Skip to main content

राम अनुज भरत भाग ५४

राम अनुज भरत भाग ५४

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..

प्रभूंच्या अनुमतीच्याच अतिरम्य कल्पनेत, भ्राता भरत हरवून गेलेला असताना, अचानक महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमा समीप आपण आलो आहोत, या जाणीवेने, भरताला भाना वर आणलं. भरताने आपला रथ, मुनिवर वसिष्ठ यांचा रथ महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमाकडे वळवून, बाकीचा सर्व जमाव, रथ, अश्व इत्यादी सर्व, तिथेच थांबण्याचे आदेश, भरताने दिला. त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना आर्य सुमंत यांनी आपल्या सचिवांमार्फत दिली आणि स्वतः आपला रथ आश्रमाच्या दिशेने नेला. 

त्यांच्या मागोमाग, वसिष्ठ महर्षी विराजित असलेला रथ निघाला. थोड्याच अंतरावर महर्षींचा रमणीय आश्रम परिसर दृष्टी पथात आला. आश्रमाच्या थोड्या अंतरावर, रथ थांबले. भ्राताश्री प्रभू श्रीराम, यांच्या पादुका आपल्या मस्तकी धारण करून, अनवाणी पायाने, भरत उतरला. त्याच्या पाठोपाठ, शत्रुघ्न उतरला. वैशिष्ठ महर्षींनी पुढे होऊन, आश्रमात प्रवेश केला. 

महर्षी भारद्वाज, आपला नित्याहार उरकून, आपल्या विद्यार्थ्यांना वेद मंत्रांचा नित्य पाठ देताना दिसत होते. महर्षी वसिष्ठ यांनी सस्मित पुढे होऊन, महर्षी भारद्वाज यांना प्रणाम करून, त्यांच्या पाठशाळेतील पठणाच्या कार्यात व्यत्यय आल्याबद्दल क्षमाप्राप्ती मागितली. महर्षी भारद्वाज, वसिष्ठ ऋषींच्या या विनम्रतेने भारावून गेले. त्याच मन: स्थितीत दोन्ही ब्रम्ह वृंद, मुख्य आश्रम भागाकडे आले. 

त्यांच्या मागोमाग, भरत शत्रुघ्न आणि आर्य सुमंत सुद्धा आले. भरताने आपल्या मस्तकावरील पादुकांसह, चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याला तसे न करण्याचे महर्षी भारद्वाज यांनी खुणावून, हर्षाने त्यास शुभाशीर्वाद दिले आणि प्रश्न केला.

" हे रघुनंदन भरता, श्रीराम आपणास भेटले का आणि त्यांची सकुशलता आपणास कळाली ना. जनक नंदिनी आणि भ्राता लक्ष्मण सुद्धा सकुशल आहेत ना." 

भरताने लोचनात तरळणारे अश्रू परतावण्याचा अयशस्वी प्रयत्न करत, मुनीवर भारद्वाज, यांना उत्तर दिले.

" हे महाज्ञानी, ब्रह्मलीन, महर्षी भारद्वाज, आपण सर्वच जाणता. आपण सांगितल्याप्रमाणे, ज्येष्ठ भ्राता, हे देवी सीता आणि लक्ष्मण यांसह, चित्रकूट पर्वत पायथ्याशी असलेल्या वनात, एक पर्णकुटी बांधून रहात आहेत. 

त्यांना पुन्हा माघारी येण्याविषयी हरप्रकारे, यत्न करून पाहिला. परंतु ज्येष्ठ भ्राता, आपल्या वचनपूर्तीच्या प्रतिज्ञेवर अढळ आहेत. यास्तव, त्यांच्या या पादुका, विनंतीपूर्वक आर्जवाने प्राप्त केल्या. आता यांचीच राज प्रतिनिधी म्हणून, विधिवत सिंहासनी स्थापना करीन.

ततपश्र्चात त्यांचा प्रतिनिधी व राज्यपदाचा सेवक म्हणून, चौदा वर्षे अयोध्येचे राज्य पाहीन. चौदा वर्षे सरता, हा राज्यपाट, श्रीराम यांना सुपूर्द करून, पुढे त्यांच्या सेवेत आयुष्य व्यतीत करीन." 

भरताकडून, हे कथन ऐकून झाल्यावर, ऋषी वर भारद्वाज म्हणाले. 

" हे भरता, जे झाले, ते श्रीराम इच्छेने उत्तम झाले. आता याच मानसिकतेत, पुढील चौदा वर्षे व्यतीत कर. श्रीराम यांचे चिंतन आणि या राम पादुका तुला सर्व सुस्थापित करण्याची बुद्धी व सिद्धी प्रदान करतील, हा आमचा आशिष आहे. स्वये पशुपतीनाथ अशुतोष आणि सद्गुरू श्री वसिष्ठ नक्कीच नित्य प्रेरणा देतील." 

भरत, भारद्वाज मूनिवरांना म्हणाला

" आपलं कथन योग्यच आहे. मी अयोध्येहून निघताना, जेंव्हा या पादुका घेतल्या, त्यावेळी, माझी कल्पना, या पादुका दीननाथ श्रीराम याना, त्यांच्या पुढील काळासाठी उपयोगी होतील. म्हणून मी त्या ज्येष्ठ भ्राता कुलभूषण श्रीराम, यांच्या चरणात चढवल्या. परंतु त्याच क्षणी, कुलगुरू, महर्षी वसिष्ठ यांना,या तिढ्यातून सुटणारा मार्ग सापडला. "

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०१/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...