Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

भोग आणि ईश्वर ५७७

भोग आणि ईश्वर  ५७७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  भले भले महात्मे,संत इत्यादी, संसार सागर का म्हणतात, याचा बोध काल आला असेल. मूळ स्व साध्य करण्या साठी करत असलेल्या कर्मातून, मिळणारं फल समोर आल्यावर सामान्य जन, नेहमी त्यात वाहात जातो. हे अंतिम सत्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्या फलाच्या प्राप्तीने आनंद व दुःख होतच राहणार. हे अपरिहार्य व अनिवार्य आहे.माणूस कुठे चुकतो,तर त्याची स्वीकृती वा अस्वीकृती माणूस प्राप्त परिणामांवर ठरवतो.  या चुकीचा अर्थ आणि परिणाम असा आहे की, स्वीकृत फल मनाला आनंद देते आणि अस्वीकृत फल मनाला क्लेश देते.  हा आनंद आणि क्लेश हेच सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. आनंद हे दुःखाचं कारण कसं असेल, असा साहजिक प्रश्न मनात येईल. विचार करा की, एकदा एका कर्मफलातून आनंद प्राप्ती झाली की, माणूस त्याचं प्रकारच्या कर्मात स्वतःला अडकवत जातो. याची एक शृंखला तयार होते. यामध्ये मागील कर्माचा दुःख भोग आला की, मनात अविचार येतात. माणूस चुकीचा मार्ग आणि चुकीचं कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. कारण ओढ इच्छा आणि अपेक्षा यातून तयार झालेली आसक्ती ही माणसाला दुःख भोग आणि अनिष्ट फल स्वीकारू...

भोग आणि ईश्वर ५७६

भोग आणि ईश्वर  ५७६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालचा विषय पुढे नेताना, मनामध्ये असलेला गैरसमज दूर करू. गीता ही फक्त युद्धासाठी अर्जुनाला तयार करण्यासाठी असती, तर ती अठरा अध्यायांइतकी दीर्घ सांगितली गेली नसती. त्यामुळे समस्त विश्वाला, विश्वा तील प्रत्येक जन सामान्यांना कल्पांतापर्यंत मार्गदर्शन करत राहील, हेच त्यामागील प्रयोजन असावं. याचं अजून एक कारण म्हणजे, जर असा काही उद्देश नसता, तर त्यानंतर साडेतीन चार हजार वर्षांनी श्रीसंतज्ञानेश्वर माऊली या रुपात अवतरून, प्रभूंनी स्वमुखे तीच गीता संस्कृत या फार कमी लोकांना ज्ञात असलेल्या भाषेतून, प्राकृतात आणली नसती.  म्हणजेच या गीतेमध्ये नक्कीच, जनसामान्यांसाठी काहीतरी असणार. काय, ते बऱ्याच जणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यातील बरेच अर्थ, भावार्थ, मतितार्थ गुह्यार्थ हे अध्यात्मिक मार्गाचा धागा पकडून, पुढे शोधत आतपर्यंत गेले आहेत. फारच थोड्या विद्वानांनी यातील प्रापंचिक दृष्टीने सार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आज त्या दृष्टीने प्रयत्न करूया.  गीतेतील सर्वश्रेष्ठ दोन सिद्धांत आहेत, कर्मयोग आणि भक्ती योग. तिसऱ्या, सा...

भोग आणि ईश्वर ५७५

भोग आणि ईश्वर  ५७५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     खरंतर नेट (मराठी) अर्थात  चिकाटी ही सर्वच क्षेत्रात उत्तम लाभ देते हे नक्कीच. पण ईश्वर कार्यात किंवा अध्यात्मिक मार्गात, चिकाटी नक्कीच अती लाभदायक मानली जाते. कारण इथे कोणताही प्रापंचिक लाभ मिळावा यासाठी आलेल्यांना पदरी निराशा प्राप्त होऊ शकते. कारण प्रपंचातील लाभ हानी हे कर्मधिष्टीत आहेत, हे सर्वश्रुत आहे. म्हणजे तिथे जे पेराल तेच उगवेल हे नक्की. कर्म आणि फल यांचा ताळमेळ किंवा फल प्राप्तीची वेळ ही, कर्माच्या गतीवर अवलंबून आहे.  त्यामुळे प्रापंचिक जीव हा समोर हे फल येईल, त्यानुसार आपलं मत, भाव आणि इच्छा अपेक्षा ठरवतो. किंवा साहजिक तसच मत भाव आणि अपेक्षा ठरतात. पण अतीदुःख आणि अतीसुख माणसाची मती आणि मतं बदलू वा बनवू शकतात. म्हणजेच एकप्रकारे ज्याला आपण बुद्धीभ्रम म्हणजे ब्रेनवॉश म्हणतो तेच करतात. कारण आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या खूप छोट्या ते खूपच मोठ्या, सुखद आणि दुःखद घटनांच्या आधारे आपली मतं बनवतो किंवा ते आपली मती घडवतात वा बिघडवतात. अर्थात हा झाला बुद्धीभ्रम.  मग अपेक्षित काय हा एक प्रश्न या ठिकाणी सह...

भोग आणि ईश्वर ५७४

भोग आणि ईश्वर  ५७४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     गर्व आणि अभिमान या दोन घोड्यांना मायेचे पाय आणि षड्रीपुची शक्ती असते. ज्यामुळे हे मनाला ग्रासून, अतीवेगात  मनाला पळवत नेऊन, आत्म्याच्या मूळ उद्देशापासून लांब नेतात. कारण त्यांना फक्त आणि फक्त आज माहीत असतं. दुसरं म्हणजे त्यांना एका जिवाकडून दुसऱ्या जीवाकडे जाऊन, त्याला भ्रमित करून, मार्ग भ्रष्ट करणं, इतकचं ठाउक असतं आणि परिणामांची कोणतीही तमा नसते. कारण परिणाम देह व आत्मा भोगणार असतात.   म्हणून एकदा या दोघांनी मनाचा ताबा घेतला की, मन स्वैर होऊन, सर्वात प्रथम सद्सद्विवेक बुद्धी गमावून बसतं. याचसाठी संत महंत, ऋषी मुनी यांनी संयम आणि चिंतन या दोन अस्त्रांना नेहमी जवळ ठेवावं, असं सतत सांगितलं आहे. ही दोन अस्त्र, गर्व अभिमान यांसह देह, बुद्धी व मन यांच्या  सर्व शत्रूंना परास्त करू शकतात.  कारण संयम चुकीच्या विचारांना येण्यापासून थांबवतो  आणि चिंतन योग्य विचारांना स्थान देऊन, त्या माध्यमातून, योग्य कृती करायला सहाय्यभूत होतं. संयम विचारांचा, रक्तप्रवाहाचा मार्ग सूनियांत्रित करतो आणि मानसिक थकव...

