Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

भोग आणि ईश्वर ३३६

भोग आणि ईश्वर  ३३६  वैज्ञानिक पातळीवर माणूस जसजसा प्रगती करत जाईल, तसतसं या ज्ञानाचं महत्व आणि सनातन संस्कृतीत मांडलेल्या शास्त्रीय व वैज्ञानिक गोष्टी किंवा त्याकाळीसुद्धा वापरात असलेल्या अस्त्र, शस्त्र, ज्ञान व विज्ञान यांची  एकत्रित घातलेली सांगड, कर्म, ज्ञान व भक्ती या माध्यमातून ईश्वरी शक्तीपर्यंत पोचण्याच्या साधनांचं व मार्गाचं या भूमीत असलेलं सखोल ज्ञान, नुसतं ज्ञानच नाही तर ते ज्ञान प्रत्यक्षात सिद्ध केलेल्या अनेक विभूती,  सद्गुरू परंपरेने, हे ज्ञान, युगानुयुगे प्रसारित व प्रवाहित ठेवण्यासाठीची तळमळ व व्यवस्था, त्या व्यवस्थेतील प्रत्येक आत्मा यांचं योगदान हे सर्व बहुमूल्य या भूमीने जपलं याची महती ही वैज्ञानिक प्रगती जशी होत जाईल, तसं अधोरेखित होत जाईल. तरीही या वैज्ञानिक प्रगती नंतरसुद्धा सनातन धर्म, संस्कृती व त्यातील मूल्यांचं महत्व जास्त प्रकर्षाने लक्षात येईल. कारण ऋषीमुनी, गुरुशिष्य परंपरा या माध्यमातून हे ज्ञान विशेषतः या ज्ञानाचं पावित्र्य, सात्विकता जपून व तमोगुणी होण्या पासून व तमाकडे जाण्यापासून, ज्या प्रकारे जपलं गेलं, ते अलौकिक आहे.  कारण सुर ...

भोग आणि ईश्वर ३३५

भोग आणि ईश्वर  ३३५  संपूर्ण विश्वाच्या, ज्ञान व विज्ञान यांची विस्तृत माहिती, आपण कालच्या भागात घेतली. त्यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की, लहरी व तरंग यावर आधारित सर्व व्यवस्था तयार करून, त्यातूनच या विश्वाचं सूत्र संचालन, विश्वाची नियंत्रकशक्ती या विश्वातील अणूरेणूंवर नियंत्रण ठेवून, त्याचा क्षणाक्षणांचा डेटा अर्थात तपशील वार माहिती जमा करून, त्याचा सर्व हिशोब ठेवते.  हा सर्व हिशोब कर्माच्या माध्यमातून, सुत्रबद्धतेने टिपून घेतला जातो. त्याचा व्यक्तिगत पातळीवर ताळेबंद मांडला जातो. प्रत्येक पुढील जन्मांसाठी तो हिशोब, संचिताच्या माध्यमातून  प्रवाही राहून, त्यात भर किंवा घट प्रत्येक क्षणक्षण होत असते आणि ती नोंदली जाते. पण ही सर्व माहिती इतक्या सूत्रबद्ध रीतीने मिळवून,  नोंदवून ठेवली जाते व प्रत्येक देहाच्या आत स्थित आत्म्याच्या प्रवासात ती अगदी योग्य पद्धतीने उपयोगात आणली जाते.  त्यासाठी कर्मफल साखळी आणि त्याची समिकरणात्मक रचना विधाता करू शकतो, त्याअर्थी विधाता हा खूप मोठा वैज्ञानिक आहे, ज्याने, या विश्वाची, अशी काही रचना  केली आहे की, या सर्वांतून ज...

भोग आणि ईश्वर ३३४

भोग आणि ईश्वर  ३३४  या विश्वाची चैतन्यशक्ती ही खरतर एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक, दोन्ही दृष्टीने सत्य आहे. अध्यात्मिक या दृष्टीने की, आत्मा या चिरंतन अस्तित्व असलेल्या,अंशाला आपल्यामधून या जगतात धाडून,त्याद्वारे या विश्वाचा पसारा,खेळ चालवून आपल्या संकल्पनेतील व श्वासा तील साकारलेले विश्व, सतत चैतन्यमय ठेवून, कर्म, संचित व कर्म अश्या साखळीत त्या विश्वाला व विश्वातील अनुरेणूंना बांधून ठेवलं आहे. त्याद्वारे जगतातील आपल्या अस्तित्वाची निरंतर आठवण, प्रत्येक जीवाला, विशेषतः मानवाला रहावी, याची व्यवस्था केली.  त्यातही माया, मोह, लोभ, काम, क्रोध, मत्सर इत्यादी व्यवधानं निर्माण करून, जीवाला जगण्याची प्रेरणा व आत्मचिंतानाची व्यवस्था केली आहे. खरतर जशी परीक्षेच्या माध्यमातून विद्या संपादन व वृद्धी केली जाते आणि त्यायोगे प्रगती साधली जाते. त्याचप्रमाणे या षड्रिपूंच्या माध्यमातून, प्रत्येक मानवी जीवाला आत्मोन्नत्ती करण्याची सूत्रबद्ध योजना, तयार करून दिली आणि त्यातून प्रत्येक मानवी आत्म्याची, या देहातून गती, प्रगती व उन्नती साधून, अंतिम मोक्षाची वाट मिळावी, याची काळजी घेतली आहे. बर हे...

