राजा उग्रसेन पिताश्री वसुदेव यांनी स्वतः अर्जुनाला, त्याच्या साठी खास सुशोभित केलेल्या, रथात कृष्णासह बसवलं. सर्वजण आपापल्या रथात आरूढ झाले आणि सर्व लवाजमा यथावकाश विवाहस्थानी अर्थात ...

क्षण एक तुझा हे जाण

क्षण एक तुझा हे जाण  उगाच नाही ज्ञानोबा माऊली म्हणाल्या, तू हे जाण देवचिये द्वारी उभा क्षणभरी, मुक्त करील तो क्षण तेही जाणत होते अस्तित्वाच्या क्षणा क्षणाचं मोल  कारण हा क्षण हाती धर, पुढचा तुझा असेल नसेल तो एक क्षण हाती आला तर बदलेल सर्व लक्षण  जीवनात क्षणाचंही मोल आहे अनमोल, हे जाण ज्या क्षणी तुला कळलं की, गेला क्षण माझा नव्हता तो क्षण धरून हातात तू चाल, तुझ्या जीवनाचा रस्ता  कारण ही जाण महत्वाची की, येणं जाणं नाही हाती ज्या क्षणी उमजेल हे, त्या क्षणाची काठी धर हाती त्या एका क्षणी जाणीव होणं, हेच महत्वाचं जीवनात  त्या क्षणी, पूर्ण आयुष्य तू जगलास, त्याच जाणिवेत  क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव होई अमृताचा, हे जाण तो प्रत्येक क्षण जागून जगणे, हे जीवन जगणे जाण ©® कवी : प्रसन्न आठवले २६/०४/२०२० ०८:३८

सुभद्राहरण ३२

सुभद्राहरण ३२ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll सुभद्रेला अनेक गोष्टी सांगून तिला भावी उत्साहवर्धक काळाचा विचार करण्यास सांगून माता देवकी आपल्या महाली प्रस्थान करती झाली. सर्व महालांमधले दिवे मंद झाले . सेवकवर्गदेखील शांत निजला आता प्रहरी सोडून समस्त द्वारका काही घटिकांसाठी शांत झाली. सर्व घरांमधून मंद दिव्याच्या उजेडात सजलेली द्वारका अवकाशातून विलोभनीय दिसत होती, अगदी इंद्राच्या अलंकापुरीहून सुंदर.  ब्राम्हमुहूर्त झाला आणि सेवकवर्ग प्रथम उठला आणि चार दिवसाच्या विवाहसोहळ्याच्या तयारीला लागला. उठल्या बरोबर प्रत्येकाची लगबग वरिष्ठांच्या सूचना, उपसूचना, कनिष्ठांकडून त्याचं पालन,  अर्थात सर्व कार्य आदेशानुसार सुरळीत होऊन सर्व विधी यथासांग पार पडावेत, हाच सर्वांचा भाव होता. कारण आपल्या सुभद्रेचा विवाह आहे आणि तो देखील महावीर अर्जुनासह हाच भाव दृढ होता सर्वत्र. मातांसह सर्व स्रीवर्ग उठून कामाला लागला. मातेने तीन चार सख्यांना दिवसभराच्या कार्याचा पाढाच वाचला होता. पण त्यातही त्या सख्या अत्यंत हर्षित होत्या. कारण त्यांना दिलेल्या कार्य...

सुभद्राहरण ३१

सुभद्राहरण ३१ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll यावर सुभद्रा म्हणाली तुम्ही जर अशीच चेष्टा करणार असाल तर ................"  तिचं वाक्य अर्धवट कापत एक सखी म्हणाली. "तर मी सरळ त्यांना जाऊन सांगेन शर मारायला. अचूक शरसंधान करतात तिचे अर्जुन. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहेत."  सुभद्रेने लाजून आपला चेहरा झाकून घेतला. कितीतरी वेळ ही थट्टा चालू राहिली असती, परंतु माता देवकीने येऊन सर्वांना रागावून पिटाळलं की, उद्या प्रातः लवकर उठून चार दिवस सोहळा जागवायचा आहे. तेंव्हा सर्वांनी जाऊन निजा आणि सुभद्रेलासुद्धा निजूद्या. तरी तेवढ्यात जाता जाता एक सखी म्हणालीच "काकू आता कसली निद्रा तिला. आता चार दिवस निद्रानाश आणि स्वप्न."  " बघ ग माते"  अशी लटकी तक्रार सुभद्रेने केली. यावर मातेने त्या सखीला एक चापट मारली. सर्व निघून गेल्या. मातेने सेविकांना सर्व दिवे कमी करून मंद करण्यास सांगितलं आणि जाता जाता सुभद्रेला म्हणाली " आता नीज नाहीतर बघत बसशील स्वप्न."  " माते तूसुद्धा." अस म्हणून सुभद्रा लाजली. मातेने तिच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवल...