भोग आणि ईश्वर ५७३

भोग आणि ईश्वर  ५७३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    एक स्पष्ट आहे की, मनाच्या माध्यमातून देहाचा सुयोग्य वापर करून, आत्मशक्ती जागृत करणं, हाच योग्य मार्ग आहे. अशी आत्मशक्ती मर्यादित स्वरूपात जागृत असेल तर, माणूस या जगतातील अनेक क्षेत्रात, असामान्य कर्तृत्व दाखवून अनेक अलौकिक कार्य व कर्म करू शकतो. याची प्रचिती आपल्याला अनेक क्षेत्रात येते. ही जागृती व्यक्तिगत पातळीवर, निर्विवाद पणे प्रचंड लाभ देतेच, पण सामूहिक पातळीवरही, अनेक प्रकारे अद्भुत कार्य घडवून आणते.  पण ही जागृती आत्म्याची आहे, हे कळण्यासाठी काही कसोट्या आहेत. म्हणजे उद्देश, साध्य अर्थात aim and ambition ही प्रापंचिक, व्यक्तिगत लाभासाठी असेल तर, ती सांसारिक वा भौतिक पातळीवर आणि त्यासाठीची जागृती आहे, हे नक्कीच. पण एकाग्रतेने असा लाभ सांसारिक पातळीवर झाला तर त्याला मनःशक्तीची प्राथमिक अवस्था म्हणता येईल. संपूर्ण जागृतीची अत्यंत प्राथमिक अवस्था.  प्राथमिक यासाठी की, मनाच्या शक्तींचा हा लाभ, सुरवातीला नक्कीच भौतिक प्रगती, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्ती घडवतो. पण तो अंतिम टप्पा नाही. तो एक थांबा आहे. ज्यामध्ये न थ...

भोग आणि ईश्वर ५७२

भोग आणि ईश्वर  ५७२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     माया म्हणजे भ्रम. हा भ्रम कशाचाही असू शकतो. अगदी मी कुणी नाही इथपासून मी कुणीतरी आहे. अर्थात निराशा ते गर्व असा असू शकतो. असलेल्या संपत्तीमुळे आलेल्या मस्तीचा किंवा नसलेल्या पैश्यामुळे आलेल्या दुःखाचा असेल, आयुष्यात भोगलेल्या भोगांचा असेल किंवा उपभोग घेत असताना वाटणाऱ्या सुखासीनतेचा. असे अनेक भ्रम माणूस आयुष्यात बाळगतो.  या भ्रमात माणूस आयुष्य जगतो. अनेक कर्म याचं भ्रमात करतो. कारण आपला आयुष्याचं जगण्याचं आणि कर्माचं गणित हे या मायेच्या आधारावर वसलेलं असतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा दूषित किंवा भ्रमाने ग्रस्त आहे. आपण फक्त आणि फक्त सद्यस्थितीला, सद्य परिणामांना आणि सद्य घटनानाच बघतो. सद्य याचा अर्थ या जन्मा तील आयुष्य आणि त्या आयुष्यातील घटना, अनुभव, दृश्य, संवाद यांसह जे पाहतो ते.  त्यावर आधारित आपली मत, आपल्या प्रतिक्रिया, आपली कर्म, आपल जगणं, आपल्या श्रद्धा, आपला विश्वास असतो. आपण जो विचार करतो, त्याला या जन्मातील दाखले व अनुभव हा एकमेव आधार असतो. कारण माया जी, या जग...

भोग आणि ईश्वर ५७१

भोग आणि ईश्वर ५७१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     आत बाहेर सर्व व्यापून उरलेल्या त्या ईश्वराला जाणण्या साठी मुळात कुठेही जायची खरतर आवश्यकता नाही. कारण कालच्या बादलितील त्या भांड्यात आणि उर्वरित बादलीत असलेल्या जलाप्रमाणे, ईश्वरी अंश देहाबाहेर आहे, तसाच तो आत्मरुपात, देहात सुद्धा वास करून आहेच. अर्थात त्याला बाहेर कुठे शोधण्यापेक्षा, हृदयात वस्ती करून असलेल्या आणि सर्व देहाला चैतन्य देणाऱ्या, आत्म्याला जागृत करणं, हा एकच उपाय सर्वोत्तम आहे.  खोलात जाऊन विचार केला तर हृदयात वसलेला आत्मा ऊर्जा, बल व चैतन्य स्वरूपात संपूर्ण देहात, अर्थात प्रत्येक पेशीत, नसांमध्ये, धमन्या, रुधिर अर्थात रक्त यांमध्ये सतत फिरत आहेच. हा प्रकृतीचा, विधात्याचा, एकप्रकारे चमत्कार आहे, ज्याप्रकारे हा देह आणि त्याची रचना त्याने केली आहे. आला इतका उत्तम देह, प्रत्येक पेशीमध्ये चैतन्य, हे सर्व ईश्वराने मानवाला देताना, किमान अपेक्षा ही केली की, हा मानव, याबद्दल आपले आभार मानेल.  तरीही ईश्वर कधीही त्या अपेक्षेने काहीही करत नाही. किंबहुना जगत निर्मिती करतेवेळी, ईश्वराने निरपेक्ष बुद्धीने, संपूर...

भोग आणि ईश्वर ५७०

भोग आणि ईश्वर  ५७० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     सूक्ष्मातील सूक्ष्म जीवात आणि महत्तम जीवात असलेला अंश हा ईश्वराच्या अस्तित्वाचा खूप मोठा जिवंत पुरावा आहे. अति उच्च दर्जाच्या सूक्ष्मदर्शक यंत्रात दिसणाऱ्या किडा वा प्राण्याच्या देहातील हृदयात, तितकाच सुक्ष्मांश होऊन ईश्वरी अंश तोसुद्धा देह चालवतो. या समस्त जगताचा पसारा, सांभाळणारी शक्ती विविध रुपात, विविध देहात, देहाबाहेर आहेच पण ब्रम्हांड, त्या पलीकडे आणि त्याही पार हा ईश्वर अंशरुपाने आहेच. एक उदाहरण घेऊ, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. एक बादली घेऊ, ती ब्रम्हांड स्वरूप मान्य. त्या बादलीत पाणी आहे, जे ईश्वरी अंशाचं स्वरूप आहे. त्या बादलीत एखादं भांडं ठेवलं. त्या भाड्यात पाणी साठल्यावर,  ते भांडं तळाशी गेलं. ते भांडं हे देहाचं प्रतीक आहे. त्यामध्ये जमलेलं पाणी हे आत्मरुप चैतन्याचं प्रतीक आहे.आता भांड्यात चैतन्य आहेच पण त्या भांड्या बाहेर सुद्धा तेच चैतन्य आहे.  आता बादलीत जे चैतन्य आहे, तेच त्या भांड्याच्या आत आहे.  भांड्याच्या आतील चैतन्य आणि बादलीत असलेलं चैतन्य हे एकच आहे. पण देह, बुद्धी व मन यांच्या मर...