भोग आणि ईश्वर ३३३

भोग आणि ईश्वर  ३३३  आपल्या आयुष्यात आपल्या मनःस्थितीत बदल किंवा बरेचवेळा आमूलाग्र बदल व्हायला, एखादी, घटना, परिस्थिती, दुर्भाग्य किंवा सौभाग्य, एखादी प्रचंड लाभ किंवा प्रचंड हानी, इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी कारणीभूत होतात. म्हणजेच ज्यावेळी मनाला एखादा झटका अर्थात शॉक बसतो, त्यावेळी त्या धक्क्यातून मनातील सर्व शक्तिकेंद्रे व बलस्थानं यांना धक्का लागतो, किंवा दिला  जातो.  बरेचवेळा असे प्रसंग हे आत्मपरिक्षा पाहण्यासाठी असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक साधक, ऋषीमुनी, भक्त, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, चिकित्सक, चिंतक आहेत, जे अपघाताने त्या त्या क्षेत्रात आले आणि त्या योगे त्यांनी महान कार्य घडवलं. म्हणजेच विधात्याची, त्यांना त्या क्षेत्रात, कार्य घडवून आणण्याची इच्छा असावी. यात दुसरी बाजू म्हणजे, त्यांचा मागील संचिताचा व प्रारब्धाचा आलेख वा लेखाजोखा तसा असावा की, असं अलौकिक कार्य, त्यांच्याच हातून घडावं.  या सर्वांमागची प्रेरणा, त्यांच्या आतील आत्मशक्तीत वसलेली, विश्वाप्रेरणा व विश्वनाथाची शक्ती, हीच असणार, असं म्हटलं जातं की, या भूतलावरील म्हणजेच या पृथ्वीवरील सर्व...

भोग आणि ईश्वर ३३२

भोग आणि ईश्वर  ३३२ मनाचा थकवा घालवण्यासाठी आपण काल एक प्रयोग पाहिला. याचा अभ्यास केल्यास हे जाणवेल की मनाला, विशेषतः चंचल मनाला, शांत करण्यापेक्षा, हा उपाय जास्त श्रेयस्कर वाटतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे, मन हे सतत विचार करत असल्याने, विचारातील बदल हे मनासाठी, एक उत्तम शक्ति वर्धक खाद्य आणि उपचार, असं दोन्ही आहे.  हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला जाणवेल की, मन हे शांत बसवून वा स्थिर ठेवून, विश्रांती साधण्यापेक्षा विचारात, सकारात्मकता आणि सशक्तपणा आणून, एखादा उपयुक्त विचार करून, काही काळासाठी मनाला रोजच्या त्रासदायक विचारातून बाहेर काढता येतं. फक्त यामध्ये एकच काळजी घ्यायची की, असा केला जाणारा विचार हा सकारात्मक व सुदृढ असावा.  म्हणजेच त्याद्वारे एखादा चुकीचा विचार केल्यास, होणारी हानी मूळ थकवा वा नैराश्य, यापेक्षा जास्त घातक असता कामा नये.  म्हणूनच असा जाणीवपूर्वक एखादा चांगला विचार मनात धरून, मनाला त्यात गुंतवून, नैराश्य वा थकवा घालवण्यासाठी केलेला प्रयत्न, नक्कीच यशस्वी होतो. म्हणूनच यासाठी गत आयुष्यातील सुखाचा किंवा आल्हाददायक प्रसंग वा असा काळ, यांच्या आठवणी जाग्या...