सुभद्राहरण ३०

सुभद्राहरण ३० ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll संपूर्ण द्वारका विवाहाच्या तयारीला लागली होती. प्रजेने आपल्या घरांना साफसफाई करून सजवलं. तोरणं, माळा, रंगीबेरंगी रांगोळ्या, नानाविध फुलांची सजावट यांनी संपूर्ण द्वारकाच जणू एका नववधू सारखी दिसायला लागली. विवाह सोहळा उद्याच असल्याने अत्यंत कमी वेळात पण कुशलतेने द्वारकावासीयांनी सर्व द्वारका सजवून नटवून आधीच असलेल्या सोन्याच्या द्वारकेला अजूनच रूपवान केलं. रात्री कृष्ण अर्जुन महालातील पहिल्या माळ्यावरील छतावर जाऊन शांतपणे वार्ता करत असताना त्यांनी दिव्याच्या रोषणाईत सुशोभित द्वारका पाहिली आणि  त्या नयनरम्य दृश्यात हरवून गेले. रात्रीचा पहिला प्रहर संपत आला होता आणि कृष्ण भानावर येऊन अर्जुनाला म्हणाला  "अर्जुना, तुला निद्रा न येणं मी समजू शकतो. परंतु मला तसा काही स्वप्नसोहळा जगायचा नसल्यामुळे, मला तर अतिनिद्रेने पूर्ण  ग्रासले आहे.त्यामुळे मला माझ्या महाली जाऊन निद्रेच्या आधीन व्हावेच लागेल. शिवाय उद्यापासून सुरू होणारा लग्नसोहळा हा आम्हाला कार्यार्थ आहे. तुला जरी पुढची स्वप्न बघण्याचा हक्क मिळाला असला तरी आम्ही...

सुभद्राहरण २९

सुभद्राहरण २९ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll अर्जुनाच्या स्वागताची मिरवणूक मोठ्या धामधुमीत राजप्रसादापर्यंत आली. त्यातही जवळजवळ एक प्रहर लोटला. कारण वाटेत आगतस्वागत, नृत्य यांसह मिरवणूक हळूहळू चौकाचौकात फिरत फिरत पुढे पुढे सरकत होती. संपूर्ण द्वारकेच्या घरचं कार्य असल्याप्रमाणे सर्व नगरवासी यात उत्साहाने नवीन वस्त्रप्रावरणं परिधान करून सहभागी झाले होते.  राजप्रासदाच्या मुख्य द्वारापाशी, अर्जुनाचं जल क्षीर यांनी चरण धुवून ओवाळून, पुन्हा एकदा स्वागत करून त्याला राजप्रसादातील विशेष कक्षात अर्थात विशेष महालात नेण्यात आलं. तिथे गेल्यावर पिताश्री वसुदेव यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अर्जुनाला मोठ्या आनंदाने सांगितलं की उद्यापासून चार दिवसाचा लग्नसोहळा सुरू होईल आणि यथाविधी सुभद्रेचा अर्जुनाशी विवाह होईल.  वरपक्षातर्फे तुझा सोबती कृष्ण स्वतः असेल.  कृष्ण स्वतः जातीने त्याच्या सोबत होता. कारण यावेळी तो दुहेरी भूमिकेत होता. अर्जुनाचा सखा म्हणून वरपक्षातर्फे आणि बंधू म्हणून वधूपक्षातर्फे. अर्जुनाचा बारा वर्षांचा कालावधी संपायला अजून एक वर्ष बाकी असल्याकारणा...

कृष्ण सुदामा काल्पनिक कथा

एक काल्पनिक दिर्घकथा, कृष्ण सुदामा यांची.-  दोन अश्रू  ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे कृपया याचा पुराणात संदर्भ शोधू नये. श्रीकृष्ण सुदामा बालपणीचे मित्र. सांदीपनीऋषींच्या आश्रमातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले आणि आपापल्या गृही परत आले. कृष्ण अर्थातच मथुरेत आणि सुदामा आपल्या गावी परत गेला. कृष्ण कालांतराने खूप मोठा राजा झाला, ज्याची कीर्ती अर्थातच चारही दिशेला पसरली. पुढे रुक्मिणी सह इतर राण्यांशी त्याचा विवाह झाला. काळ पुढे निघून निघाला होता. सुदामा एका गरीब ब्राम्हण कुटुंबातील होता. त्याचाही तश्याच सामान्य परिस्थितीतील गरीब कुटुंबातील मुलीशी विवाह झाला. सामान्य गरीब माणसाचा जसा संसार असतो तसाच त्याचाही संसार होता. पूजाअर्चा करून, कीर्तन प्रवचन करून आपल्या कुटुंबाचं पोट भरताना त्याचा जीव मेटाकुटीला येत असे. कित्येक वेळा अर्ध पोटी तर कधी उपाशी पोटी नवरा बायकोला झोपावं लागे. कारण पाच सात कच्ची बच्ची होती.  त्यांचं पोट भरून उरलेल्यामध्ये नवरा बायकोची गुजराण होत असे.  सुदामा प्रतिरात्री झोपतेवेळी हात जोडून प्रार्थना करून झोपत असे. ते करताना या मेटाकुटीस आणणाऱ्या आयुष्याची...