भोग आणि ईश्वर ५६९

भोग आणि ईश्वर  ५६९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    भगवंताच्या स्थूल स्वरुपाबद्दल विस्ताराने जाणल्यानंतर, आपण सूक्ष्म रुपात ईश्वरी अस्तित्वाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सूक्ष्मता ही अणूच्या सुद्धा कित्येक पट सूक्ष्म असू शकते.  लक्षात घ्या की, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कित्येक कीटक, कृमी, जंतू, जीव यांना आपण सूक्ष्म दर्शक यंत्राने पाहू शकतो. ते पाहताना त्यांच्या शरीर रचनेचा अभ्यास आधुनिक विज्ञान करतं. त्या विषयाची स्वतंत्र शाखा सुद्धा आहे.  अश्या या अभ्यासात आधुनिक जगताला, त्या सूक्ष्मातील सूक्ष्म जीवांच्या शरीरांतर्गत रचना, वेगवेगळी इंद्रिय, अवयव याबद्दल जाणून घेताना, एक प्रश्न कायम डोकावतो की, जी गोष्ट आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघावी लागते, तेसुद्धा प्रत्यक्षाच्या कित्येक पट प्रतिमा मोठी करून, तर त्या सूक्ष्मातील सूक्ष्म जीवाच्या शरीराची संरचना विधात्याने निर्माण कशी केली असेल.  त्या सर्व प्राण्यांमध्ये इतर प्राण्यांसारखीच बाह्य व अंतर्गत शरीररचना, इतक्या छोट्याश्या जीवाचे तितकेच सूक्ष्म अवयव, पाय, पंख शरीरातील पेशी, पचनसंस्था, हृदय आदी रचना कशा अ...

भोग आणि ईश्वर ५६८

भोग आणि ईश्वर  ५६८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)      कालचाच विषय पुढे नेऊया.  पण या सर्वात भुलोकीचं  बिघडलेलं संतुलन , पूर्ववत व्हावं यासाठी, ईश्वराकडून केले जाणारे corrections आजही होत आहेत आणि पुढेही होतच राहतील. याचं कारण ही व्यवस्था, ही निर्मिती, या ब्रम्हांडाचं अस्तित्व ईश्वराच्या संकल्पनेतून आलेलं असल्यामुळे, तो कधीही कोणत्याही परिस्थितीत, या जगताचं नियंत्रण स्वतःच्या हातातून अनियंत्रित होऊ देणार नाही. ज्या ज्यावेळी अशी वेळ आली किंवा येते अथवा येईल, त्या त्यावेळी स्वतः येऊन दाखल घेऊन, आपलं अस्तित्व दाखवून, आपल्या हातात पुन्हा सूत्र घेण्यासाठी गरज पडेल ते सर्व ईश्वर करेलच.  फक्त मधल्या काळात असुररुप दानवी वा मानवी शक्ती आपल्याला काही काळासाठी, शक्तिमान झालेल्या दिसतील. पण इथे एक लक्षात ठेवणं जरुरी आहे की, आपण या जगतात प्रत्येक जन्मात, काळाच्या त्या त्या परिघात काही वर्ष घालवतो. जी संपूर्ण जगताचं आयुष्य लक्षात घेतलं, तर अतीसूक्ष्म प्रमाणात आहे. त्यामुळे आपलं सर्व अनुमान, अभ्यास, निष्कर्ष, चिंतन यावर त्या त्या काळाचा प्रभाव अधिक असणार, हे नक्की. पण क...

भोग आणि ईश्वर ५६७

भोग आणि ईश्वर  ५६७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     काल आपण ईश्वराच्या स्थूल अर्थात macro अस्तित्वा बद्दल चिंतन केलं. आता आज micro म्हणजे सूक्ष्म अस्तित्वाबद्दल बोलण्याआधी हे लक्षात घ्या की, स्थूल आणि सूक्ष्म या शब्दाबद्दल आपण ज्ञानोबा माऊलीच्या एका अभंगात  ऐकलं आहे की,  तुज सगुण ह्मणों कीं निर्गुण रे । सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥ तुज स्थूळ ह्मणों कीं सूक्ष्म रे । स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥ याचं अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात माऊली म्हणतात की, तुज स्थुळ म्हणू की सूक्ष्म रे. यातील स्थूल अस्तित्व आपण कालच्या भागात पाहिलं, त्यावर अजून विवेचन आज पाहूया. संपूर्ण जगताची, ब्रम्हांडाची, चराचराची काळजी घेण्यासाठी, जी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, त्याची निर्मिती स्वयं विधात्याने केली आहे. ती सुसुत्रतेने चालू आहे, हे बघण्यासाठी तशी chek system अर्थात नियंत्रण व्यवस्था, उत्तम रीतीने, युगानुयुगे कार्यरत आहे.  या सगळ्यात, कुठेही चूक, फेरबदल, घातपात होत नाही. आज कलियुगात इतकी वर्ष झालीत, पण त्याच्या प्रभावाने, एखादा मृत्यू उशिरा झाला, कोणाला न्यायचं राहून गेल...

भोग आणि ईश्वर ५६६

भोग आणि ईश्वर  ५६६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    कालचाच विषय पुढे नेऊया. आपला हा मानव जन्म आणि त्यानंतरचा पुढील जन्म यातील शाश्वतता, फक्त हा जन्म ही, आहे. कारण पुनर्जन्म आहे हे आपला धर्म, त्यातील ज्ञान, वेद पुराण इत्यादी मधून मांडलं आहे. तर्काने, उदाहरणाने, तात्विक गोष्टींच्या माध्यमातून, हे आजपर्यंत नक्की दाखवून देण्यात आलं आहे की, आत्मा अस्तित्वात आहे, तो वेळोवेळी, देह धारण करतो, अनेक देहात फिरताना, कर्माचे भोग, विविध माध्यमातून भोगतो, उपभोगतो, अनेक जन्म असतात, त्या जन्मातील देहाच्या कर्मांची फलितं, देहच भोगतो, पण त्याचा परिणाम आत्म्याला, पुनर्जन्म रुपात, सहन करावं लागतं.  पुनर्जन्म नाहीत, हे काही धर्मात मानलं गेलं आहे. तरीही, त्याला उपयुक्त पुरावे नक्कीच देता येत नाहीत. कारण वर मांडलेले अनेक प्रश्न हे इतर धर्मातील तत्वज्ञानात दिले जात नाहीत. पण अनेक गुह्य गोष्टी अश्या आहेत, ज्याला निश्चित उत्तर नाही. पण सारासार तात्विक विचार आणि पुराणातील निश्चित उदाहरणं श्रीकृष्ण व श्रीराम यांच्या चरित्रातील अनेक संदर्भ, जे अस्तित्वात होते, त्यांच्या साक्षी खुणा आजही सापडतात, त्...

