Skip to main content

राम अनुज भरत भाग ४६(महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद १)

राम अनुज भरत भाग ४६
(महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद १)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. 

महर्षी वसिष्ठ, आपल्या कथनात पुढे म्हणाले. 

" हे रघुकुल शिरोमणी, परंपरा आणि कर्तव्य यामधे, जे सर्वश्रेष्ठ आहे त्याचं, पालन सत्पुरुष करतात. तू स्वतः एक पुण्यात्मा आहेस आणि अनेक कारणांनी, अनेकांशी बद्ध आहेस. पण या बद्धतेत, सर्वात श्रेष्ठ बद्धता ही, जन साधारण यांच्याप्रती असलेली बद्धता आहे. कर्तव्य पालन करताना कोणतं कर्तव्य श्रेष्ठ, याचा निवाडा अनेकदा आपल्याला चुकीच्या पथाकडे घेऊन जातो. म्हणून श्रेष्ठ व्यक्ती यामधे कधीही सावध असतात. 

तू स्वतः जरी इथून परत जाऊन, राज्यपद स्वीकारलस तरीही ते कोणत्याही वचनांचा भंग ठरणार नाही. कारण तुझ्या सर्व कर्म व धर्म यामधे, एक राजवंशी म्हणून असलेलं कर्तव्य आणि धर्म हा श्रेष्ठ आहे आणि तोच पालनयोग्य आहे. धर्म आणि कर्तव्य यामधे राजाचा किंवा राज घराण्याचा धर्म आणि कर्तव्य दोन्हीही, प्रजेशी, राज्याशी, भुमीशी आणि आपल्या पदाशी असते. तू तेच निवड, जे प्रजा, राज्य, भू आणि पद चारही गोष्टींना उत्तम न्याय देणार असेल. 

तू वनवासाला न जाता,पुन्हा माघारी जाण्यास निघालास, तरीही स्वर्गात महाराज दशरथ, याना आनंदच होईल. आज पर्यंत तुझ्या वंशाचा पूर्व इतिहास बघितला तर काय लक्षात येतं ते पाहू. पण त्यासाठी तुला, तुझी वंशावळ सांगतो ती शांतपणे ऐकून घे. 

आकाश स्थित परब्रम्ह परमात्मा यांच्याकडून ब्रम्हाजी प्रकट झाले. ब्रम्हाजींचा पुत्र मरीची आणि मरीचींचा पुत्र कश्यप त्यानंतर कश्यपांना पुत्र झाला तो विवस्वान, विवस्वान यांचा पुत्र वैवस्वत मनू. हेच पाहिले मनू. मनू याचा ज्येष्ठ पुत्र इक्षवाकु. मनू यांनी इक्ष्वाकु यांना या पृथ्वीचं सार्वभौम राज्य दिलं. इक्ष्वाकु यांना अयोध्येचे प्रथम राजा म्हणू शकतो, कारण त्यांनी अयोध्येला आपलं राज्य स्थापन केलं. 

त्यांचा पुत्र कुक्षी, कूक्षी यांचा विकुक्षी, विकुक्षि यांचा पुत्र बाण. बाण यांचा अनरण्य. अनरण्य यांच्या राज्यकाळात कधीही दुष्काळ पडला नाही, कधी पूरस्थिती आली नाही किंवा चौर्यकर्मसुद्धा नव्हते. अनरण्य यांचा पुत्र पृथु, पृथू यांचा पुत्र त्रिशंकू.त्रिशंकू यांचा पुत्र धुंधुमार आणि धूंधुमार यांचा पुत्र युवनाश्च. या युवनाष्च यांचा पुत्र श्रीमान मंधाता होते. 

(वाचकांना संदर्भ म्हणून सांगतो. हे.तेच मांधाता आहेत, ज्यांच्या नेत्रातील ज्वालानी, द्वापारयुगात श्रीकृष्णाच्या चलाखीने व युद्धनीतीने कालयावन याला भस्मसात केलं).. मांधातां यांचे पुत्र सुसंधी होते. सुसंधी याना दोन पुत्र होते ज्येष्ठ ध्रुवसंधी आणि कनिष्ठ पुत्र प्रसेनजित. ध्रुवसंधीला महापराक्रमी पुत्र झाला. ज्यांचं नाव भरत होतं. या महाबलशाली राजा भरत याना असित नावाचा पुत्र झाला. 

या असितच्या राज्यकाळात त्याच्या शत्रूंनी, एकत्र येऊन, राजा असित यांच्या राज्यावर हल्ला केला. महापराक्रमी असित यांनी आपल्या सर्व सैन्यानिशी त्यांचा सामना केला. परंतु, शत्रुसैन्य संख्येने जास्त असल्यामुळे, अंती राजा असित याना पराभवाचा सामना करावा लागला. पराभव झाल्यानंतर राजा असित, शैल पर्वतावर निघून गेले. या असित राजाच्या दोन पत्नी होत्या.दोन्ही गर्भवती होत्या. त्यातील कालिंदी नामक पत्नीने, उत्तम पुत्रप्राप्ती साठी महर्षी च्यवन यांचा आशिर्वाद प्राप्त व्हावा या हेतूने, त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. 

महर्षी पुढे कथन करताना म्हणाले. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन :प्रसन्न आठवले
२४/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...