भोग आणि ईश्वर ३३१

भोग आणि ईश्वर  ३३१  आपलं शरीर थकल्यावर आराम वा विश्रांती हे आवश्यक आहे.  त्याचप्रमाणे व्यायाम हा देहाची शक्ती,लवचिकता, ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याप्रमाणे न केल्यास, देहाची लवचिकता कमी होऊन, एका ठराविक वयानंतर ऊर्जा, उत्साह व शक्ती कमी होऊ शकते. यासाठी शरीराला आराम आणि व्यायाम दोन्ही आवश्यक आहे. आराम केल्याने, शरीराची झालेली झीज भरून निघू शकते, थकलेल्या शरीराला पुनः ऊर्जा प्राप्त होते आणि व्यायामाने ऊर्जा टिकवून लवचिकता प्राप्त होते आणि प्राप्त झालेली टिकून त्यात वाढ होते.  हे सर्व शरीराचं आहे. पण देहातील अजून एक महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू आणि एक इंद्रिय म्हणजे मन, यांना देखील पुरेसा आराम व व्यायाम आवश्यक आहे. तो तसा न मिळाल्यास वा न दिला गेल्यास, नैराश्य,नकारात्मकता आणि थकवा मनाला व मेंदूला सुद्धा जाणवतो. त्यासाठी या दोन्हीना आपण पुरेसा व्यायाम व विश्रांती दिली पाहिजे.  मुळात मनाला आणि मेंदूला एकाचवेळी विश्रांती कशी काय दिली जाते,यावर विचार करूया. यात दोन प्रकार आहेत, ज्यायोगे मनाला आणि मेंदूला आपण आवश्यक विश्रांती आणि पुरेसा व्यायाम देऊ शकतो. मनाला ...

भोग आणि ईश्वर ३३०

भोग आणि ईश्वर  ३३०  साधना, सेवा आणि गुरुआज्ञा शिरसावंद्य, या तीन त्रयीवर, गुरुकृपेची प्राप्ती होते. गुरुकृपा प्राप्ती, हा  एक अमृतयोग आहे.कारण याची प्राप्ती झाली की, माणसाला जीवनात फक्त साधनेच्या मार्गावर राहून, नित्य उपासना करून सर्व प्रकारच्या सहाय्याची प्राप्ती होते. सहज कर्मात अद्भुत प्राप्ती होते. कर्मात असलेले भोग, सुखेनैव भोगण्याचं सामर्थ्य, बल, शक्ती प्राप्त होते. भोग सवलतीने  भोगण्याची सुविधा मिळते. भोग भोगताना, त्यांचा ताप होत नाही, झाला तर त्याची जाणीव रहात नाही.  गुरुकृपा ही कधी, कोणाला, आयुष्यात कोणत्या वळणा वर प्राप्त होईल, हे फक्त आणि फक्त सद्गुरू जाणू शकतात. कृपा याची थोडक्यात व्याख्या करणं तसं कठीण आहे. पण कृपा म्हणजे एखाद्याची मर्जी संपादन केल्यानंतर, त्या व्यक्तीकडून, मिळणारी सहानुभूती वा स्नेह, प्रेम, आदर इत्यादी.  हा स्नेह वा हे प्रेम ज्या व्यक्ती कडून लाभतं, ती व्यक्ती, तुम्हाला संकटसमयी पाठीशी उभं राहून, हतोत्साहित होण्यापासून वाचवते आणि अश्या काळात आपल्यावर येणाऱ्या संकटांवर मात करण्याची, ऊर्जा, बल आणि सहाय्य करते.  सहाय्य हे को...

भोग आणि ईश्वर ३२९

भोग आणि ईश्वर  ३२९  आपण काल एक मोठं समीकरण पाहिलं की, प्रारब्ध योगाने आणि प्राप्त संचिताने, आपल्याला एखाद्या अनिष्ट कर्माच्या किंवा कर्मफलाच्या समोर नेलं जातं. त्यानंतर आपण त्यात अडकायचं की नाही हे आपण ठरवू शकतो का. तर साधनेतून प्राप्त विवेक, विचारमंथन आणि या दोन्हींच्या योगातून आलेली आत्मबलशक्ती, त्या क्षणी आपल्याला थांबवू पाहते. आपण ते ऐकायचं की नाही हे, संचितातील कर्माची शक्ती, आत्मबल, मायेचा प्रभाव हे सर्व मिळून जे तयार होईल, ते बल व ती ऊर्जा आपल्याला त्या क्षणी कार्यरत करून, निर्णयाप्रत नेते.  आता या सर्व जंजाळात वा गोंधळात आपण मतीभ्रष्ट, पथभ्रष्ट सहज होऊ शकतो. पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही का. आहे, असा मार्ग नक्कीच आहे. या सर्व क्लिष्ट, इष्ट व अनिष्ट प्रसंगात वा निर्णयाच्या क्षणी सद्गुरुकृपेची प्रचंड ऊर्जा व शक्ती आपल्याला, योग्य निर्णयाकडे नेते. सद्गुरुकृपा ही सेवा आणि साधना यातून प्राप्त होते. या जगतात सांसारिक मार्गात व पारमार्थिक मार्गावर, उन्नती,योग्यायोग्य निर्णय, आवश्यक आत्मबल प्राप्त करणे, प्राप्त केलेले टिकवून धरणे, प्राप्त करून टिकलेले, योग्य क्ष...

