Skip to main content

राम अनुज भरत भाग ३१(श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -२)

राम अनुज भरत भाग ३१
(श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -२)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

मनाच्या स्थिरता, एकाग्रता या गुणांवर, मनुष्याचे धैर्य, जिद्द व अनुशासन अवलंबून आहे. लक्ष्मणा तू हे जाणतो सच की,जीवनात अनुशासन किती महत्वाचं आहे. त्यामुळे स्थिर व एकाग्र मन, अनेक गुण प्राप्त करून देते. हे गुण, कोणत्याही साधनेत अत्यंत उपयुक्त असतात. ज्या मनात धैर्य व जिद्द असते, त्या मनाच्या धन्याला, जीवनात काहीही अशक्य नसतं. हे धैर्य तेंव्हाच प्राप्त होतं, जेंव्हा माणसाची स्वत:वर श्रद्धा व माणसाचा स्वत:वर विश्वास असतो.

श्रद्धा ही मूलतः मनाच्या कणखरतेचा सबळ पुरावा आहे. कणखर मन तेच असतं, जे आपल्या स्वत्वावर, विश्वास ठेवून असतं.मनाच्या या अजब आणि अनियंत्रित पसाऱ्यात, वरील विवेचनात सांगितलेल्या पायऱ्यांचा अभ्यास नीट केल्यास, या जगातीलच नव्हे तर, या ब्रम्हांडातील आणि त्याबाहेरील, अनेक पायऱ्या मनुष्य, या एकाच जन्मात प्राप्त करु शकतो. 

मनाच्या, आत्म्याच्या उन्नतीच्या ज्या पायऱ्या मानव आपल्या, त्या त्या क्षेत्रातील साधनेने प्राप्त करतो, त्यांच्या पुढील पायऱ्या, त्याला पुढील जन्मात प्राप्त होतात. कारण अनंत देहात फिरणारा आत्मा एकच असतो. त्यामुळे आत्मयात्री हा एकच असतो. सर्व जन्मातील ज्ञान शिदोरी, तोच आत्मा पुढील प्रत्येक जन्मात पुढच्या पायरीवर नेतो. 

म्हणूनच एका जन्मात प्राप्त केलेली, मन स्थिर राखून, एकाग्रता साधून, केलेली साधना, ही तपश्चर्ये समान असते. अर्थातच कोणतीही तपश्चर्या कधीही व्यर्थ जात नाही व निरुपयोगी असतं नाही.साधना म्हणजे साध्या कडे जाण्यासाठी एकाग्र व स्थिर मनाने, सातत्याने अविरत केलेला प्रयास. 

एक ध्यानात ठेव लक्ष्मणा, नियतीचा नियम आहे. जो कोणत्याही प्राणीमात्राला, आपलं इच्छित लक्ष गाठून देतो. स्वतः नियती या नियमाने बद्ध आहे. म्हणूनच, तुला ज्ञात असेल आणि स्मरत असेल तर देवच नाही तर अनेक दानवांनी आपल्या एकाग्र चित्त प्रयत्नाने, साधना करून, आपल्या साध्याला साधून, वरप्राप्ती करून घेतली आहे. नियती फक्त साधना आणि साधक आत्मा यांनाच जाणारे. 

हे सुमित्रा नंदन, म्हणून मी इतक्या शांत, गंभीर आणि एकाग्र चित्ताला प्राप्त केलं आहे. त्यामुळे माझा स्वतःवर दृढ विश्वास आहे. त्यामुळे तू भरताच्या बाबत कोणतीही साशंकता बाळगू नकोस.कारण संशय ही अशी विषवल्ली आहे जी, अनेक त्याज्यतम अवगुणांचा मूलस्त्रोत आणि संचय आहे.एखाद अतीअल्प संशय बीजसुद्धा, मोठ्या तील मोठं साम्राज्य, नष्ट करू शकतं. मुळात संशय हा अनेक अवास्तव प्रश्नांना जन्म देते.  

म्हणून हे अग्निस्वरुप तेजप्राप्त लक्ष्मणा, तू संशय विरहित, स्थिरचित्त होऊन मगच, आपल्या भरताकडे पहा. तू नक्कीच हे जाणशील की, भरत स्वतः पूर्ण निर्मळ मनाने, अयोध्येचा एक राजा म्हणून, आपल्या बंधूंच्या भेटीसाठी येतं आहे. तेही न शक्य झाल्यास, माझ्या हृदयात त्याची प्रतिमा पाहून, पूर्ण श्रद्धा ठेव. आता पुन्हा एकदा, या वृक्षावर चढून, सूक्ष्म नजरेने अवलोकन करून, दूरवर पहा, तुला माझाच भरत येताना दिसेल. आपण सर्व मिळून, येणाऱ्या राजा भरत याचे सहर्ष स्वागतच करूया. प्रभूंच्या या उच्च पातळीवरील ज्ञान वर्धक संभाषणाने, उत्तेजीत झालेला लक्ष्मण, स्थिरचित्त झाला. 

आपल्या प्रारंभीच्या, संशय प्रेरित व अनावश्यक अतार्किक अनावश्यक कथनाने, आता मात्र लक्षणं वरमला. त्याने ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांची चरण स्पर्श करून,क्षमा मागून, योग्य ज्ञान दिल्याबद्दल प्रभूंचे आभार मानले. तद्नंतर त्वरित तो चपळाईने, त्या उंच वृक्षावर चढून अवलोकन करत, प्रभूंना म्हणाला.

" हे रघुकुल भूषण हे कौसल्या नंदन, आपला भरत ससैन्य येत आहे. अयोध्येची चतुरंग सेना सोबत घेऊन येणारा भरत, आरंभीच्या रथावर अग्रेसर होऊन, येत आहे. सोबत अयोध्येचे सूर्यप्रतिमा अंकित पीत वर्णी ध्वजपताका, सुवर्ण मंडीत रत्नजडित राजदंड, छत्र, चामरं, यांनी सुशोभित होऊन आला आहे. त्याच्या रथाच्या किंचित मागे आर्य सुमंत यांचा रथ दिसत आहे. पण एकूण समूदाय फक्त सेनेचाच असावा असे भासत नाही."

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०९/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...