भोग आणि ईश्वर ५६५

भोग आणि ईश्वर  ५६५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    एक महत्वाचा मुद्दा कालच्या चर्चेतून पुढे येतो, तो म्हणजे आपण आपल्या भक्ती व श्रद्धेच्या परतफेडीमध्ये, काही अपेक्षा कारण हे, आपल्याच त्या भक्ती व श्रद्धेला व्यवहाराच्या पातळीवर आणून ठेवल्या सारखं आहे. कारण एका गोष्टीच्या बदल्यात, दुसरी काही अपेक्षा कारण हा शुद्ध व्यवहार आहे. आणि तो व्यवहाराच्या पातळीवर योग्य आहे. पण भक्ती, श्रद्धा व विश्वास, यांच्या प्रांगणात अशी अपेक्षा किंवा तसा काही विचार येणं, ही सुद्धा हीन आणि हानिकारक गोष्ट आहे. मुळात आपण भक्ती व श्रद्धेने काही करतो, त्यावेळी ती निरपेक्ष बुद्धीने केलेली असावी. म्हणजे मी इतकं करतो, त्यामुळे मला त्यासाठी ईश्वर काही देत नाही. किंवा त्याची काहीच दाखल ईश्वर घेत नाही,असा कटू, नकारात्मक विचार गैर आहे. कारण मुळातच आपल्या काही सत्कृत्यांच्या बदल्यात, आपल्याला, सर्वात सक्षम आणि बुद्धी, मन आणि आत्मा यांना शुद्ध करण्यास योग्य असलेला most capable, देह मन देऊन देवाने अनंत उपकार केले आहेतच.  कारण कितीही पुण्य गाठीशी असलं तरीही, ते योग्यवेळी कामाला यायला, ईश्वरी आणि सद्गुरूंची क...

भोग आणि ईश्वर ५६४

भोग आणि ईश्वर  ५६४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    आपण काल सद्गुरू किंवा पुण्यात्मे काय करू शकतात याचं एक उदाहरण पाहिलं, ते म्हणजे वाल्मिकी ऋषींच. याचं संदर्भात, विषय पुढे नेण्या आधी, अजून उदाहरणं बघता आली तर पाहूया. यात खूप महत्वाचं उदाहरण म्हणजे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतले, त्या रेड्याचा त्यांनी, मानवेतर देहात असूनही, मस्तकी कृपेचा हस्त ठेवून, त्या फक्त स्पर्शाने, उद्धार केला.  कारण एकदा पुण्यात्म्यामे कृपेचा आशिष देऊन, एखाद्या जीवाच्या देहाला स्पर्श केला, की त्या स्पर्शातून, त्या देहात उतरणाऱ्या दिव्य लहरी, त्या देहात वसलेल्या आत्म्याला, त्याच्या सर्व पापातून, कर्मातुन, कर्मभोगातून मुक्त करू शकतात. कारण त्या दिव्य सत्पुरूष स्पर्शातून जी दिव्य स्पंदन बाहेर पडतात, त्याने त्या देहाची आणि त्या आत्म्याच्या प्रारब्धात जमा असलेली सर्व अनिष्ट कर्मफलं आपोआप नष्ट वा जळून खाक होतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे, अश्या सत्पुरूषांच्या आत्म्याच्या गाभ्यातून, फक्त सात्विक, दिव्य आणि पुण्यवान लहरी बाहेर पडतात. त्यांच्या वृत्तीत कोणताही किंतू पर...

भोग आणि ईश्वर ५६३

भोग आणि ईश्वर  ५६३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  देहा देहातून प्रवास करणारा आत्मा, देहाची अवस्था, मनाचा विषयाकडे असणारा ओढा व धाव, ती साध्य करण्यासाठी, देह बुद्धी व मन यांची चढाओढ, त्यामुळे समोर आलेलं अनिष्ट दुःखकारक व भोगात्मक फल यांच्या वेष्टनात, अशुद्ध झालेला, स्वत्व हरवलेला आत्मा निराशेने आणि मनात तीच खिन्नता घेऊन, देह त्यागतो. देह त्यागून आत्मा अश्या देहाच्या प्रतीक्षेत फिरतो, ज्यामुळे, आत्म्याची शुद्धता होऊन, पुढील हेतू साध्य होऊ शकेल. पण हीसुद्धा एक शक्यता किंवा इच्छा असते.  पण मुळात आधीच्या अनेक  देहात फिरत असताना, त्या त्या देहातील मन, बुद्धी व देह यांच्या विकाराने अशुद्ध तत्व प्राप्त झालेला आत्मा, खरतर, योग्य संधी मिळण्या साठी कृपा प्राप्तीच्या अपेक्षेत असतो. कारण मनाची शुद्धता आणि मग त्याद्वारे आत्मशुध्दी साधून, योग्य मार्गाकडे जायला, भोग व उपभोग ही मालिका संपावी लागते. तशी ती संपण्यासाठी, काही जन्मातील पुण्याची जोडणी असावी लागते, किंवा कृपा प्राप्ती व्हावी लागते.  कृपा प्राप्ती योग, हा पात्र किंवा अपात्र दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना साध्य होऊ शकतो. त्...

भोग आणि ईश्वर ५६२

भोग आणि ईश्वर  ५६२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  प्रत्येकाच्या आयुष्यात एका विशिष्ट वयात व काळाच्या विशिष्ट कालखंडात, उमेद संपल्यानंतर, निवृत्त होण्याची स्थिती येते. त्यावेळी अनेक गोष्टी, ज्या करायच्या राहिलेल्या असतात किंवा नोकरी धंद्याच्या काळात, त्या करता आलेल्या नसतात, त्या करण्यासाठी निवडल्या जातात. बहुतांश जण, त्या काळात, अध्यात्म, वाचन, मनन, चिंतन, इत्यादी अनेक क्षेत्र निवडून, त्यात वेळ घालवून, मन शांत करून, आयुष्यात आलेले चढउतार, बरे वाईट अनुभव, दुःख भोग इत्यादींमुळे आलेला शिणवटा, मनात त्यावेळी तयार झालेले, पण अव्यक्त असलेले भाव, या अध्यात्मिक वाचन व चिंतन या माध्यमातून, घालवण्याचा अर्थात release करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात यात काही गैर आहे असं मला म्हणायचं नाही. पण या उदाहरणातून, जे तत्व आपल्याला सापडतं, त्यावर आपण विचार करण्याचा प्रयत्न करूया. यातून एक लक्षात येतं की, एका ठराविक काळानंतर, मनाला काही स्वस्थता, शरीराच्या हळूहळू मंदावत जाणाऱ्या हालचालीतून डोकावणाऱ्या स्वास्थ्याच्या चिंता या सर्वातून, शांतता व मोकळीक हवी असते. मग विचार करा की, अनेक देहातून, अनेक जन्मात...