भोग आणि ईश्वर ३२८

भोग आणि ईश्वर  ३२८  खूप वेळा असं होतं की आपण चांगलं वागून किंवा आपण श्रद्धेने वा तळमळीने काही करूनसुद्धा उपयोग काय. किंवा संसारात आपण एकट्यानेच काही करून काही होणार का किंवा होताना दिसेलच असं नसतं. म्हणजे जोडीतील एखादा करतो आणि दुसरा त्याच्या विरुद्ध वागतो आणि परिणाम शून्यवत किंवा जैसे थे असाच होतो, असं आपल्याला वाटतं. आपण खूप वेळा उद्विग्न होतो किंवा हताश वा निराश होतो.  पण मग यावर उपाय काय किंवा सोडून देऊनच राहायचं का. याचं उत्तर म्हणजे, तेसुद्धा आपल्या आणि सदर व्यक्तीच्या कर्मातील भोगच असावेत किंवा असणार. याचं कारण म्हणजे आपण मागे अनेक लेखांपूर्वी पाहिलेला कर्मफल सिद्धांत. याशिवाय अश्या प्रकारचा कर्मभोग आपल्या नशिबी येऊ शकत नाही .  म्हणजे जोपर्यंत तो भोग नशिबी आहे, तोपर्यंत आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडणार नाही. अश्या काळात तीन कर्मफलं एकत्र कार्यरत असतात. एक सदर व्यक्तीचं, स्वतःच, एक आपलं स्वतःचं, एक joint किंवा एकत्रित भोगलं जाणारं. जे दोघांचं एकत्रित भोगलं जाणार आहे किंवा भोगलं जात आहे, तेच अनिष्ट असू शकेल. पण दोघांची व्यक्तिगत कर्मफलं जी समोर येतात, ती कदाचित...

भोग आणि ईश्वर ३२७

भोग आणि ईश्वर  ३२७  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  आपण प्रथम स्थितीत फक्त मनाला शांत करून त्याला स्थिर करण्याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आणि ध्यानामध्ये मूलभूत फरक हा आहे की, ध्यानामध्ये आपण विचाररहित, अर्थात शून्यात जाण्याचा प्रयत्न करतो. तिथे विचारांना पूर्ण थांबवून, त्यांना आत ओढून, अंतरात्म्यात डोकावून, आतील विश्व पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तिथे हळूहळू विचार स्तब्ध करत करत, शून्यवस्था प्राप्त करायची आहे.  म्हणजे आतील शांततेचा अनुभव घेऊन, त्या अनुभूती तून, निरव शांततेकडे आपण जातो. हा हळूहळू समाधी कडे जाणारा वा नेणारा असा विलक्षण सुखद अनुभव असतो. पण त्या अवस्थे कडे जाण्यासाठी व जाण्याआधी अनेक पायऱ्यांवरून जावं लागतं.  त्या अवस्थेकडे जाण्याची सध्या गरज नाही. पण आपल्याला मनातील विचारांना, दिशा द्यायची असल्यामुळे,  यातील प्रथम पायरीचा आपण विचार करत आहोत.  आपण एखादी धून, नाम वा स्वर यांच्या नादावर मनाला हळूहळू एका ठराविक विचारांवर किंवा पातळीवर घेऊन जाणार आहोत. म्हणून आपण विचारांना शांत करत, एकच विचार किंवा एकच दि...

भोग आणि ईश्वर ३२६

भोग आणि ईश्वर  ३२६  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  आपण मनाला शांत, संयमित करून, त्याद्वारे आपला स्वभाव वा स्वभावातील दोष दूर करण्याच्या प्रयत्नांचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण, पहिली स्थिती पहिली, ज्यामध्ये आपण एखादं लक्ष ठेवून, किंवा एखादी धून, नाद वा स्वर यांच्या माध्यमातून एकाग्र होण्याचा प्रयत्न करत आहोत. हा अभ्यास करताना, काल म्हटल्या प्रमाणे, हा अभ्यास, फार कमी वेळासाठी सुरू करून, हळूहळू वाढवत न्यायचा.  हे लिहिताना इतकं सहज लिहिता आलं, तरी करताना इतकं सहज जमेलच असं नाही. यात मुख्य अडचण ही मनाकडूनच निर्माण केली जाते किंवा येत जाते. कारण माणसाचं मन ही या जगतात अस्तित्वात असलेली,सर्वात चंचल अशी गोष्ट आहे. एक क्षण सुद्धा ते थाऱ्यावर रहात नाही किंवा एका जागी स्थिर राहू शकत नाही. आता ही अशक्यता, शक्य करणं, हे तुमच्या स्वतःच्या दृढ निश्चया वर अवलंबून आहे.  ज्या मनाला आपण एकाग्र करणार आहोत, त्याच मनाच्या निश्चयावर आपण, हा अभ्यास सुरू करणार आहोत. थोडं विचित्र वाटेल, विचार करायला. पण यात एक गोष्ट ध्यानात ठेवा की, या प्रक्रियेत, ...