सुभद्राहरण २७

सुभद्राहरण २७ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll त्यांना येताना पाहून अर्जुन  दारुकाला आज्ञा देतो कि, रथ येणाऱ्या दोन्ही बंधूना भेटण्यासाठी  सामोरा ने.  येणारे सर्व रथ, अश्व आणि दळ अर्जुनाच्या रथासमोर येऊन थांबले. एका रथातून कृष्ण, बलराम आणि एका रथातून अर्जुनासह सुभद्रा उतरले. कृष्ण आणि बलराम यांनी दोन्ही हात जोडून अर्जुनाला प्रणाम केला. अर्जुन सुभद्रा यांनी दोन्ही भावांना चरणस्पर्श केला. दोन्ही भावांनी अर्जुनसुभद्रा यांना शुभाशीर्वाद दिले. ततपश्चात अर्जुनाला बलराम आणि कृष्ण यांनी आलिंगन दिलं. अक्रूर गद यांसह सर्व यादवांनी दोघांवर पुष्पवृष्टी केली आणि जयजयकार केला.  कृष्ण अर्जुनाला म्हणाला " हे वीर धनंजया, तुझी सुभद्रेशी विवाहाची इच्छा यादवराज श्रीवसुदेव माता देवकी यांसह सर्वांनी मान्य केली आहे."  अर्जुन दादांकडे बघतो. कृष्ण स्मित करून म्हणतो. " अर्थातच दादांनी देखील मान्य केलं आहे आणि तेदेखील हा संबंध दृढ करण्यास उत्सुक आहेत. अर्थात म्हणूनच तर स्वतः माता देवकीने त्यांना आज्ञा केली आहे तुला घेऊन येण्याची. त्यानुसारच आम्ही दोघे बंधू, समस्त यादवकुळ...

सुभद्राहरण २६

सुभद्राहरण २६ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll सुभद्रेला आश्वस्त करत अर्जुन वदला. "हे प्रिये, या समयापर्यंत केशवाने दादा आणि इतर क्रुद्ध यादव वीरांना आपल्या मधुर वाणीने  अबोल करून आपल्या विवाहाची योजना त्यांच्याकडून मान्य करवून घेतली असेल. कारण तसे त्याने मला वचन दिले होते. अर्थातच गोविंदाचे वचन हे अंतिम शब्द आहे, हे तू जाणतेसच."  "याचा अर्थ इतकाच कि, बंधू आणि तुम्ही मिळून हि पूर्ण योजना तडीस जाईल इतपत पूर्ण पूर्वतयारी केली होती तर. " "अर्थात कोणतीही महत्वाची योजना पूर्णत्वास नेण्याआधी त्याची पूर्वतयारी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. " यांचे  हे मधुर संवाद सुरु असताना इकडे द्वारकेत कृष्ण , बलरामदादा, अक्रूर, गद यांसह काही निवडक यादव दळभार पूर्ण तयारीनिशी अर्जुन आणि सुभद्रा यांना द्वारकेत सन्मानपूर्वक घेऊन येण्यासाठी निघाले आहेत. अर्थात त्यांच्या पाठोपाठ वसुदेव ,देवकी, देवी रेवती यांसह समस्त स्त्रिया वेशीवर स्वागताला निघणारच आहेत.   रथ , अश्व आणि अश्वदल अर्जुनाला आमंत्रित करण्यासाठी निघाले आहेत. अर्थातच निघताना माता देवकी पिता वासुदेव आणि महार...

सुभद्राहरण २८

सुभद्राहरण २८ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll यथावकाश सर्वजण द्वारकेच्या वेशीवर येऊन पोचतात. त्याआधीच तिथे श्रीउग्रसेन, श्रीवसुदेव व माता देवकी यांसह समस्त राजपरिवार आणि यादवजन उपस्थित आहेत, अर्जुनाच्या स्वागताला. अर्जुनाला मोठ्या मिरवणुकीने घेऊन आलेले बलरामदादा व कृष्ण, अर्जुन व सुभद्रा यांना रथातून उतरवून घेऊन येतात.  सुभद्रा अर्थातच अजूनही यजमानगृही असल्याने तिला माता देवकी आपल्या समीप उभी करते. स्वतः माता देवकी  अर्जुनाचं औक्षण करण्यासाठी पुढे होते. अर्थातच यथाविधी त्याला ओवाळून त्याची दृष्ट काढून त्याला विधिवत द्वारकेत आमंत्रित केलं जातं. अर्जुन सर्व ज्येष्ठांना चरणस्पर्श करून वंदन करतो आणि आशीर्वाद प्राप्त करतो.पिताश्री वसुदेव अर्जुनाला आत घेऊन येतात.  एका सजलेल्या मोठ्या रथात स्वतः श्रीवसुदेव, कृष्ण आणि बलराम हे अर्जुनासह बसतात. समस्त स्रीवर्ग रथारुढ झाल्यानन्तर सर्वजण राजप्रासदाच्या दिशेने निघतात. मार्गामध्ये सर्वत्र दुतर्फा जनसमुदाय आपल्या सुभद्रेला आणि जावयाला पाहायला जमा झालेला आहे. नानाविध पुष्पे, पाकळ्या, गुलाल यांची मुक्तहस्ते उधळण, अर्थात...