भोग आणि ईश्वर ५६१

भोग आणि ईश्वर  ५६१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    एक प्रश्न जो नेहमी मनात येतो, पण उत्तर सापडत नाही. तो प्रश्न म्हणजे जर प्रारब्धात लिहिलेले भोग हे भोगुनच संपवायचे, तर मग ईश्वर, ईश्वरी आराधना, साधना, जपजाप इत्यादी का करायचं. त्याचं प्रयोजन काय. या प्रश्नांकडे दोन प्रकारे बघता येईल. एक म्हणजे साध्य आणि साधना. म्हणजे यातून काय साध्य करायचं आणि त्यासाठी काय साधना करायची. एखादी गोष्ट जाणायला, आपण पूर्ण बालक होऊन जाणून घेऊ शकतो. कारण तरच आपल्या मनाची शुद्धता प्राप्त होते, शुद्धतेतून निरागसता आणि त्यातून ज्ञानप्राप्ती होते.  कोणत्याही विषयात उत्तर ज्ञात नसताना, आपण क्ष गृहीत धरतो आणि पुढे जातो. त्यानंतर योग्य पायऱ्या पार केल्या की,  उत्तर आपल्याला सापडतं. आता आपल्या प्रश्नाकडे वळूया. मुळात आपण प्रारब्धात असलेले भोग भोगतो, म्हणजे काय करतो, तर आपल्याच कर्माची आपल्या समोर आलेली फळं भोगतो किंवा उपभोगतो. उपभोग घेताना आपण कधीही शंका घेत नाही किंवा विचारसुद्धा करत नाही की, मी ज्या सुखाचा उपभोग घेतोय ते सुख, मला कशाप्रकारे प्राप्त झालं.  आपण साधा विचार करतो की, जे मिळालं...

भोग आणि ईश्वर ५६०

भोग आणि ईश्वर  ५६० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)   खरतर सहज सोप्पा असा वाटणारा एखादं प्रश्न प्रत्यक्षात आपल्याला सोडवायला अत्यंत कठीण जावा त्याप्रमाणे, हा सारा गुंता आहे. माणसाला दुःख, दैन्य, भोग, अनिष्ट काळ, कष्ट काळज्या, येणार आणि त्यानंतर सुखाचा, उपभोगाचा काळ सुद्धा येणार. खरी परीक्षा, या दोन्ही काळाना, तोंड देण्यात वा त्यातून नीट जाण्यात नाही, तर त्यामध्ये मनाचा तोल ढासळू न देता, मनाची शुद्धता राखण्यात खरी परीक्षा आहे.  म्हणून मनाला सांभाळणारं, त्याला ज्ञान देणारं, जाणीवा जागृत करून, देहाच्या गरजा कमी करत करत, मनाला अंतर्मुख करणारं असं काही असा, या उद्देशाने, ईश्वराने अनेक गोष्टी घडवल्यात. जेंव्हा आलं ईश्वराने घडवल्या असं म्हणतो, तेंव्हा आपण या विश्वात निर्माण झालेल्या, प्रत्येक निर्जीव व सजीव गोष्टीचा निर्माता, या दृष्टीने त्याला संबोधतो. वास्तविक आपण त्याला कधीही पाहिलं नाही, तरीही ज्ञानाने, जाणीवानी चर्मचक्षुंनी, जगाकडे, त्यातील प्रत्येक घटनेकडे, सूक्ष्मातील सूक्ष्म जीवाला जाणून, अंतर्नादाने, मनःचक्षूनी अश्या अनेक प्रकारे त्याला या जगतात साक्षीभूत मानतो.  य...

भोग आणि ईश्वर ५५९

भोग आणि ईश्वर  ५५९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  संपूर्ण आत्मप्रवासात अनेक देहात अनेक जन्मात व काळाच्या वेगवेगळ्या खंडात, त्या त्या देहात असताना आत्मा हा मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. याचं कारण म्हणजे आत्मा हा स्वतः काही करू शकत नाही. त्याला माध्यम लागतं. ते माध्यम हे फक्त आणि फक्त देह आहे. देहाशिवाय आत्मा काहीही करू शकत नाही. माध्यम असल्याशिवाय आत्मा आला कोणताही प्रवास, कर्माच्या फलांचा भोग वा उपभोग घेऊ शकत नाही. जितका काळ देह मानवदेहाव्यतिरिक्त इतर चौऱ्यांशी लक्ष योनीतून फिरतो, तितके जन्म फक्त आणि फक्त भोग भोगतो.  त्या कोणत्याही जन्मात ईश्वराने आत्म्याला शुद्धता प्राप्त करण्याची, कर्माच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची, श्रद्धा भक्ती अर्पण शरण याद्वारे, जगाच्या मालकाला प्राप्त करण्याची कोणतीही सोय वा मार्ग ठेवलाच नाही. ते फक्त आणि फक्त मानवी देहातून प्राप्त करता येतं. यासाठी मानव देह प्राप्ती हीच मुळात या दिशेने आत्म्याने प्राप्त केलेली पाहिली पायरी आहे. कारण इथेच ईश्वराने ज्या सोयी,सवलती, मार्ग, इंद्रियांची उपलब्धता, सर्व प्रकारच्या अंतर्गत रचनांनी  युक्त देह बुद्धी आण...

भोग आणि ईश्वर ५५८

भोग आणि ईश्वर  ५५८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    जेंव्हा आपण जन्म व मृत्यू आपल्या हातात नाही, असं म्हणतो, त्यावेळी ते अर्ध सत्य असतं. किंवा असं म्हणता येईल की, ईश्वरी अंशातून, एक अंश या ब्रम्हांडात पुढील यात्रेसाठी येतो, तोच मुळात ईश्वरी संकल्प असतो. म्हणजे मग, असं म्हणता येईल का की, पुढचा सर्व प्रवास किंवा यात्रा हा ईश्वरी संकल्पच असतो.  पण तसं नाही. याचं कारण की, एकदा या ब्रम्हांडात आत्मा आला की, तो या ब्रम्हांडातील वातावरण, लहरी, पंचमहाभूते यांचे जगत या सर्वातून निर्माण झालेली माया, या सर्वांच्या प्रभावात येऊन आधीन होतो आणि या जगताचा एक भाग होतो. ही आधिनता, ही अपरिहार्यता आहे पण आणि नाही पण. यावर उद्या चिंतन करूया.  म्हणजे नंतर जे काही कर्म त्याच्या हातून होतं, ते त्याच्या स्वतःच्या उद्देशांचा, जबाबदारीचा भाग असतो. म्हणजेच नंतर घडणारा सर्व प्रवास हा अनंताकडे नेणारा वा जाणारा असतो. आता या प्रवासात जीवाला जे भोगावं, बघावं लागेल, याचं उत्तरदाित्वसुद्धा, त्या जीवाचच असतं. पण मग तरीही आपण का म्हणतो की, जन्म आणि मृत्यू, आपल्या हातात नाही.  कदाचित हाच संभ्रम आ...