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख ३ (कडवं ३)

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख ३ (कडवं ३)  नाथमहाराज जरी भारुड, जोगवा यामधून आसूड ओढत असले तरी, त्यांची मूळ प्रवृत्ती, समाजावर प्रेम करून, समाजाला, सर्व प्रकारच्या वाममार्गातून, सहजपणे, भक्ति मार्गी बनवण्याची आहे. म्हणूनच त्यांचं संपूर्ण वाङ्मय हे ज्ञान देऊन, जाणिवांवर घण घालून, त्या जागृत करून, समाजाला भक्तीरसाची अद्भुतता पटवून देण्यात, धन्यता मानतं. त्यामुळेच, नाथमहाराज हे, चूक काय हे सांगून थांबणारे नुसते निरर्थक टीकाकार नाहीत, तर काय करणं गरजेचं आहे, जे केल्याने, झालेल्या चूका सुधारून, आत्मा सन्मार्गावर जाईल, हे सांगणारे ऋषितुल्य व्यक्ती आहेत.  नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।  ईश्वरप्राप्तीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कर्म, ज्ञान इत्यादी अनेक. पण त्यासर्वांमध्ये, स्वतः भगवंतांनीसुद्धा, ज्या मार्गाचा विशेषत्वाने गौरव करून,ज्या मार्गाला श्रेयस्कर म्हणून उपाधी देऊन, प्रत्यक्ष श्रीमद्भागवद्गीतेत पुरस्कारित केलं आहे, तो मार्ग म्हणजे भक्तीमार्ग.  हे भगवंताचं विशेष प्रेम लाभलेलं अपत्य आहे. वेद शास्त्र पुराणं यांनी ईश्वरप्राप्तीसाठी, भक्तीच्या अनेक मार्गांना संकलित...

भोग आणि ईश्वर ३२५

भोग आणि ईश्वर  ३२५ माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  आधीच्या जन्मातून या जन्मात स्वभाव वागणूक ही मिळकत स्वरूपात, प्रारंभीची बाकी अर्थात opening balance म्हणजेच, संचित रुपात प्राप्त होते आणि जीवनाची सुरवात, त्याप्रमाणे होते. म्हणूनच आपण बघितलं असेल की एखादं मूल रडकं, चिडकं किंवा एखादं मूल शांत असतं. ही गर्भसंस्कारांची प्रचिती असेल पण तसे गर्भसंस्कार व्हावेत, हे त्या नवीन जीवाचं प्रारब्ध नक्कीच आहे.  पण हे जन्मतः प्राप्त संचित, असंच जन्मोजन्मी पुढे न्यायचं का. तर नक्कीच आवश्यकता नाही. यातून बाहेर पडण्यासाठी, तितकीच ऊर्जा व बळ जरुरी आहे हे मात्र नक्की. ज्यायोगे आपण प्रारब्धातून प्राप्त स्वभाव व मनाची जडणघडण बदलून, शांत, शीतल, निर्मळ मनाची प्राप्ती करून, पुढील आयुष्य सुखद करू शकतो. कुठलीही  नवीन वा प्रवाहाविरुद्ध, एखादी गोष्ट करताना वा करायला सुरुवात करताना, त्यात पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि संयम हे ओतून, पुढे जावं लागेल.  सर्वात प्रथम मनात हा दृढनिश्चय करणं गरजेचं आहे की, मला माझा स्वभाव व वागणूक ही, शांत व संयमी करायची आहे आणि विवे...

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख २ (कडवं २)

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख २ (कडवं २)  आईचा जोगवा जोगवा मागेन ।  आपल्या आत्म्याच्या उत्पत्तीला कारण असलेली, शक्तीचं प्रतीक आणि जगताच्या चैतन्याचं मूळ असलेली, आई अंबा, भवानी, योगेश्वरी हिच्या प्रकट होण्याचं, जगताच्या कार्यकारण भावाचं निरूपण, पहिल्या कडव्यात करून झाल्यावर, नाथ आईच्या चरणी, आपलं प्रार्थनारूप वंदन करून झाल्यावर, आईकडे भक्तीरुप, ज्ञानरुप, वैराग्यरूप नामरूप भिक्षा अर्थात जोगवा मागतात.  वास्तविक अर्थाने, जोगवा मागणे म्हणजे जगताच्या कल्याणा साठी, जगन्मातेकडे, सर्वत्यागून, लीन होत, भक्तीची, वैराग्याची कामना प्रकट करणं. ही रूढार्थाने जोगवा या शब्दाची खरी वास्तविकता आहे. नन्तर त्यातून, जगत म्हणजेच देवीचं प्रत्यक्ष प्रकट रूप कल्पून, भिक्षा या शब्दाशी त्याची जोड, जोडून, त्याला अप्रत्यक्ष पणे चरितार्थासाठी वा उदरनिर्वाहासाठी केली जाणारी क्रिया, असा अर्थ, नन्तर अभिप्रेत होऊ लागला. जोगवा म्हणजे नित्य समाधिस्थ असलेल्या,जगतजननीला तिच्या समाधीतून कल्याणार्थ केलेली प्रार्थनारूप आवाहन आईला सांगणं जागं व्हा आई जागं व्हा, जगाला उपकृत करा, जगताचं कल्याण करा.  पण म...

