Skip to main content

राम अनुज भरत भाग २९

राम अनुज भरत भाग २९

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

अचानक लक्षणं, सवेगे, प्रभूंच्या दिशेने दौडत आला. आणि समीप येऊन उत्साहित होऊन म्हणाला

" हे जगताधीपती भ्राताश्री मला दुरून, ससैन्य कोणीतरी येत आहे, असे दिसत आहे. मी या उंच वृक्षावर जाऊन, अवलोकन करून आपल्याला सर्व वृत्तांत कथन करतो. आपण सावध राहावे. देवी सीते, आपण भ्राता समीप राहून, माझ्या संदेशाची प्रतीक्षा करावी. "

इतकं बोलून, लक्ष्मण अतिजलद गतीने व स्फूर्तीने जवळच्या उंच वृक्षावर एखाद्या वन्य मूलनिवासी जना प्रमाणे चढून गेला आणि तिथे एका जाड वृक्ष शाखेवर बसून, दुरून दिसणारे दृश्य पाहून म्हणाला.

" भ्राता श्री, दुरून, एक चतुरंग सेना, संपूर्ण दळभार घेऊन, रथ, गजदल, अश्वदळ व पददल घेऊन येताना दिसत आहे." 

प्रभू म्हणातात 

" हे लक्ष्मण, त्यांच्या ध्वजाकडे पाहून, तुला समजू शकेल की, हे कोणत्या राज्याचे सैन्य आहे." 

एकाग्र अवलोकन करून, लक्ष्मण जवळजवळ ओरडुन म्हणाला.

" हे प्रभू, ही चतुरंग सेना, अयोध्येची आहे. कारण त्यांच्या कडे पितरंगी, सूर्यनारायण अंकित ध्वजा आहे. नक्कीच नवीन राज्यपदप्राप्त ज्येष्ठ भ्राता भरत,ससैन्य आपल्याला बंदी करून न्यायला, कैकयीच्याच आज्ञेने येत असावा. परंतु त्याला हे कसे ठाऊक नाही की, स्वयं जगतपती, श्रीराम, संपूर्ण जगताच्या सेनेसमोर,एकटेच प्रबळ आहेत. कदाचित, नवीन राज्यपद प्राप्तीने, त्याच्या बुद्धीवर मदाची धुंदी आलेली दिसते. " 

इतके बोलून, व सैन्याची पूर्ण कल्पना आल्यामुळे, लक्ष्मण अतिउत्साहात, क्रोधात, सवेगे खाली उतरला. त्याचे दोन्ही नेत्र, क्रोधाग्नीची वर्षा करत होते. समोर अन्य कोणी असता, तर त्या नुसत्या नजरेतील क्रोधाग्नीच्या धगीने भस्मांकित झाला असता. कारण तो क्रोध ऐऱ्या गैऱ्याचा नव्हता. तर साक्षात शेषाचा होता. ज्याच्या नजरेत, जगताला भस्म करण्याचं सामर्थ्य, ऊर्जा आणि दाह आहे. 

म्हणून प्रभू शांतपणे, गंभीर स्वरात लक्ष्मणाला म्हणाले

" हे सौमित्रा, प्रथम तू तुझा क्रोध आणि गैरसमज दोन्ही, दृढतेने, त्यागून उभा रहा. जर ते सैन्य अयोध्येचे असेल आणि जर माझा भरत येत असेल तर, तो नक्कीच कोणत्याही गैर हेतूने येत नसेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तू अतिउत्साही आणि अतिकोपी न होता, शांत हो." 

लक्ष्मण त्याचं आवेशात म्हणाला 

" हे देवपती श्रीराम, आपण इतक्या खात्रीपूर्वक कसे काय म्हणू शकता आणि इतके शांत कसे राहू शकता, हेच माझ्या साठी सदैव एक गुह्य रहात आलं आहे. पण जर तो त्याचं उद्देशाने येत असेल तर, आपण मला, शस्त्र हाती घेऊन, त्याला सामोरे जाण्याची आज्ञा करावी. मी एकटा, आपल्या आज्ञे पश्चात,संपूर्ण अयोध्येच्या सैन्याला परास्त करू शकेन, ही माझी श्रद्धा आहे. " 

प्रभू, उठून उभे राहिले. त्यांनी लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून,त्याला क्रोध आवरून शांत होण्याची आज्ञा, आपल्या लोचनानी दिली. प्रभूंची ती गंभीर, शांत व धीरो दात्त मूर्ती पाहून, शेषाचा अग्निअंश असलेला, जळत्या निखाऱ्यासम भासणारा लक्षणं, वरमला, क्षणात शीतल झाला आणि प्रणाम करून त्याने क्षमा मागितली. त्याचे जोडलेले दोन्ही कर आपल्या हातानी धरून, त्याचं स्थितीत त्यांनी आपल्या प्रेमळ, स्निग्ध हस्त स्पर्शाने, त्याचे मन स्नेहाने व करुणेने भारून टाकले. तद्नंतर ते वदले.

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०७/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...