देवकी ६

देवकी - ६  या आयुष्याचं मर्म काय, जगण्याचं वर्म काय हे माहीत नाही  आजतरी. पण वसुदेवांशी का गाठ मारली माझी, विधात्याने  हे मात्र त्या क्षणी जाणवलं, समजलं. आजही मी हाच विचार करते आणि थरकाप होतो अंगाचा की जर त्या दिवशी वसुदेव नसते तर माझा अंत कंसाच्या हातून निश्चित होता. पण त्यानंतरचं जीणं हे तर मृत्यूहूनही भयंकर अस दुःस्वप्न आहे. ही कारागृहातील रात्र, नव्हे तर, प्रत्येक क्षण अंतरात्म्याचा ठाव  घेतो, काळजाचा ठोका चुकवतो. प्रत्येक पळ मृत्यू एक एक पाऊल पुढे येतो आहे, हीच जाणीव काळीज पोखरून टाकते आणि मग जाणिवा चेतना व संवेदना आत्मक्लेश देतात. का हे अस जीणं वाट्याला यावं, आपल्याच.  फक्त वसुदेवांची आयुष्यातील उपस्थिती हाच काय तो जगण्याचा आशावाद. मृत्यूच्या या घनघोर तांडवात मला आधार हा फक्त त्यांचा आहे, वसुदेवांचा. त्यांचा धीरोदात्तपणा कधी काळजाचा ठेवा बनतो तर कधी आश्चर्य वाटतं. कसं काय एखादा मानव मृत्यू प्रत्यक्ष धर्मपत्नीच्या भावाच्या रुपात थैमान घालत असताना शांतपणे वचन बद्धता पाळण्याचं धैर्य दाखवू शकतो. इतका टोकाचा स्वभाव व वर्तणूक असलेली दोन व्यक्तित्व माझ्या इतक्या ...

सुभद्राहरण २५

सुभद्राहरण २५ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll श्रीहलधर विचारमग्न झाले. काही क्षण विचार करून त्यांनी आपला मानस सांगण्याचा यत्न करण्याआधी वसुदेव व देवकी तिथे आले. त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला होताच. बलराम दादांच्या जवळ येत वसुदेव म्हणाले  " बलराम आम्हाला अर्जुन हा जामात म्हणून स्वीकृत होताच आणि आहे. तस्मात तू काहीही इतर विचार न करता कृष्णा सह अर्जुनाच्या मार्गावर वायूवेगाने प्रस्थान कर आणि त्या दोघांनाही आमंत्रित करून श्रद्धापूर्वक घेऊन ये. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी द्वारकेच्या वेशीवर सर्व तयारीनिशी उपस्थित राहतो. तुम्ही दोघांनी त्वरित प्रस्थान करा."  बलराम आणि कृष्ण माता पित्याना वंदन करून त्वरित प्रस्थान करतात. आपल्यासोबत पूजाविधी साहित्य घेऊन जाण्यास विसरत नाहीत , कारण आता अर्जुन सर्वसंमतीने वसुदेव देवकी यांचा जामात होणार होता. त्याकारणे त्याला विधिपूर्वक आमंत्रित करणे उचित होते. इकडे अर्जुन सुभद्रा काय करत आहेत ते पाहूया. अपहरण झाल्यापश्चात एक क्षण क्रुद्ध आणि स्तब्ध झालेली सुभद्रा अर्जुनास पाहताच लज्जित झाली. कारण तिने आजपर्यंत पाहिलेल्या पुरुषांमध्ये सर...