भोग आणि ईश्वर ३२४

भोग आणि ईश्वर  ३२४  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  आपण काल पाहिलं की, आधीच्या जन्मात, ज्या स्थितीत आयुष्यभर, एखादी इच्छा वा अनेक इच्छांचा समूह, मनात ठेवून,आपण या जन्मात पुढे आलो, त्या इच्छा वा वासना, या balance sheet प्रमाणे,मनोमय कोषातून पुढे ओढल्या जातात. त्यामुळे, जी मती आणि मनःस्थिती अंत समयी राहील, तीच पुढील जन्मांच्या प्रेरणेचा वा स्वभाव व वागणूक, यांचा भाग असेल.  म्हणजेच मती,जी देहामुळे वा देहातील मेंदू या घटकामुळे त्या जन्मात, विचार, आचार यातून कर्म करत गेली किंवा विचारांचं गाठोडं जपत गेली, ती, त्या देहाचा भाग असलेली बुद्धी, या देहातील मनःस्थितीला कारणीभूत ठरते. अर्थातच देह या जन्मीचा स्वतंत्र असूनही, त्यातील, बुद्धी, मन व या दोन्हीनी केला जाणारा विचार आणि त्या विचारांच्या प्रेरणेतून, या जन्मी केलं जाणारं, आचार, विचार व उच्चार यांचं प्रत्येक कर्म, प्रत्यक्षात मनःस्थितीचा दुवा हा आधीच्या जन्मातून पुढे या जन्मात प्राप्त झालेला असल्यामुळे, आधीच्या जन्मातील योग्य वा अयोग्य, चूक वा बरोबर, यामुळे, या जन्मात, फक्त घडत जातं. ...

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख २ (कडवं २)

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख २ (कडवं २)  आईचा जोगवा जोगवा मागेन ।  आपल्या आत्म्याच्या उत्पत्तीला कारण असलेली, शक्तीचं प्रतीक आणि जगताच्या चैतन्याचं मूळ असलेली, आई अंबा, भवानी, योगेश्वरी हिच्या प्रकट होण्याचं, जगताच्या कार्यकारण भावाचं निरूपण, पहिल्या कडव्यात करून झाल्यावर, नाथ आईच्या चरणी, आपलं प्रार्थनारूप वंदन करून झाल्यावर, आईकडे भक्तीरुप, ज्ञानरुप, वैराग्यरूप नामरूप भिक्षा अर्थात जोगवा मागतात.  वास्तविक अर्थाने, जोगवा मागणे म्हणजे जगताच्या कल्याणा साठी, जगन्मातेकडे, सर्वत्यागून, लीन होत, भक्तीची, वैराग्याची कामना प्रकट करणं. ही रूढार्थाने जोगवा या शब्दाची खरी वास्तविकता आहे. नन्तर त्यातून, जगत म्हणजेच देवीचं प्रत्यक्ष प्रकट रूप कल्पून, भिक्षा या शब्दाशी त्याची जोड, जोडून, त्याला अप्रत्यक्ष पणे चरितार्थासाठी वा उदरनिर्वाहासाठी केली जाणारी क्रिया, असा अर्थ, नन्तर अभिप्रेत होऊ लागला. जोगवा म्हणजे नित्य समाधिस्थ असलेल्या,जगतजननीला तिच्या समाधीतून कल्याणार्थ केलेली प्रार्थनारूप आवाहन आईला सांगणं जागं व्हा आई जागं व्हा, जगाला उपकृत करा, जगताचं कल्याण करा.  पण म...

