Skip to main content

राम अनुज भरत भाग ५२

राम अनुज भरत भाग ५२

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..

आपल्या पर्णकुटीत प्रभू आले. बाहेरचे अयोध्या वासी जन, मंत्रीगण, अधिकारी सचिव, परिवार सर्व काही क्षणात नजरेसमोरून दूर झालं. इतका वेळ आपल्या निश्चयात धीरोदात्त असलेले प्रभू, शांत झाले. जानकी आणि लक्ष्मण सुद्धा अत्यंत भावूक झालेले. क्षणभरापूर्वी इथे अवघी अयोध्या लोटली होती. हजारांचा जनसमुदाय इथे. जमा झालेला. पुन्हा ते सारं विश्व, एखाद्या आभासाप्रमाणे अस्तित्वहीन झालं.  

आता हे सारं विश्व पुन्हा चौदा वर्षे दिसणार नाही, हे तर नक्कीच होतं. प्रभूंची शांत पण, मनाच्या कोपऱ्यात विचार मग्न झालेली चर्या पाहून, राजराजेश्वरी, जनक दूलारी, सीता, प्रभूंच्या समीप येऊन,तिने त्यांच्या खांद्या वर हात ठेवला. दोंघानी एकमेकांच्या लोचनात पाहिलं. 

भाव या ह्रदयीचे, त्या हृदयी पोचले होतेच. विचारात मग्न, प्रभू, आपल्या पर्णकुटीत, शोचनीय अवस्थेत बसलेले श्रीराम, यांच्या लोचनात, नकळत अश्रू तरळले. गाला वरून जमिनीवर ओघळू पाहणारे ते अश्रू,सीतेने आपल्या ओंजळीत घेऊन, आपल्या नेत्री आणि भालावर लावले आणि श्रीरामाना म्हणाली

"हे नाथ, आपण कोणत्या वेदनेने अश्रुमय झाला आहात. इतक्या बिकट स्थितीत इतका वेळ, धीरोदात्त असणारे आपण, कोणत्या विचाराने इतके भाव विव्हळ झाला आहात. आपण दुःखी असताना, मला निद्रा ती कशी येणार. म्हणून आपण, आपलं दुःख आणि मनाला होणाऱ्या वेदना, जर मला सांगितल्या, तर आपलं मन, जरा तरी हलकं होईल आणि आपल्या दुःखाचा भार सहचारीणी म्हणून, आपण मला सांगितला, याचं समाधान आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा माझा जन्म वृथाच आहे ना."

असं कथन करून, जानकीने रामांना, कारण सांगण्याची विनवणी केली. आपले ओघळणारे अश्रू उपरण्याने पुसत श्रीराम वदले.

"जानकी, ज्या माझ्या भरताला इजा पोचू नये म्हणून, बालपणी क्रीडा करताना, त्याच्या पायाखाली मी नेहमी माझे दोन्ही तळ हात धरत होतो, त्याच त्या भरताच्या अनवाणी पायांना नंदीग्राम येथील वनाची जमीन आणि चौदा वर्षांचं सन्यस्त जीवन कसं सहन होईल, या विचाराने मला अतीव दुःख आणि वेदना होत आहेत 

आणि मन अत्यंत व्याकूळ झालं आहे. नियती निर्मित ही अगतिकता, इतकी निष्ठुरपणा दाखवून, वेदना माझ्या भरताला देऊन, त्याचा दाह मात्र मला देईल, है नक्कीच ज्ञात नव्हतं. माझ्या भरताला होणाऱ्या वेदना आणि त्यांचा दाह, हे दुःख वनवासाच्या चौदा वर्षांच्या कठोर आयुष्याहून सुद्धा अकल्पनीय आहे."

बाजूला उभा असलेला भ्राता लक्ष्मण क्षमा मागून वदला.

"हे ज्येष्ठ भ्राता, आपण राजमहाल सोडून वनात सन्यस्त जीवन जगणार, या एका कल्पनेपुढे जगातील कोणतही दुःख माझ्यासाठी मोठ नाही."

"अस नको बोलूस लक्ष्मणा. आपण गुरुदेव विश्वामित्र यांच्या आज्ञेनुसार, त्यांच्या सहवासात काही काळासाठी वनात राहून अनुभव प्राप्त झालेले आहोत. त्यामुळे आपल्यासाठी वनातील जीवन हा नूतन अनुभव नाही. पण भ्राता भरताचं तसं नाही. त्याने कधीही वनाचा आणि वनातील कंटकांचा अनुभव घेतलेला नाही. 

त्याला या जीवनाचे चटके सहन होणार नाहीत. भावनावश होऊन आणि बंधू प्रेमाखातर तो पादुका घेऊन गेला आहे खरा आणि त्याने नंदीग्रामात पुढील काळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देखील सत्य आहे.

परंतु, मला काळजी वाटते कारण, त्याच्या सुकोमल मनाला आधीच इतक्या यातना झाल्यात, या सर्व भावातिरेक करणाऱ्या, मागील सर्व घटनांनी. त्यातच तात गेल्याचं अतीव दुःख, माता कैकयी वर असलेला त्याचा अकारण रोष, यात त्याची मानसिक घालमेल यामुळे त्याची भावा वस्था, अतीव दौर्बल्याची झाली आहे. त्यामुळे त्याच्या सुकोमल देहाला, है वनातील जीवन कितपत सहनीय असेल, या विचाराने मला काहीही सुचत नाही आणि निद्राही येणार नाही."

श्रीरामांचा भरतावरील स्नेह पाहून, न राहवून लक्ष्मण वदला,

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
३०/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...