Skip to main content

राम अनुज भरत भाग ३४(राम भरत अलौकिक हृद्य भेट)

राम अनुज भरत भाग ३४
(राम भरत अलौकिक हृद्य भेट)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
 
इतका वेळ, धरून ठेवलेले अव्यक्त भाव, हळूहळू व्यक्त व्हायला सुरवात झाली आहे, हे तिघांच्याही लक्षात आलं. अर्थात हेदेखील समजलं की प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याचं स्थळ समीप आले आहे. महामंत्री आर्य सुमंत यांनी भरताला आपल्या दोन्ही हातांनी धरून सावरलं आणि त्याला तसेच धरून, तिघे, पुढील मार्गावर, पद चिन्हांच्या मागे निघाले. काही अंतर गेल्यावर, जवळून एक पर्णकुटी, दृश्यमान होण्यास सूरवात झाली. 

भरत थोडा सावरला. गुरुदेवांनी त्याला, आपल्या कमंडलु तील जलतीर्थ प्राशनार्थ दिलं. पुन्हा चारही जण, त्या पर्णकुटी च्या दिशेने काही पावलं जातात न जातात तोच, समोर साक्षात जगताधिपती, गंभीर मूर्ती, जगताचं सर्व तेज धारण केलेले, श्रीराम, महालक्ष्मी स्वरूप देवी सीता आणि त्यांच्या मागे, धनुष्यबाण सज्ज अवस्थेत, अग्निस्वरूप, शेषावतारी लक्ष्मण उभे होते. 

श्रीराम आणि अनुज भरत यांची नजरानजर झाली आणि भरत अतीव दुःखातिरेकाच्या, आतापर्यंत दाबून ठेवलेल्या भावना, त्याला अनावर झाल्याने, आक्रंदत, लोचनात अश्रुधारा आल्यामुळे, नजर धूसर होऊन, गालावरून ओघळणाऱ्या, अश्रूपाताने, कंपित आवाजाने, कापऱ्या स्वरात, "ज्येष्ठ भ्राता", इतकेच शब्द अस्पष्टपणे पुटपुटला.  

तीन ते चार पावलं टाकून, अडखळत अडखळत भूवर धडपडला. अश्रुयुक्त लोचन, अस्पष्ट आवाज, ज्येष्ठ भ्राता याना देण्यात आलेली आज्ञा, त्या आज्ञेची जननी प्रत्यक्ष आपलीच माता, पिताश्रीना झालेला, प्रिय पुत्राच्या विरहाचा शोक, त्यात त्यांचे झालेले प्राणोत्क्रमण या सर्व मिश्रित आणि अतिरेकी भावाने, तसाच रुदन करत भूवर निपचित पडला.

अत्यंत दुःखित व खिन्न अंतःकरणाने, फक्त "ज्येष्ठ भ्राता, ज्येष्ठ भ्राता" इतकचं अस्पष्ट आवाजात वदत होता. प्रभू श्रीराम यांनी सवेगे धावून, अतीव दुखाने भूवर निपचित पडलेल्या भरताला, खांद्याला धरून, जवळजवळ उचललं. पंचप्राण रहित देहाप्रमाणे, भरताची अवस्था झालेली होती. प्रभूंच्या हस्तस्पर्षाने, कलेवरात जीव यावा, त्याच गतीने व त्याचंप्रमाणे, भरत अशक्त अवस्थेत, उठला. प्रभूंची आणि भरताची नजरानजर झाली.

प्रभूंच्या लोचनात भरत आणि भरताच्या लोचनात फक्त प्रभू दिसत होते. बाकी सारं विश्व अदृष्यमान भासत होतं. किंबहुना, ज्येष्ठ भ्राता श्रीराम आणि अनुज भरत यांनी असहनीय विरहाच्या, ग्रासलेल्या, इतक्या दिवसांच्या बंधनाला मार्ग मोकळा करून दिला. स्वर्गाधी देव, जमलेले सर्वजण हा हृदयद्रावक क्षण, पाहताना आपापल्या लोचनात येणाऱ्या अश्रूंना, गालावरून ओघळून देत होते. जणू काही, हा हृद्य क्षण पाहण्यास, काळसुद्धा क्षणैक माथ्यावर स्थिरावला होता. 

प्रभूंनी आपल्या स्नेहयुक्त हस्ताने, भरताच्या लोचनातून, गालावर ओघळणाऱ्या अश्रूंना पुसले. श्रीरामांच्या या स्नेह पूर्ण कोमल स्पर्शाने,आधीच न्यूनतेच्या, न्यूनगंडाच्या अपराधीत्वाच्या परिसीमेत जाऊन, भावविभोर झालेला भरत, पुन्हा येणाऱ्या गहिवराने, रडायला, अक्रंदायला लागला. ते पाहून, त्याचे अश्रू पुन्हा पुन्हा पुसत प्रभूंनी त्याला आपल्या जवळ घेत, आलिंगन देत हृदयाशी धरून ठेवले. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१२/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...