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख १

नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख १  नाथमहाराज अर्थात परमपूज्य संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज यांनी, भक्तीच्या माध्यमातून, समाजातील, भक्तीच्या मार्गातील, भक्तांच्या कर्मकांडातील विरोधभासावर वा चुकीच्या परंपरांवर आणि कर्मठ पणावर आसूड ओढून, समाजाला जागं करण्याचा कायम प्रयत्न केला. असेच त्यांचे अनेक अभंग, आरत्या, भारुडे यांची रचना, याच गोष्टीसाठी नाथांनी केली. नाथांना आद्य समाजसुधारक म्हटलं तरी ते योग्यच ठरेल. देवीच्या प्रस्तुत आरतीमध्ये नाथ भक्ती मधून, दांभिकता व कर्मठता यावर येथेच्छ आसूड ओढून, त्यातील त्रुटी व त्यावरील उपाय दोन्हींवर प्रकाश टाकून, एकप्रकारे समाजाच्या व भक्त भाविक यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घालतात. हाच गूढ, गुह्यर्थ व मतितार्थ जाणूया, प्रत्येक कडव्यातून.  अनादि निर्गुण प्रगटली भवानी ।  जी कधी अस्तित्वात आली आणि जीचा अंत माहीत नाही अशी महाशक्ती निर्गुणातून सगुणात प्रकट झाली. नाथांच्या या वाक्यातून, विश्वाच्या उत्पत्तीच्या, ज्या स्फोटाच्या रहस्यासाठी विश्वातील शास्त्रज्ञानी एक महाविस्फोट घडवून आणला आणि त्या स्फोटाच्या निष्कर्षात देवकणाचं आतित्व विज्ञानाला स...

भोग आणि ईश्वर ३२३

भोग आणि ईश्वर  ३२३  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  कालचाच विषय पुढे नेऊया. या जन्मातील स्वभाव वैशिष्ट्ये, वागणुकीतील काही विशिष्ट बाबी, या जर जन्मतः असतील, तर त्यांचा संबंध आधीच्या जन्मांशी असू शकतो. आधीच्या जन्मात (एकाच नव्हे तर मागील अनेक जन्मात) जर काही गोष्टी इच्छे नुसार प्राप्त नसतील झाल्या, तर मनात, विशेषतः सुप्तमनात दडून बसलेल्या, या अतृप्त इच्छा, आत्मा मनोमय कोषासह, पुढे घेऊन जातो. त्यानंतर, पुढील जन्मात तो मूळ स्वभावाचा भाग होतो. यालाच आपण म्हणतो की, स्वभावाला औषध नसतं.  पण या, आधीच्या जन्मांतील गोष्टी वा इच्छा, या जन्मात तृप्त झाल्या, असं समजलो, तरीही, जर तो मूळ स्वभाव झाला असेल, किंवा मूळ व्यक्तिमत्त्वाचा भाग असेल, तर त्या तृप्त होणाऱ्या, इच्छांमध्ये, या जन्मीच्या मायावश व उपभोगवश किंवा भोगवश येत जाणाऱ्या वा आलेल्या आणि अतृप्त राहिलेल्या, इच्छा, वासना इत्यादी , मिसळत जातात आणि सरतेशेवटी जर गोळाबेरीज केली, तर पुन्हा मागील जन्मांच्या स्थितीला आत्मा पोचलेला असतो.  पण या जन्मात त्यामध्ये, अतृप्त इच्छा व वासना यांची भर ...

भोग आणि ईश्वर ३२४

भोग आणि ईश्वर  ३२४  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  आपण काल पाहिलं की, आधीच्या जन्मात, ज्या स्थितीत आयुष्यभर, एखादी इच्छा वा अनेक इच्छांचा समूह, मनात ठेवून,आपण या जन्मात पुढे आलो, त्या इच्छा वा वासना, या balance sheet प्रमाणे,मनोमय कोषातून पुढे ओढल्या जातात. त्यामुळे, जी मती आणि मनःस्थिती अंत समयी राहील, तीच पुढील जन्मांच्या प्रेरणेचा वा स्वभाव व वागणूक, यांचा भाग असेल.  म्हणजेच मती,जी देहामुळे वा देहातील मेंदू या घटकामुळे त्या जन्मात, विचार, आचार यातून कर्म करत गेली किंवा विचारांचं गाठोडं जपत गेली, ती, त्या देहाचा भाग असलेली बुद्धी, या देहातील मनःस्थितीला कारणीभूत ठरते. अर्थातच देह या जन्मीचा स्वतंत्र असूनही, त्यातील, बुद्धी, मन व या दोन्हीनी केला जाणारा विचार आणि त्या विचारांच्या प्रेरणेतून, या जन्मी केलं जाणारं, आचार, विचार व उच्चार यांचं प्रत्येक कर्म, प्रत्यक्षात मनःस्थितीचा दुवा हा आधीच्या जन्मातून पुढे या जन्मात प्राप्त झालेला असल्यामुळे, आधीच्या जन्मातील योग्य वा अयोग्य, चूक वा बरोबर, यामुळे, या जन्मात, फक्त घडत जातं. ...