सुभद्राहरण २४

सुभद्राहरण २४ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll महायोगीच्या बाणांचा सामना कुणीही करू शकत नव्हतं. अर्थात त्याचवेळी काही जण बलरामदादा यांच्याकडे पोहोचले.  " बलरामदादा घात झाला , घात झाला." " अशी काय गोष्ट घडली यादव सैन्य उपस्थित असताना, की तू इतका धावत आला आहेस."  " महाराज ते महायोगी आपल्या भगिनी देवी सुभद्रा यांना आपल्या रथात उचलून घेऊन उत्तर दिशेने प्रस्थान करते झाले. अर्थात त्यांनी देवी सुभद्रेचे हरण केले आहे.  आम्ही त्यांच्या मागोमाग जाऊन त्यांचा पाठलाग केला पण व्यर्थ."  " व्यर्थ म्हणजे ........" "त्यांच्या बाणांच्या वर्षावापुढे आमचा काही टिकाव लागला नाही. किंबहुना त्यांनी धरेपासून आकाशापर्यंत तिरांची भिंत उभी केली की आम्ही पुढे जाऊच शकलो नाही.  एकूणच  त्यांच्या धनुष्याच्या कौशल्यापुढे विश्वात कोणीही टिकाव धरू धजावेल असं वाटत नाही, इतके ते महायोगी कुशल धनुर्धारी आहेत."  बलराम दादांनी त्वरेने समस्त यादवदळ युद्धसज्ज करून त्या महायोगीच्या मार्गावर प्रस्थान करण्याची आज्ञा द्या असा आदेश सैन्याला पाठवला. भोज, वृष्णी आणि अंध...

सुभद्राहरण ७

सुभद्राहरण ७ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll मणिपूरचा त्याग करून अर्जुन समुद्र मार्गाने परमपावन तीर्थांचे दर्शन घेत घेत  किनाऱ्याच्या रेषेने मार्गातील दानधर्म करत पुढे पुढे मार्गस्थ होत होता. अश्याच परमपुण्यवान तीर्थांचं दर्शन घेत असताना अर्जुनाच्या ध्यानात एक गोष्ट आली की, मार्गात पाच तीर्थ अशी आहेत की ज्यांचं दर्शन घेण्यासाठी ऋषीमुनी, साधू,  तपस्वी, यात्रेकरू इत्यादी न जाता पुढे निघून जात आहेत. त्या तीर्थांची नाव आहेत अगस्त्यतीर्थ, सौभद्रतीर्थ, परमपवित्र पौलोतीर्थ, अश्वमेधाचं पुण्य देणारं कारंधमतीर्थ, त्याचप्रमाणे पापनाशन महापुण्यवान भारद्वाजतीर्थ. अर्जुनाने बरोबरीच्या साधुजनांना पृच्छा केली  " आपण या परिसरातील सर्व तीर्थांचं यथोचित दर्शन घेता पण या पाच तीर्थांचं दर्शन घेण्यास्तव कोणीही का जात नाही. या मागे काय कारण आहे मी जाणून घेऊ इच्छितो."  एक अनुभवी आणि वयोवृद्ध तपस्वी म्हणाले " हे धनंजया , या पाचही तीर्थांमध्ये पाच मगरी राहतात. ज्या त्या तीर्थात स्नान करणाऱ्याला जलामध्ये ओढून नेतात. म्हणून त्या पाचही तीर्थाना टाळून सर्व साधू, यात्री , धर्मज्...

सुभद्राहरण २३

सुभद्राहरण २३ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll आता सर्व मनासारखे योजले गेले. मात्र त्याची अंमल बजावणी करणे बाकी राहिले. जे जसे करावयाचे ठरले होते, त्याप्रमाणे त्या दिवशी सुभद्रा शृंगार करून सुलोचन सुर्यबिंबा लाही अपमानित करत महाशक्तीपूजेस्तव मंदिराकडे निघाली. रत्नजडित अलंकार, सुशोभित हिरेजडित मुद्रिका , उंची वस्त्रभार यांसह विजेचे तेज ल्यायलेली सुभद्रा पूजेची सर्व सामग्री घेऊन रथारुढ झाली.  अर्जुन अर्थात कृष्णाच्या रथात आरूढ होऊन सज्ज होता. दारूक अर्थात कृष्णाच्या रथाचा सारथी, याला कृष्णाने सांगितले होते की,हे महंत सांगतील त्यानुसार तू हा रथ हाक आणि तेच तुझे स्वामी आहेत असे समज.त्यामुळे दारूक आपल्या रथाचे शैब्य सुग्रीवादी दिव्य अश्व जोडून तयार होता. सुभद्रा ठरल्यानुसार मंदिरात गेली. तिने यथाविधी पूजा अर्चना पूर्ण केली. मंदिराचे पुजारी यांना दक्षिणा व याचकांना सढळ हस्ते दान देऊन पायऱ्या उतरून रथारूढ झाली.  सारथी आज्ञा मिळताच रथ सुरू करतो आणि अर्जुन देखील दारुकाला रथ त्या रथाच्या दिशेने नेण्यास सांगतो, अर्थात थोडे अंतर ठेवून आणि आज्ञा करताच अतिनिकट जाता येईल अश...