भोग आणि ईश्वर ५५७

भोग आणि ईश्वर  ५५७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  या जगतात ईश्वराने मानवाला मनाबरोबर अलौकिक इच्छा आणि त्यासह मनात अमाप शक्तीचं वरदान दिलं. उद्देश हा होता की, या अफाट इच्छाशक्तीच्या बळावर, मानव, दृढ निश्चयाने व अजोड कर्तृत्वाने, ते सर्व आत्म सात करेल, जे एखादा योगी, तपस्वी, ऋषी व मुनी साध्य करू शकतात. खरतर हा साधा विचार कोणत्याही सामान्य माणसाच्या मनात येत नाही की, त्याला जमतं तर मला का नाही जमणार.  या एका विचाराने अनेक अशक्यप्राय गोष्टी साध्य होऊ, शकतात. पण माया आणि मनाला ओढणाऱ्या इतर अनेक प्रलोभनं, दुःखात व सुखात मन घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिका, या देह बुद्धी यांना भ्रमित करून, कर्माच्या चुका करायला भाग पाडतात. पण खरा धोका हा या समजुतीमुळे होती की मला देवाने या देहात मनाप्रमाणे वागण्याचं, जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचाच अर्थ ईश्वर माझ्या जीवनात कोणतीही दाखल देणार नाही.  हे तांत्रिक दृष्ट्या जरी खरं असलं तरी, यातील खरा गहन अर्थ माणसाला कधीच लक्षात येत नाही. किंवा लक्षात येतो त्यावेळी, बऱ्याच कर्माच्या गोष्टी हातून घडून गेलेल्या असतात. त्यामुळे त्यांची फळं, समो...

भोग आणि ईश्वर ५५६

भोग आणि ईश्वर  ५५६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    आपण मागील भागात पाहिल्या प्रमाणे अनेक संवेदक (सेन्सर्स) व नियंत्रक (कंट्रोल), जे प्राण्यांमध्ये कार्यरत असतात, ते मानव निर्मिती करताना, ईश्वराने काढून टाकले. कारण या सर्वांच्या बदल्यात, ईश्वराने मानवाला, मन, बुद्धी, पूर्ण विकसित मेंदू आणि विचारांचं मोठा भांडार, मनात जागृत, अर्ध जागृत व सुप्त असे प्रकार, हे सर्व सांभाळण्यासाठी बुद्धी, गहनातील गहन ज्ञान जाणण्यासाठी, जाणिवांची केंद्र, मनात अमाप सामर्थ्य, शकतो, बल, इत्यादी सर्व बहाल केलं.  उद्देश एकच की, मानव या सर्वांचा उपयोग करून, पूर्ण विकसित देह व त्यातील बुद्धीच्या सामर्थ्याने आत्मउद्धार, आत्त्म उन्नत्ती साधून, नर ते नारायण ही प्रगती साध्य करून, ईश्वर ते ब्रम्हांड ते ईश्वर हे चक्र पूर्ण करून, अंती निजधामाला प्राप्त होईल. पण मनाच्या एका कमजोरीला, नित्य बळी पडून, मोह लोभ इत्यादी भावभावनात गुरफटून जातो. नित्य चुकीच्या कर्मात गुंतत जातो, दुःखाच्या भोगांच्या प्रसंगात, प्रसंगोपात, ईश्वराला दोष देऊन, किंवा विसरून, आपल्या कर्मगतीलां सुधारण्यास ऐवजीं पुन्हा पुन्हा त्याच चरकात...

भोग आणि ईश्वर ५५५

भोग आणि ईश्वर  ५५५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)   या नवीन features ना सामावून घेण्यासाठी प्राण्यां मध्ये असलेल्या बऱ्याच मर्यादा, मानव निर्मिती करताना, काढून टाकाव्या लागल्या. याचं एक महत्वाचं वैज्ञानिक सत्य किंवा कारण हे आहे की,  जितके सेन्सर्स आणि controls जास्तं तितकं मशीनचं स्केल आणि साइज् कमी करावं लागतं. तंत्रज्ञ मंडळींना याचं अर्थ किंवा हे तत्व लक्षात येईल. याचं तत्वाने जेवढं स्केलं साइझ हे फॅक्टरस वाढवावे लागतात तेवढे कंट्रोल व सेन्सर्स कमी करावे लागतात.  याचं principle नुसार देवाने मानव निर्मिती करताना, प्राण्यांमधील काही नियंत्रण व सेन्सर्स शिथिल केले  किंवा काढून टाकले. त्यातील एक म्हणजे मन निर्मिती करताना, भावनांना पूर्ण क्षमतेने व्यक्त करता यावं, या साठी देहाची, देहिक कर्मांची बंधनांची सारी नियंत्रण काढून टाकली. जेणेकरून, मनाचं पूर्ण स्वातंत्र्य, अमर्याद आनंद, उन्मुक्त जीवनाची शैली आणि भावनांची व्यक्तता विनासायास भोगता व उपभोगता यावी. त्याचप्रमाणे, मनातील भाव पूर्ण व्यक्त होऊन, बुद्धी व देह हे त्या भावा नुसार कार्य करून, एकतानाता राहील, याची पूर...

भोग आणि ईश्वर ५५४

भोग आणि ईश्वर  ५५४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  भगवंत हा कृपावंत म्हणून आपण म्हणतो, त्यावेळी त्याचा वास्तविक स्वरूप कार्य जाणण्याचा प्रयत्न करूया. मुळात ईश्वर हा खूप मोठा शास्त्रज्ञ आहे. कारण या ब्रम्हांडातील निर्मिलेली आणि आतापर्यंत मानवाला ज्ञात झालेली सर्व भौतिक, रासायनिक, जीवशास्त्रीय, गणिती, खगोलीय, भौगोलिक, भूमितीय, अध्यात्मिक, आदी सर्व गोष्टी या, एका विशिष्ट शास्त्रीय सत्त्यावर आधारित आहेत.  मानवाने संशोधित केलेलं किंवा जाणलेलं सर्व ज्ञान, हे कारण आणि तत्वावर आधारलेलं आहे. विनातत्व वा विनाकारण काहीच अस्तित्वात नाही. असा हा शास्त्रज्ञ भगवंत किती, प्रयोगशील आहे, हे जाणल्यावर, त्याच्या बद्दलच्या आपल्या प्रेमात नक्कीच वाढ होईल. विचार करा. प्रत्येक प्राण्यात, स्वतःपासून अनेक नवीन जीव निर्माण करण्याचं तंत्र प्रजोत्पादन रुपात देऊन ठेवलं. पण प्रत्येकाला त्याचा वेगवेगळं तंत्र दिलं.  म्हणजे वनस्पींपासून नवीन जीव निर्माण होताना, पराग कण, पुकेसर, स्त्रीकेसर या तंत्राची व्यवस्था, त्यासाठी पक्षी, भुंगे, माश्या कीटक इत्यादी माध्यमातून परागी भवन या प्रक्रियेने, ही पुनर्निर्मि...

