Skip to main content

राम अनुज भरत भाग ४५(श्रीरामांचं विप्र जाबाली याना उत्तर आणि महर्षी वसिष्ठ यांचं कथन)

राम अनुज भरत भाग ४५
(श्रीरामांचं विप्र जाबाली याना उत्तर आणि महर्षी वसिष्ठ यांचं कथन)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. 

 प्रभू स्वयं जाबाली यांच्या या अतर्क्य बोलण्याने चकित झाले आणि उत्तरादाखल जाबाली याना म्हणाले. 

" हे विप्र वर जाबाली, आपण ज्ञानी असून, अशी नास्तिक भाषा बोलून, अतर्क्य युक्तिवाद करत आहात. ज्या गोष्टीं साठी वेद लिहिले गेले,ज्या जन्माच्या,नव्हे जन्म जन्माच्या गोष्टी, अनेक ऋषी मुनी यांनी आपल्या अनुभव व प्रचिती माध्यमातून, इतक्या कळकळीने मांडल्या आहेत. त्या सर्व मिथ्या आहेत, असे आपल कथन आहे, असं दिसतंय. 

मुळातच उया गोष्टी काही ज्ञानी जनांनी आपल्या आंतरिक शक्तीच्या माध्यमाने, ब्रम्हांडात भ्रमण करून, पाहून, कथित केल्या आहेत आणि ज्या ज्ञान स्वरूपात आज अनेक गुरूंनी त्यांच्या शिष्य गणांनी जपून, प्रत्येक पुढच्या पिढीला सांगून त्या आपल्या ज्ञानाने, अनुभवाने, अनुभूतीने, प्रचिती परिपूर्ण आणि सिद्ध केल्या आहेत, त्या मिथ्या आहेत, असं आपल म्हणणं आहे का. 

आणि हे अस तर्क ज्ञान आपण निव्वळ यासाठी सांगत आहात की, आपल्याला त्या गोष्टींचा, त्या बाह्य जगताचा अनुभव वा प्रचिती आली नाही. इतक्या तर्कावर या गोष्टी मिथ्या मानून,हजारो ब्रहाडांची निर्मिती झाली आहे, त्यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे. करोडो वर्ष झाली, या जगताचा नव्हे तर अखिल ब्रम्हांडाचा हा कार्यभार, अव्याहतपणे, सुखे नैव, सुरू आहे, त्यामागे कोणतीही शक्ती कार्यरत नाही, असा आपला नास्तिकतेचा युक्तिवाद आहे का. 

म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे का की, रघुकुला तील अनेकानेक पिढ्यांनी, प्रसंगी प्राणाचे मोल देऊन, जपलेली वचनांची किंमत आपल्या लेखी शून्य आहे. किंवा आपल्या प्रचीतीस व अनुभवास जर एखादी गोष्ट आली नाही किंवा आपला काही विपरीत अनुभव असला की, करोडो वर्षांच्या अनुभूती व प्रचितीसिद्ध गोष्टी मिथ्या कश्या काय ठरतात. 

अर्थात म्हणजे पिताश्री राजा दशरथ यांनी प्राणत्याग करून,आपल्या शब्दांची मोजलेली किंमत ही एक मिथ्या कल्पना आहे,असं आपल्याला म्हणायचं आहे का. नास्तिकतेचा आपला सिद्धांत सिद्ध व्हावा यासाठी आपण वेदांच्या, शास्त्रांच्या ज्ञानाला, परंपरांना, रीती भाती, कुलधर्म, आचार अनुभूती, प्रचिती, सिद्धी, सिद्धता याना मिथ्या ठरवणार आहात जा." 

प्रभूंच्या यां गंभीर स्वरात, शांततापूर्ण भावात केलेलं, विप्र वर जाबाली याना खोडून काढणारं कथन, प्रत्येकजण एकाग्रपणे ऐकत होता.प्रभूंचे हे योग्य कथन ऐकून, महर्षी वसिष्ठ, त्यांना उद्देशून म्हणाले. 

" हे रघुनंदन श्रीराम, जाबाली यांच्या कथनाचा अर्थ, असा शब्दशः घेऊन नकोस. त्यांना येनकेनकारेण तुला परत येण्यासाठी तयार करून न्यायचे होते. त्यांचा अन्य कोणताही उद्देश किंवा अर्थ काढू नयेस. ते स्वतः नास्तिक अजिबात नाही. तश्या प्रकारचं कथन करून, तुला पटवून द्यायची कोणतीही आवश्यकता नाही. कारण तू स्वतः सर्वज्ञ आहेस, हे जाबालीसुध्दा जाणतात. 

कारण ज्ञानाने समृद्ध व बुद्धीने तल्लख असलेले तुझ्या प्रमाणे व्युत्पन्न, अत्यंत कुशाग्र असतात. पण कधीकधी काही बाबतीत भावनावश न होता, कर्तव्य कठोर होऊन, निर्णय घ्यावा लागतो. हे जगताधिपती श्रीराम, अनुज भरत आणि विप्र जाबाली यांच्या कथनाचा, मतितार्थ. म्हणून, तू गांभीर्य पूर्वक विचार करावास, असा माझा तुला एक कुलगुरू म्हणून सल्ला आहे. "

महर्षी वसिष्ठ पुढे म्हणाले. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२३/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...