Skip to main content

राम अनुज भरत भाग ४०

राम अनुज भरत भाग ४०

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

दोन्ही माता सुमित्रा आणि कैकयी हा हृद्य सोहळा, कौतुके पहात होत्या. एकीकडे वेदोक्त मंत्रोच्चार आणि विधिवत पिंडदान सुरू आहे. लक्ष्मण प्रथम माता कौसल्या आणि नंतर माता सुमित्रा यांच्या पाया पडतो. थोडीशी सावरलेली माता कौसल्या, पिंडदानासाठी इंगुदी या फळाच्या गरापासून तयार केलेल्या पिंडाकडे पाहून, बाजूच्या मांडवीला म्हणाली.

संपूर्ण जगताच सार्वभौम राज्य ज्यांनी उपभोगलं, स्वर्गातील देवांना सुद्धा ज्यांनी दानवांविरुद्धच्या अनेक युद्धांमधे सहाय्य केलं आहे, अश्या परमप्रतापी विरवान राजांचे राजा, स्वर्गस्थ महाराज यांना, इंगुदिच्या फळाच्या गरापासून तयार केलेल्या पिंडाने श्राद्ध व पिंडदान का केलं जावं, हे माझ्या मनाला पटत नाही." 

यावर मांडवी म्हणाली की, 

" थोड्या वेळापूर्वी मी, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना आर्यपुत्र भरत यांच्याशी वार्तालाप करताना ऐकल आहे. तेंव्हा ज्येष्ठ भ्राता म्हणाले की, आपण जो आहार विहार करतो, तेच अन्न देवता व पितर याना अर्पण करावं, हेच उचित आणि धर्मनिती मान्य आहे. तेच देवता व पितर यांनाही पोचतं. म्हणून ज्येष्ठ भ्राता यांनी याच इंगूदीच्या गरापासून पिंड तयार केले असावेत." 

कृश माता कौसल्या एकचित्ताने मांडवीचं कथन ऐकत होती. दृष्टीसमोर, आपला लाडका राम, श्राद्ध आणि पितृ कर्म करताना दिसत होता. विधिवत तर्पण आणि श्राद्ध पार पाडल्या नंतर, गुरू आज्ञेने, प्रभू आपल्या दर्भासना वरून उठले, आपणच, आपलं आसन, उचलून त्यांनी ते वसिष्ठ ऋषीच्या ब्रम्ह वृंदातील एका विप्राकडे सुपूर्द केलं आणि भारलेल्या अवस्थेत, आपल्या मातेकडे आले. वृक्षातळी स्थानापन्न झालेल्या मातेला चरणी मस्तक टेकवून प्रणिपात केला. 

मातेने पुत्राकडे हात केला आणि श्रीरामांनी मातेला धरून उठवलं. मातेने पुत्राला आशिष देऊन, आलिंगन दिलं. दोन्ही हृदयातून, महाराज दशरथ यांच्या विषयीच्या अव्यक्त शोका कुल भावना अनावर झाल्यामुळे आणि दीर्घ काळाने भेट झाल्यामुळे, अश्रुंच्या रुपात नेत्रावाटे ओघळायला लागल्या. मातेने पुत्राच्या जटेवरून, मस्तका वरून, चेहऱ्यावरून, खांद्यावरून दोन्ही हात फिरवून, राम, आपला पुत्र खरच आपल्या समोर आहे, याची वारंवार खात्री करून घेतली.

मातेच्या कुशीत शिरत, श्रीरामांनी, आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आईचं ती, पतीच्या निधनाच दुःख, शोक आणि पुत्राच्या वनात गेल्याच्या विरहाच दुःख, अश्या दुहेरी दुःखदायक मनःस्थितीत असलेल्या, कौसल्या मातेला, या पुत्रभेटीने प्राप्त आनंद कितिकाळ टिकेल, याची एक प्रकारची धास्ती, मातेच्या चेहऱ्यावर दिसत होती. अर्थातच श्री रघुनंदन यांच्या ही गोष्ट, लक्षात आली. पण त्यांनी यावर मातेला काहीही विचारलं किंवा सांगितल नाही. श्रीरामानंतर भ्राता भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांनी देखील पिताश्रीच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी यासाठी, तिलांजली दिली 

त्यानंतर, श्रीराम व लक्ष्मण यांची आधी परिवारातील सर्वांची भेट घेतली. त्यांना सांत्वना दिली. त्यानंतर प्रजेतील काही प्रातिनिधिक लोकांना प्रभू श्रीराम यांची भेट घेण्याची संधी देण्यात आली. प्रत्येक जण येऊन, श्रीराम यांना भेटून, सांत्वन करून, अश्रूयुक्त नयनांनी आणि दुःखपूर्ण अंतःकरणाने, आपल्या डोळ्यातील आर्त भावांनी, जणू विनवणी करत होता, की आमचे तारणहार तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही अयोध्येला पुन्हा परत यावं, असा आर्जव प्रत्येक नजरेत ओतप्रोत भरलेला होता.

प्रत्येकाच्या नजरेतील, मनातील हे आर्त भाव, अर्थातच सर्वज्ञ असलेले प्रभू जाणत होते. अनेकांनी प्रभूंची भेट घेतली. यामध्ये, राज्याचे काही मंत्री, सचिव, अधिकारी, सेवकवर्गातील काही, नगरातील,, ग्रामातील प्रमुख मंडळी, नगरपाल, सामान्य जन असे प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी भेटीला येऊ शकतील, याची चोख व्यवस्था अर्थातच, आर्य सुमंत आणि त्यांच्या सचिवांनी केली होती. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकटच करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१८/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...