भोग आणि ईश्वर ५५३

भोग आणि ईश्वर  ५५३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    भगवंत हे फक्त रथी महारथी यांच्यावरच कृपा करून, त्यांचं क्षेम पाहतात, असा मात्र, कालच्या उदाहरणातून अर्थ कोणीही काढू नये. भगवंत अगदी अमिबा सारख्या सूक्ष्म जीवा पासून ते महाकाय प्राण्यांचाच नव्हे तर अगदी निर्जीव वस्तूंचा सुद्धा तितकाच विचार करतात. पण आपणच आपल्या कर्मांनी त्यांना कृपावंत या ब्रीदाला जागण्याची संधी देतो किंवा आपणच आपल्या पासून त्यांना दूर लोटतो.  कृपा करणं हे सर्वस्वी आपल्याच कर्मावर अवलंबून आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे भगवंत कधीही कोणालाही, बदल्यात काही घेतल्या शिवाय देत नाहीत.भगवंताइतकं उत्तम व्यवहारी त्रिखंडात कोणी नाही. द्रौपदी कडून आधी आपल्या बोटाला वस्त्र बांधून घेतलं आणि मगच त्याबदल्यात, तिचा रक्षण केलं. भगवंताला सर्वात प्रिय काय असेल तर, भक्तांच्या ऋणात राहून, ते ऋण फेडण्यासाठी, सर्वकाही करणं.  भक्तांकडून भक्तीच बीज घेऊन त्याबदल्यात, भक्ताला उदंड आणि अमाप देणं. कृपासिंधु हे नामाभिधान भगवंताला याचसाठी प्राप्त झालं आहे. कृपेचा, करुणेचा, दयेचा, मायेचा आणि स्नेहाचा सागर, भगवंताला उगाच म्हटलं जा...

भोग आणि ईश्वर ५५२

भोग आणि ईश्वर  ५५२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कृपा म्हणजे एखाद्याने आपल्यावर केलेले असे काही उपकार, ज्यामुळे आपला एखादं कार्य सुलभ होतं किंवा एखादं बिघडलेलं काम सफल होऊ शकतं. अशी मदत, सहाय्य हे कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. जे आपल्या कल्पनेच्या बाहेरचं असतं. पण ते आपल्या कार्यात आलेली बाधा, अडचणी अडथळे दूर करून, आपल्या कार्याला आपल्याकडून करून घ्यायला सहाय्यभूत होतं.  म्हणजे एखाद्या बिकट आर्थिक संकटात वा समस्येत एखादी अनोळखी व्यक्ती अश्या प्रकारची छोटीशी वा थोडीशी मदत किंवा अगदी एखाद्या योग्य व्यक्तीची ओळख करून देते, जी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपलं काम होत वा होऊ शकतं.  आता यावर आपण असा विचार करू की, सर्व कर्मा धिष्टित असताना, घडणाऱ्या सर्वच गोष्टी, या कर्मफळाचं द्योतक किंवा परिणती नाही का. मग यात उपकार किंवा कृपा हा भाग आला कुठून. याबद्दल  दृष्टांतादाखल एक कथा पाहूया. पितामह भीष्म यांनी शभर जन्मापूर्वी केलेल्या एका छोट्या अपराधाची वास्तविक त्यावेळी चूक वाटलेल्या साध्या गोष्टीची शिक्षा बाकी होती. म्हणजे कर्म घडलं होतं. पण त्याचा फल बाकी होतं....

भोग आणि ईश्वर ५५२

भोग आणि ईश्वर  ५५२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कृपा म्हणजे एखाद्याने आपल्यावर केलेले असे काही उपकार, ज्यामुळे आपला एखादं कार्य सुलभ होतं किंवा एखादं बिघडलेलं काम सफल होऊ शकतं. अशी मदत, सहाय्य हे कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. जे आपल्या कल्पनेच्या बाहेरचं असतं. पण ते आपल्या कार्यात आलेली बाधा, अडचणी अडथळे दूर करून, आपल्या कार्याला आपल्याकडून करून घ्यायला सहाय्यभूत होतं.  म्हणजे एखाद्या बिकट आर्थिक संकटात वा समस्येत एखादी अनोळखी व्यक्ती अश्या प्रकारची छोटीशी वा थोडीशी मदत किंवा अगदी एखाद्या योग्य व्यक्तीची ओळख करून देते, जी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपलं काम होत वा होऊ शकतं.  आता यावर आपण असा विचार करू की, सर्व कर्मा धिष्टित असताना, घडणाऱ्या सर्वच गोष्टी, या कर्मफळाचं द्योतक किंवा परिणती नाही का. मग यात उपकार किंवा कृपा हा भाग आला कुठून. याबद्दल  दृष्टांतादाखल एक कथा पाहूया. पितामह भीष्म यांनी शभर जन्मापूर्वी केलेल्या एका छोट्या अपराधाची वास्तविक त्यावेळी चूक वाटलेल्या साध्या गोष्टीची शिक्षा बाकी होती. म्हणजे कर्म घडलं होतं. पण त्याचा फल बाकी होतं....

भोग आणि ईश्वर ५५१

भोग आणि ईश्वर  ५५१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आपण अनेकदा योगायोग या संज्ञेखाली अनेक गोष्टी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. कदाचित आपल्या स्वतःच्या आयुष्यात त्या अनुभवल्या सुद्धा असतील. ज्यामुळे आपलं एखादं न होणारं काम होतं. किंवा ध्यानीमनी नसताना  एखाद्या व्यक्तीची अचानक भेट होऊन, अडलेलं वा अडकलेलं एखादं जुनं काम, चुटकीसरशी होऊन, आपण स्वतः आश्चर्यचकित होतो. कारण ते होईल असं कधी वाटलेलं नसतं.  त्यामुळे, ते झाल्यावर, सर्वात प्रथम हा विचार मनात येतो की, जर हे इतकं सहज आणि सोप्पं होतं तर, मग इतके दिवस का अडलं आणि इतके दिवस असलेलं होतं तर इतक्या सहज.झालं कसं. याच्या उत्तराचे दोन भाग होतील. एक म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तिच्या निहित अर्थात योजलेल्या वेळीच होते. दुसरं, ही निहित वेळ आपली पूर्वकर्म आणि ईश्वरी वा सद्गुरू कृपा यांच्या सहाय्याने शक्य झालं.  मग योग म्हणजे ते कर्म घडण्याची वेळ जर असेल तर, अशी कृपा होऊन, योग्य व्यक्ती भेटून, तिच्या माध्यमातून आपला कार्य यशस्वी होणं. यात एका गोष्टीची सहाय्यता आपल्याला प्रत्येक कर्मात गरजेची असते. ती म्हणजे पूर्वकर्मातील एखादी...

