Skip to main content

राम अनुज भरत भाग ४७(महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद २)

राम अनुज भरत भाग ४७
(महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद २)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. 

महर्षी च्यवन त्यावेळी हिमालयात साधनेसाठी गेले होते. कालिंदिने तिथे जाऊन, महर्षि च्यवन याची भेट घेऊन, त्याना प्रणाम केला. महर्षी च्यवन यांनी तिला आशिर्वाद दिला की, तुला एक सत्य व धर्म परायण,पराक्रमी, बल शाली आणि तुझ्या कुल शील यांची कीर्ती वाढवणारा पुत्र होईल. कालिंदीने महर्षी च्यवन याना प्रदिक्षणा घातली आणि तिथून पुन्हा ती शैल पर्वतावरील आपल्या निवास स्थानी परत आली. 

तिची सवत असलेली दुसरी राणी, ही कालिंदीचा मत्सर करणारी होती. म्हणून तिने, कालिंदीचा गर्भ नष्ट व्हावा यासाठी तिच्यावर विषप्रयोग केला. त्यासाठी तिने जो गर विष घालून कालिंदीला खायला घातला,तो गर तसाच तिच्या गर्भात गेला. कालांतराने, जन्मावेळी बालक आणि तो विषारी गर दोन्ही उदरातून बाहेर आले. ते बालक त्या गराला सोबत घेऊन जन्मले म्हणून, त्याचे नाव सगर ठेवले.हा सगर महापराक्रमी बलवान होता.यानेच आपल्या पुत्राच्या मदतीने समुद्र निर्मिती केली. म्हणूनच त्यांना सागर हे नाव मिळाले आहे. 

या सगर पासून असमज्ज नावाचा पुत्र जन्माला आला. जो आपल्या पापकर्मानी राज्याला भार झाला होता. म्हणून सगर याने त्याला राज्याबाहेर हाकलून दिले. या असमाज्ज पासून जो पुत्र झाला, त्याचे नाव अंशुमान, जो अत्यंत बलशाली व पराक्रमी होता. या अंशूमानचा पुत्र राजा दिलीप आणि दिलीप याचा पुत्र भगीरथ. भगीरथ यांचा पुत्र ककूस्थ. यांच्या नावावरून त्यांचे पुढील वंशज काकूस्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. या ककुस्थ यांचा पुत्र रघु.यांचे वंशज राघव,रघुनंदन,रघुवंशी म्हणून ओळखले जातात आणि कुल हे रघुकुल म्हणून ओळखले जातात. 

राजा रघु यांचा पुत्र कल्माषपाद. कल्माषपाद यांचा पुत्र शंखण. शंखण अत्यंत पराक्रमी होते. परंतु एका युद्धात सैन्यासह ते मारले गेले. शंखण यांच्यानंतर त्यांचा पुत्र सुदर्शन. नंतर सुदर्शन यांचा पुत्र अग्निवर्ण आणि अग्निवर्ण यांचा पश्चात शिघ्रम हे अयोध्येचे महाराज होऊन गेले. शिघ्रंम यांचे पुत्र मरी, त्यानंतर मरी यांचे पुत्र प्रशुश्रुव हे राजे झाले. प्रशूश्रुव यांचा पुत्र महापराक्रमी अंबरीष हे वंशपरंपरेने राज्यावर पदारुढ झाले. 

अंबरिष राजाचा पुत्र नहूष आणि नहुष यांचा पुत्र नाभाग हे राज्यारुढ झाले. नाभाग यांना दोन पुत्र होते. अज आणि सुव्रत. यातील सुव्रत यांचा पुत्र म्हणजे महाराज दशरथ आणि दशरथ यांच्या चार पुत्रातील ज्येष्ठ पुत्र श्रीराम अर्थात तू स्वतः. ब्रम्हा मरिची कश्यप अशी सुरू झालेल्या या परंपरेतील बेचाळीसव्यां पिढीत तुझा जन्म झाला आहे. अयोध्येच्या राजवंश परंपरा अशी आहे की, ज्येष्ठ पुत्रच राज्य पदावर आरुढ झाला आहे. 

ज्येष्ठ पुत्र जीवित असताना, कनिष्ठ पुत्राला राज्य पदावर आरुढ होता येत नाही. या अलौकिक अद्वितीय परंपरेने या वसुंधरेला आजपर्यंत सुरक्षित राज्य प्रदान केलं गेलं आहे. या अखंडित परंपरेला, खंडित करू नकोस. या अयोध्येचे राज्यपद, तुला आरुढ करून घ्यायला आतुर आहे. म्हणून श्रीरामा तू अयोध्येला परत चल आणि सिंहासनावर अभिषिक्त होऊन, अयोध्येला पूनित कर, पावन कर. 

वसिष्ठ ऋषींच्या या कथनावर अयोध्येवासी, आर्य सुमंत, आणि परिवारातील मंडळींना आशेचा किरण दिसायला लागला. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२५/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...