Skip to main content

राम अनुज भरत भाग ४२(भरताचा आर्जव आणि प्रभूंचे उत्तर- २)

राम अनुज भरत भाग ४२
(भरताचा आर्जव आणि प्रभूंचे उत्तर- २)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

भरत पुढे सांगत आहे. 

"धर्म निती व शास्त्र यातील, जी जाणं व जे ज्ञान मला परम गुरू महर्षी वसिष्ठ यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे, त्यानुसार, आपण, या क्षणी अयोध्येला पुन्हा परत येऊन, या सार्वभौम राज्याचा अधिकार, निदान कर्तव्य या नात्याने स्वीकारून, माझ्यासह समस्त अयोध्येचं हित पहावे. कारण पिताश्री पश्चात धर्म, निती, न्याय, तर्क, विवाद, अस्त्र, शस्त्र ,शास्त्र, गुणवत्ता, निपुणता, लौकिक, अधिकार, मर्यादा- पालन, नेतृत्व, सद्गुण, पराक्रम, सिद्धी, बुद्धी, आत्म संयम, मनोबल, दृढता, धारिष्ट व आत्मशुद्धी यामधे आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आणि त्रिलोकात एकमेव व अद्वितीय आहात. 

आपल्या वर्तनाने, नीतीचे पाठ, या जगतात दिले जातील. आपल्या श्रेष्ठत्वाचा दृष्टांत जनमानसात दिला जाईल. आपण, या आपल्या वनवासाच्या निश्चयाचा त्याग करून, या समस्त लोकांच्या कल्याणास्तव माझ्या या विनंतीचा स्वीकार करावा.यातच रघुवंशाचं हित,राजाची इतिकर्तव्य ता आणि आपल्या मर्यादांचे सिद्धत्व आहे, असा माझा आत्मा मला सांगतो. 

अनंतापर्यंत असणाऱ्या या काळाच्या पडद्यावर या विशाल साम्राज्याची, ध्वजा आपण आपल्या हातात घेऊन, समस्त अयोध्यानगरीचं राज्य आपण स्वीकारून, आपल्या प्रजेप्रती आपलं इतिकर्तव्य बजावत आहात. ज्येष्ठ भ्राता, आपल्या हिताचा नव्हे जनहिताचा एखादा मार्ग, कोणी सांगत असेल तर, मात्र तो सांगणारा आपला अनुज आहे किंवा आपल्या पेक्षा वयाने कनिष्ठ आहे, एवढ्याच कारणासाठी, त्याची विनंती अस्विकार्य होऊ शकत नाही. यास्तव आपण माझी, आपल्या अनुजाची ही विनंती, ज्येष्ठ भ्राता या नात्याने, स्वीकारून, अयोध्येला पुन्हा परत यावे. " 

असा आर्जवी स्वरात, दोन्ही हात जोडून, भरत आपल्या सर्व तर्क, निती, धर्म, शास्त्र व ज्ञान यांच्या सहाय्याने, विनंती पूर्वक आपल्या ज्येष्ठ भ्राता, श्रीराम यांनी अयोध्येला परत यावे, यासाठी प्रयत्न करत होता. प्रभू शांत चित्ताने आणि गंभीर चेहऱ्याने, भरताचा आर्जव ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुत सुद्धा परिवर्तन झाले नाही. त्यांच्या निश्चयात तसूभर बदल झालेला दिसला नाही. प्रभू गंभीरपणे, भरताचं कथन संपल्यावर, अत्यंत धीरगंभीर स्वरात, भरताला म्हणाले. 

" हे कैकयी नंदन, रघुकुल भूषण, प्रिय सखा, अनुज भरत, आपल्या रघुकुलाला एक विशाल नैतिक, सैद्धांतिक आणि अखंड तात्विक परंपरा आहे. ज्याचा योग्य तो सन्मान प्रत्येक वंशजाने करून, या परंपरेला एका आद्वितोय उंचीवर नेऊन ठेवलं आहे. हे दशरथ नंदन, या विशाल परंपरेचे आपण सर्व उत्तराधिकारी आहोत. आपली एखादी चूक आपल्याला अनंत काळा पर्यंत, त्याची फळं भोगायला लावेलच. 

पण या परंपरेचा जो अनादर होईल, त्यामुळे क्रुद्ध झालेले आपले बेचाळीस पिढ्यांचे पूर्वज, स्वर्गात, लज्जित होऊन, जगतील. अनुज एक लक्षात ठेव, आपण फक्त वारसदार, राज्याचे नसून, आपण वारसदार या सर्वांचे आहोत. आपण या अर्थी या सर्वांना उत्तरदायी आहोत. 

प्रभू पुढे सांगत आहेत. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२०/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...