भोग आणि ईश्वर ५५०

भोग आणि ईश्वर  ५५० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)        अनेक्षितपणे काही गोष्टी वा घटना आपल्या आयुष्यात आपल्या प्रत्यक्ष प्रयत्नाशिवाय घडून येतात. ज्यामध्ये आपल्या स्मरणा प्रमाणे आपण खास काही केलेलं नसतं. पण कर्मधर्म संयोगाने, काही असं घडतं की आपला काम होण्यासाठी त्या गोष्टीची खूप मदत होते. म्हणजे आपण एखाद्या संकटात किंवा समस्येत किंवा एखाद्या गहन प्रश्नात अडकलेले असतो. त्यावेळी आपल्या प्रत्यक्ष प्रयत्ना शिवाय एखाद्या व्यक्तीची भेट होते आणि  आपला कार्य सफल व्हायला त्या व्यक्तीच्या क्षणिक भेटीची सुद्धा खूप मदत होते. मी स्वतः अनेक समस्येतून किंवा कठीण काळातून जाताना, अश्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे. अगदी नोकरी संबंधी समस्येत असताना, अचानक एखादी व्यक्ती लोकल ट्रेन मधे भेटून, एखादा ओळखीचा फोन नंबर देऊन, माझं काम झाल्याचा अनुभव मी एकदा नव्हे तर एकापेक्षा जास्त वेळा अनुभवला आहे.  नोकरी ही एक उदाहरणार्थ मांडलेली घटना आहे. पण असे कित्येक अनुभव किंवा अनुभूती ज्याला आपण म्हणू शकतो, त्याचा अनुभव आणि लाभ आपल्यापैकी अनेकांनी घेतले असतील. अगदी  जवळची एखादी व्यक्त...

भोग आणि ईश्वर ५४९

भोग आणि ईश्वर  ५४९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       सर्वसामान्य जनांना आपल्या कर्माच्या आलेखातून, आपल्या ललाटी असलेली, जन्म मृत्यू रूपातील पुनरावृत्तीस्वरूप आयुष्य जगत जगत मागील पानावरून पुढे सुरू, असं प्रारब्ध भोगायचं की, यातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या वाटेवर वाटचाल करायची.  पण मुळात ही जाणीवच नसेल की, मी बद्ध आहे आणि मला मुक्त व्हायचं आहे, तर ही जाणीव आधी उत्पन्न होणं महत्वाचं आहे. त्यासाठी जीवाला जाग आणणं हे सर्वात पहिलं काम आहे.  यासाठी दयासागर. ईश्वराने अनेक गोष्टी अंमलात आणल्या आहेत. संत महंत, भगवत भक्त इत्यादी मार्गांनी ईश्वर आपल्या कनवाळू पणाची साक्ष देत असतो. हे संत महंत, ऋषीमुनी, साधू सन्यासी, नवविधा भक्तीच्या मार्गातून, भजन कीर्तन, प्रवचन, संबोधन इत्यादी अनेक मार्गांनी, सर्वसामान्य माणसाला हे समजावून सांगण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. त्यातून काहीजणांना समजतं, जाणवतं, ज्ञान प्राप्त होतं. त्यातील काही जण यावर जाण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी होणं न होणं, हे सर्वस्वी इश्वराधीन आहे. कारण जो पर्यंत आपलं प्रत्येक कर्म हे त्या ईश्वराला. समर्पित होण...

भोग आणि ईश्वर ५४८

भोग आणि ईश्वर  ५४८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       कालच्या लेखातील शेवटच्या भागातील विचाराचा सखोल अभ्यास करूया. मुळात आपल्या आयुष्यात जात असलेला प्रत्येक क्षण हा आपण कर्माच्या लेखणीने आपल्या आयुष्याच्या ललाट पटलावर लिहिलेला असतो. तो क्षण त्यानुसारच जाणार. आपण त्याबाबत फक्त आणि फक्त एक प्रेक्षक म्हणून त्या जाणाऱ्या क्षणाकडे पाहिलं तर त्यातून घडू पाहणारा, अतिरिक्त कर्माचा आलेख तरी नक्कीच थांबू शकेल. निदान तसा प्रयत्न आपण नक्कीच करून पाहू शकतो.  यामधे, मागे म्हंटल्याप्रमाणे, आपण प्रतिक्रियेच्या जाळ्यात अडकणार नाही. अश्या प्रत्येक क्षणातील प्रत्येक कर्मफलाचा आलेख आपण उतरता ठेवण्याचा प्रयत्न करून बघू शकतो. आता अश्या प्रत्येक प्रयत्नात आपलं मन आपण नियंत्रणात ठेवलं किंवा त्यावर थाप मारणारे, कर्मफलाच्या लहरी, निष्प्राण होतील. म्हणजे त्या अनिष्ट असतील तर, नक्कीच उलट परिणाम न करता नष्ट होतील. त्याचप्रमाणें, त्या जर, सकारात्मक असतील तर आजूबाजूची नकारात्मकता कमी होईल. पण यासाठी आपण करत असलेलं चिंतन, साधन हे सकस, शुद्ध व सात्विकता निर्माण करणारं असावं. पण क्षण क्षण घड...

भोग आणि ईश्वर ५४७

भोग आणि ईश्वर  ५४७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)       आपलं जीवन हे कर्मफलाची साखळी आहे आणि मागील कर्मांची फळं भोगण्याचा काळ. त्यामुळे यात वाटेवर कधी काटे तर कधी फुलं येणार. सर्वसामान्य गृहस्थ फुलांनी सुखावतो आणि काट्यांनी घायाळ होतो. पण या दोन्ही अवस्थेत वा स्थितीत जो आपली मनःशांती ढळू देत नाही आणि समोर येईल ते मनःपूर्वक स्वीकारतो, तो या जीवनातील आपली लढाई उत्तम रीतीने खेळला असं नक्कीच म्हणता येईल. पण ही अशी मनःस्थिती लाभायला नक्कीच कर्माची दोरी बळकट असावी लागते.  पण घटना घडत असताना आणि मनाचा तोल जात असताना, आपल्याला सावरण्यासाठी लागणारा आधार म्हणजे आपल्या वरील सद्गुरू किंवा ईश्वरी कृपा. पण ही कृपा लाभायाला सुद्धा आपल्या गाठीशी काही पुण्याची जमापूंजी असावीच लागते. याचसाठी आपण काही गोष्टी नित्य कर्माचाच भाग म्हणून करायला हव्यात. कारण आज जी कर्म करू किंवा करत आहोत, ते भविष्यात आपल्याच कर्माच्या जमेचा भाग होऊन, आपल्याच पुढे येणार, हा सृष्टिकर्त्याचा नियम आहे, हे सर्व ज्ञात आहेच.  म्हणून अशी कृपा वा करुणेचा लाभ, काही विशिष्ट लोकांना अनेक स्वरूपात प्राप्त हो...