सुभद्राहरण २२

सुभद्राहरण २२ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll अर्जुन एकाग्रतेने कृष्णाचं म्हणणं ऐकत होता आणि कृष्ण पूढे सांगत होता. "क्षत्रियांमध्ये बलपूर्वक कन्येचे हरण करून तिच्याशी विवाह करण्याची प्रथा देखील शास्त्रसंमत आहे.  प्रत्यक्ष माझाही विवाह रुक्मिणीचे हरण करून झाला आहे , हे तू जाणतोस. अर्थात यात मी रुक्मिणीच्या संमतीने तिचे हरण केले हा भाग आहे. परंतु तुला याच मार्गाने जाऊन सुभद्रेशी विवाह करावा लागेल. कारण आजच्या घडीपर्यंत दादांचा रुकार या विवाहास नाही हे नक्की,म्हणून ही योजना."  अर्जुन कृष्णाला विचारता झाला. " परंतु हे सखया तुझी यात मुकसंमती आहेच हे गृहीत धरून मला हे कसे साध्य होईल हे विस्ताराने सांग. कारण त्यायोजने प्रमाणे करण्यास मी समर्थ आहे. पृथ्वीच्या पाठीवर जे प्रशस्त मार्ग उपलब्ध आहेत, त्यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून मला सुभद्रेशी विवाह करावयाचा आहे. कारण तिच्या प्रथम नेत्रप्रहाराने मी पूर्ण घायाळ झालो आहे, हे तू जाणले असशील." कृष्ण मंद स्मित करून म्हणाला " वत्सा तू माझा सन्मित्र आहेस आणि मी तुझा एक सच्चा हितचिंतक असल्याने मी तुझ्या...

सुभद्राहरण २१

सुभद्राहरण २१ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll अर्जुन आपलं देहभान व परिस्थिती दोन्ही विसरून एकटक सुभद्रेकडे पाहात आहे आणि कृष्ण अर्जुनाकडे. अर्जुनाच्या नजरेने स्वर्गीय सौन्दर्य पाहून अर्जुनाला जणू एका जागी खिळवून ठेवलं. तिकडे सुभद्रेची देखील तापसींवर नजर गेली आणि तिला त्यांचा चेहरा व एकूण वर्तन यातून अर्जुनाचा भास झाला. त्या एक क्षण झालेल्या नजरानजरेने घायाळ अर्जुनाची मनःस्थिती अर्थात कृष्णाव्यतिरिक्त अन्य कोणीच जाणू व समजू शकला नसता. कृष्णाच्या लक्षात आल्यावर कृष्णाने हळूच अर्जुनाच्या कानात म्हटलं " हे पार्था , आता तू महंत वेशात आहेस त्यामुळे लोकांच्या लक्षात येईल अशी गोष्ट करू नकोस. दुसरी गोष्ट अशी की जीच्याकडे तू भान हरपून पाहत आहेस ती वसुदेवांची लाडकी कन्या आणि माझी व दादांची लाडकी भगिनी सुभद्रा आहे. तुझी मनःस्थिती मी जाणतो पण इथे जनात शोभा होईल." कृष्णाचे म्हणणे ऐकून त्याच अवस्थेत जराही विचलित न होता कृष्णाला अर्जुन म्हणतो. " हे यदुनाथा , तूच माझी मनःस्थिती जाणू शकतोस आणि जर खरच जाणली असशील तर काहीही करून सुभद्रेशी माझा विवाह करून ती माझी राणी होईल...

सुभद्राहरण २०

सुभद्राहरण २० ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll इकडे सीमेवर यदुवीर आश्रमातून अर्जुनाच्या कपिध्वज विराजित रथातून आश्रमाबाहेर आला. अर्थातच तपस्वी रूपातील अर्जुनाला हात जोडून नमस्कार करत कृष्णाने त्याचा निरोप घेतला. सर्व सुवर्णरथ दादांच्या आज्ञेने दळभार सुरक्षेसह निघाले आणि द्वारकेच्या सीमेवर पोचले.  सर्व परिवारवासी एकत्र आल्यावर कृष्ण तपस्वी साधूंना म्हणाला " मी आपल्याला यात्रेस्थळी भेटीन. आपण सकुशल आपल्या रथातून यात्रेस्थळी यावं. आपल्या सेवार्थ सेवकवर्ग सह येईलच. "  इतकं बोलून कृष्ण द्वारकेच्या रथांच्या समीप आला.  सीमेवर अर्थातच यादवनरेश कृष्ण स्वतः दादांच्या रथात आरूढ  झाला. सर्व जनासामान्यांना सोबत घेऊन सर्व लवाजमा मजल दरमजल करत रैवतक पर्वतावरील यात्रेस्थळी निघाला. मार्गात एका रथाकडे सुभद्रेचं लक्ष सतत जात होतं, ज्यावर कपिध्वज विराजमान होता. वेगळाच पण सुशोभित ध्वज दुरूनच दिसत असल्यामुळे सतत त्या ध्वजाकडे ती आकृष्ट होत होती. यात्रेत पोहोचताच सुभद्रेच्या सर्व सख्या तिला घेऊन जायला आल्या. परंतु माता देवकीने सांगितले की, " यात्रेत आल्याप्रमाणे आधी शक्ती...