भोग आणि ईश्वर ३२२

भोग आणि ईश्वर  ३२२  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  मनाच्या काळजी, चिंता करण्याच्या प्रवृत्तीला त्या माणसाचा स्वभाव म्हणता येईल.किंवा तो स्वभावाचा एक भाग आहे, असंही आपण म्हणू शकतो. तसं पाहिलं तर, अनेक गोष्टी या मूळ स्वभावाचा भाग आहेत किंवा असतात. काहीजण जन्मतः शांत, सोशिक, सहनशील, स्वभावाच्या असतात. काहीजण कितीही त्रास , कष्ट, भोग असले तरी, आनंदी असतात, दिसतात व वागतात. काही जण पटकन निराश होतात वा घाबरून जातात, तर काहीजण मनाच्या कोषात दडून अबोल असतात.  काहीजण कितीही सुखासीन आयुष्य मिळालं, काही त्रास वा कष्ट झाले नाहीत, तरीही सतत कटकट वा तक्रारी करतच आयुष्य जगतात. हे सर्व मानवी स्वभावाचे विविध मूळ पैलू किंवा मूळ स्वभावाचा भाग आहे. स्वभावाची, यातील काही वैशिष्ट्य ही जन्मतः असतात, तर काही परिस्थितीवश स्वभावात येतात. पण परिस्थिती वश स्वभावात दाखल झालेली वैशिष्ट्य ही परिस्थिती बदलतात, वागण्यातून निघून जातात आणि मूळ स्वभाव व वागणूक आपोआप बाहेर येते. कारण स्व म्हणजे आपण व भाव म्हणजे मनातील विचार व त्यांचं एकत्रित तयार झालेलं मिश्रण. ...

भोग आणि ईश्वर ३२१

भोग आणि ईश्वर  ३२१  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  मुळात मनामध्ये शंका , भीती, काळजी इत्यादी नकारात्मक स्थिती का उत्पन्न होतात,याचं अध्यात्मिक आणि मानसिक कारण आहे, असुरक्षितता. ही असुरक्षितता दोन कारणांनी येते. एक म्हणजे उद्याची चिंता आणि दुसरं म्हणजे मागील गोष्टींच्या जाणीवा. आता यातील, उद्याची चिंता यावर नन्तर चिंतन करूया. पण मागील गोष्टींच्या जाणीवा, म्हणजे नक्की काय, यावर जरा विचार करूया.  जाणीवा दोन प्रकारच्या असतात. एक जागृत मनातील आणि दुसऱ्या सुप्त मनातील. जागृत मनात, आपण केलेल्या चुका वा प्रमाद इत्यादी, जे ज्ञात व स्मरणात असतं, त्यातून उत्पन्न होणारी भीती किंवा काळजी असते. भीती म्हणजेसुद्धा काय, तर आपण केलेल्या चुकांची आपल्यासमोर येऊ शकणारी, फलं, जी भविष्यात येऊ शकतात, त्यावर मन आताच साशंक होतं आणि काळजी करायला लागतं.  मुळात काळजी म्हणजे काय, तर समोर काय येईल आणि कोणत्या रुपात येईल, याबाबत शाश्वती नसणं आणि अशी शाश्वती नसल्यामुळे, नकारात्मक विचार करणारं मन आधी अनिष्ट विचार करून, चिंताक्रांत होतं. याचकारणाने स्वास्थ्य ब...

भोग आणि ईश्वर ३२०

भोग आणि ईश्वर  ३२०  माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.  आवर्तनं का करावी, असा एक प्रश्न नेहमी येतो. त्याचं एक कारण आपण, दोन तीन लेखांपूर्वी बघितलं आहे की, त्या त्या शक्तीची प्राप्ती करण्याची, त्या त्या मंत्राची गणना करून, मगच ती शक्ती जागृत होत असेल. म्हणून तितकी आवर्तनं. पण तरीही आवर्तन करून पुनः पुनः त्या देवतेचं स्मरण करून खरच काही प्राप्ती होते का, असा एक प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.  यावर एक मानसिक दृष्टीने विचार करूया. मनात इच्छा उत्पन्न झाली आणि ती दृढ असेल तर, मनात उत्पन्न झालेली इच्छा, वारंवार, मनात तरंग व लहरी उत्पन्न करते. त्या लहरी वा तरंग, इच्छेच्या तीव्रतेनुसार, तेवढया शक्तीने वा ऊर्जेने तयार होऊन आपल्या लक्षावर पोचण्या साठी, सतत वा नियमितपणे उत्पन्न होतात.  म्हणजे इच्छेची दृढता वाढून, टिकण्यासाठी, ती इच्छा, मनात धरून ठेवणं महत्वाचं आहे. याच गोष्टीसाठी तो विचार सतत मनात उत्पन्न होऊन, त्याने मनात वारंवार घर्षण निर्माण करून, ऊर्जा निर्मिती करणं आवश्यक आहे. तरच मनात त्या ऊर्जेने, त्या इच्छेला शक्ती व बल मिळून, इच्छ...