Skip to main content

राम अनुज भरत भाग ५३

राम अनुज भरत भाग ५३

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..

श्रीरामांचा भरतावरील स्नेह पाहून, न राहवून लक्ष्मण वदला,

 "आपला भरतावर अधिक स्नेह आहे, हे मी जाणतो. पण आपल्यावरील स्नेहाखातर,भरत हे दुःखमय,कष्टमय जीवन व्यतीत करेल, हे आपण जाणून घ्यावं."

लक्ष्मणाच्या बोलण्यातील भाव जाणून प्रभू म्हणाले, 

"तसा माझा स्नेह सर्वांवर समान आहेच आणि लक्ष्मणा तू तर माझी छाया आहेस. आपल्या छायेची चिंता कोणी करत का, लक्ष्मणा. जसा मी आहे, त्याच भावात आणि स्थितीत तू असणार, याबद्दल मी निःशंक आहे. पण भरत आणि शत्रुघ्न हे दोघे कायम मला अतिप्रिय होते. नव्हे त्यांची मी नेहमी जास्त चिंता केली. त्यांना विशेष स्नेह दिला. कारण आपण सदैव सोबत असल्यामुळे, तुझी वेगळी चिंता मला करावी लागली नाही. किंबहुना तूच माझी अधिक चिंता करतोस, हे मी जाणून आहे"

रामाच्या बोलण्याने थोडासा वरमुन लक्ष्मण म्हणाला,

"ज्येष्ठ भ्राता, मला तसं म्हणायचं नाही. कारण आपले सर्व भाव जसेच्या तसे माझ्या मनात उमटतात, ज्येष्ठ भ्राताश्री. आपली चिंता ही माझी चिंता आहे. पण भ्राता भरत आपल्याच आज्ञे नुसार, वन जीवन व्यतीत करायला सक्षम आहे. (आणि हसून लक्ष्मण म्हणतो) आपण अजूनही भ्राता भरत याला लहान बालक समजता आहात, असं नाही का वाटत आणि म्हणूनच विशेष चिंता करत आहात." 

लक्ष्मणच्या या बोलण्यावर प्रभूनी स्मित करून, जानकी कडें बघितल. दोन्ही बंधूंच्या या प्रेमालापातील आनंदात जानकीच्या लोचनात आनंदाश्रू तरळले. प्रभूंनी तो भाव जाणला आणि भरताच्या विचारात पुन्हा गढून गेले. 

प्रभू आपल्या पर्णकुटीत गेल्यानंतर,भरत शत्रुघ्न आपल्या मातांना रथात उत्तमप्रकारे स्थापित करून, मग आपल्या रथात आले.सुवर्ण रत्नजडित पादुका असलेल्या रथात स्वतः राजपुत्र भरत आणि शत्रुघ्न स्थानापन्न झाले. आपल्या समोर सुवर्ण चौरंगावर केशरी रेशीम वस्त्राने, आसन तयार करून, त्यावर दोन्ही पादुका, भरताने ठेवल्या. त्यांचं विधिवत पूजन आचार्य महर्षी वसिष्ठ यांनी केलं. त्या रथाचं सारथ्य यावेळी, परतीच्या यात्रेत, आर्य सुमंत स्वतः करत होते. 

तत्पश्चात आचार्य यांसह समस्त मंत्रीगण,सचिव, अधिकारी त्यांचे परिवार जन आपापल्या वाहन व्यवस्थेत स्थानापन्न झाले. नंतरच भरताची आज्ञा घेऊन आर्य सुमंत यांनी निघण्याचा आदेश दिला. आपल्या लाडक्या राज कुमारांच्या एकत्र भेटीचा हा अलौकिक सोहळा पाहून, सर्वांजण, डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना मनसोक्त वाट करून देत होते. 

सर्वजण, आपल्या लाडक्या श्रीरामांच्या जय घोषात, मोठ्या जड अंतःकरणाने, परतीला निघाले. मंदाकिनी नदीच्या बाजूने गेलेल्या मार्गाने जाताना, अनेकविध धातूंच्या रंगांनी चमकणारे चित्रकूट पर्वताचे उभे कातळ, नितांत सुंदर दिसत होते. त्यातून परावर्तित होणारे विविध रंगी किरण अद्भुतरम्य दृश्याची अनुभूती देत होते. 

पण भ्राता शत्रुघ्न आणि भ्राता भरत, खिन्न आणि उदास मनःस्थितीत रथात बसलेले आणि भ्राता भरत याने, आपल्या दोन्ही हातांनी, श्रीराम यांच्या पादुकांना, जणू हार घातलेला. आपल्या ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या चरणा तून उतरवून घेतलेल्या त्या सुवर्ण पादुका पाहताना, भरताला सारखे डोळे भरून येत होते. त्याच्या डोळ्यातून तरारणारे अश्रू, शत्रुघ्न आपल्या उपवस्त्राने पुसत होता. पण त्याचवेळी, स्वतःच्याही नेत्रातील अश्रूंना वाट करून देत होता. समस्त जनसमुदाय अत्यंत दुःखद स्थितीत परत येत होता. 

या सर्वात प्रसन्नता एकच होती, ती म्हणजे ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांची घडलेली भेट आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या पादुका. त्याचप्रमाणे, त्या पादुकांना श्रीराम प्रतिनिधी स्वरूपात स्थापित करण्यास प्रभूंची मिळालेली अनुमती. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
३१/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...