सुभद्राहरण १९

सुभद्राहरण १९ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll रुक्मिणी रथारुढ होऊन कृष्णाच्या प्रतीक्षेत आहे आणि अर्थातच आता सर्वांचं लक्ष कृष्ण व कृष्ण भगिनी सुभद्रा यांच्या अगमनाकडे लागलंय. रथारूढ झालेल्या माता देवकी, रेवतीदेवी , रुक्मिणीदेवी यांचा शृंगार अपूर्व होता. माता देवकी या वयातही इतक्या सुंदर दिसत होत्या कि वसुदेव स्वतः अनेक वेळा त्यांच्याकडे पाहात होते आणि ते पाहून दादा, रेवतीदेवी रुक्मिणीदेवी  माता देवकीला चिडवून दाखवत होते. अर्थातच उपस्थित सर्व या चेष्टा मस्करीचा आनंद घेत होते. तितक्यात ज्या क्षणाची प्रतीक्षा उपस्थित सर्व करत होते, तो क्षण येऊन ठेपला.  अत्यंत रूपवान आणि सर्वगुणसंपन्न व यदुनाथांची लाडकी आणि धाकटी बहीण सुभद्रा उंची व भरजरी राजवस्त्र उत्तम घडणीचे सुवर्ण अलंकार, गळ्यात रत्नांचे हार व  मोत्यांच्या माळा, सुशोभित केससंभार त्यावर हिऱ्याची सजावट असलेली जाळी, कानात सुवर्ण मासोळी, नाकात मोत्याची अनमोल नथ, बोटात उत्तम नक्षीच्या मुद्रिका, दंडात बाजूबंद, नक्षीदार वेलबुट्टीच्या मनगट्या आणि पाटल्या व सोन्याची कंकणं  , सोन्याच्या पट्टीवर हिरे जडलेला ...

सुभद्राहरण १८

सुभद्राहरण १८ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll समस्त द्वारकावासी उत्सवाच्या तयारीला लागले. यात्रेला जाण्याची धामधूम सुरू झाली. ललना साजशृंगाराला लागल्या. पुरुष मंडळी जरुरी सामान शकटात अर्थात घोडागाडीत भरून त्यांची तयारी करू लागले. व्यापारी आपला विक्रीचा माल शकटात भरून सेवक वर्गाशी ने आण करावयाच्या मोबदल्याबद्दल घासाघीस करत होते. ज्यांची मोबदल्याची बोलणी अंतिम होत होती ते व्यापारी आपला माल सेवकांकरवी एक वा एकापेक्षा जास्त शकटात भरून निघण्याच्या तयारीत होते. कपडालत्ता, दागदागिने, लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तू, साजशृंगाराचे सामान अश्या अनेक वस्तूंनी शकटं भरू लागली. भरलेली शकटं सैनिक व्यवस्थेत द्वारका नगरीच्या सीमेपर्यंत नेऊन उभी करण्यात आली. सर्वात जास्त शकटं साजशृंगार , दागदागिने, हिरे रत्ने , मोती यांची होती. अर्थातच द्वारकेत सुबत्ता असल्याकारणे यात्रेत आलेले जन या प्रकारच्या वस्तू जास्त घेणार याची व्यापारी मंडळींना अनुभवामुळे खात्री होती. हा रैवतक पर्वतावरील महाशक्तीचा उत्सव म्हणजे एक पर्वणीच होती. वृष्णी संघ, भोज आणि अंधक वंशाचे लोक हा उत्सव आयो...

सुभद्राहरण १७

सुभद्राहरण १७ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll   पिताश्री आणि दादा यांची अनुमती मिळताच कृष्णाने त्वरित दोन रथ मागवून पिताश्री आणि दादा यांना संदेश पाठवून आपण रथासमीप प्रतीक्षेत उभा राहिला.  थोड्याच वेळात पिताश्री वसुदेव आणि दादा बलराम आले आणि दोन्ही रथ निघाले. एका रथात स्वतः पिताश्री आणि एका रथात दादा आणि श्रीकृष्ण. रथ अर्थातच द्वारकेच्या वेशीवर असलेल्या आश्रमात जाऊन थांबला. विस्तीर्ण जागेत वनवेली, झाडं, मोठमोठे वृक्ष घनदाट झाडी यांच्या मध्ये अनेक पर्णकुटी उभारून पांथस्थ योगी, सिद्धपुरुष, ऋषी, मुनिवर  यांच्या विश्रामासाठी उत्तम व्यवस्था , उत्तम सेवकवर्ग, शांत परिसर, पशुपक्षी यांचा मुक्त वास असलेला हा  आश्रम एक आदर्श ठिकाण होतं.  येथे आल्यावर सिद्धयोगी महर्षी यांना ध्यानधारणेसाठी अत्युत्तम ठिकाण असलेल्या त्या आश्रमात तिघांनी प्रवेश केला. त्या काळच्या प्रथेनुसार व परंपरेनुसार आपल्याच राज्यात असलेल्या या आश्रमात प्रवेश करून त्यांनी त्या सिद्धयोगीच्या पर्णकुटीत येण्याची अनुमती मिळवण्यासाठी सेवकांकरवी निरोप  पाठवला. अर्थात तपस्विनी त्यांना भेटण...

लाटांचा खेळ

हा अथांग पसरलेला निळा सागर त्यावरचं अमर्यादित नीळं आकाश पाण्याचा तो ओढ लावणारा आवाज  लाटांचं ते सुरात  लयीत साद घालणं प्रत्येक लाटेचं आर्त होऊन घुटमळणं  पायाला मिठी घालून क्षणभर थबकणं  लाटांचा आणि सागराचा चंद्राशी संबंध तसाच नक्की मनाचा लाटांशी असणार ही ओढ फेसाळ लाटांचा खेळ बघण्याची मनातील घोंघावणारे विचार शांत करणार म्हणूनच हा लाटांचा खेळ पाहायला येणं मनातला आवेग लाटांच्या आवेगात पाहणं त्या लाटा शांत कधीच झालेल्या नाहीत मनाची तृष्णा त्यांना पाहून शांत होत नाही अखंड चालणारा खेळ लाटांचा किनाऱ्याशी  अखंड विचारांच्या लाटांचाही खेळ मनाशी ©® कवी : प्रसन्न आठवले ११/०४/२०२०

सुभद्राहरण १६

सुभद्राहरण १६ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll   साधुवेशातील अर्जुनाने अर्थातच याला संमती दिली आणि श्रीकृष्ण सवेगे द्वारकेत प्रसादाकडे निघाला. श्रीकृष्ण विचार करतो आहे की शीघ्रतेने जाऊन दादांना हे थोर साधुपुरुष आल्याचे वर्तमान सांगावे म्हणजे त्यांची अनुमती मिळाली तर अर्जुनाचा मुक्काम चार महिने इथे राहील आणि आपला हेतू साध्य करता येईल. या अपेक्षेत श्रीकृष्ण द्वारका प्रासादातील दादांच्या महालात येतो.  श्रीकृष्ण दादांच्या समीप जाऊन म्हणतो " दादा , एक महायोगी, तपस्वी, सिद्धपुरुष अनेक तिर्थक्षेत्रांचं दर्शन घेऊन तपयोगसाधना करून यात्रा करत करत द्वारकेपर्यन्त येऊन पोचले आहेत आणि नगराबाहेर आश्रमात थांबले आहेत."  " अरे कृष्णा मग त्यांना हे चार मास द्वारकेत  मुक्काम करण्यास सांगायचस म्हणजे आपल्यालादेखील सेवेची संधी मिळेल."  " दादा आपलं मन जाणणारा या जगतात मीच आहे फक्त. मी त्यांना तशी विनंती करूनच आलोय. आपल्या अनुमतीसाठी आधी येण्याऐवजी नन्तर आलो याबद्दल क्षमा असावी." " कान्हा तू कधी कधी खूप चतुराईने वागतोस आणि माझ्या मनातलं आधीच करतोस. अश्या वेळ...

सुभद्राहरण १५

सुभद्राहरण १५ ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll   हनुमंताच्या बोलांनी संतुष्ट भगवंत अंतर्धान पावले. इकडे हनुमंत देखील अर्जुनाच्या रथाच्या ध्वजास्तंभावर आरूढ होऊन स्थानापन्न झाला. अर्जुनाने ततपश्चात अनेक तीर्थांचे दर्शन घेतले.  जरा आपण आता द्वारकेत पाहूया काय स्थिती आहे. इकडे द्वारकेत श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून श्रीहलधर अर्थात श्रीबलराम यांनी आपली बहीण अर्थात सुभद्रा हीचा विवाह अर्जुनाशी करण्याचे योजले होते. परंतु जवळजवळ एक तप होत आलंय अर्जुनाबाबत काहीच वार्ता येत नसल्यामुळे श्रीबलरामदादा यांच्या मनात चलबिचल होत आहे. त्यांच्या मनात हा विचार जोर धरू लागला आहे की अर्जुनास येण्यास जर विलंब होत असेल तर सुभद्रेचा विवाह दुर्योधनासोबत लावून द्यावयास हरकत नाही. श्रीकृष्ण या चिंतेत की, या सोयरिकीमुळे सुभद्रेचं भवितव्य असुरक्षित होईलच परंतु यात अर्जुनाचासुद्धा उपमर्द होईल व त्याची कायमस्वरूपी गैरमर्जी होऊ शकेल. कारण अर्जुन हा वसुदेवांच्या बहिणीचा अर्थात कृष्णाच्या आत्याचा मुलगा आणि कृष्णाचा जिवलग सखा म्हणूनही कृष्णाच्या मनातील भीती सार्थच होती. म्हणून श्रीकृष्ण मनात तीव...