भोग आणि ईश्वर २१२ भक्तिमार्गात येण्यासाठी भगवंतांनी एक सांगितलं आहे की, चित्त शुद्धी ही पहिली पायरी आहे. म्हणून नामाची सुरवात करताना, प्रथम संकल्प चित्तशुद्धी हा असावा. चित्तशुद्धीवर मागे काही भागात विस्ताराने लिहिलं आहे. त्यामुळे आता त्यावर न बोलता, मनःशांतीच्या मार्गातील दोन मुख्य शत्रू काम व क्रोध यावर बोलू. वास्तविक मनुष्याचा स्थायी स्वभाव हा जन्मतः लिहिलेला असतो, त्याच्या संचितानुसार. त्यामुळे मूळ स्वभावाची वा वृत्तीची ही मुळी जन्मतः खरतर दृढ अर्थात घट्ट असते. म्हणूनच आपण एखाद्याबद्दल बोलताना म्हणतो की, तो थोडा तुसडा आहे, तो रागीट आहे, तो शांत आहे, तो चिकित्सक आहे, इत्यादी इत्यादी. म्हणजेच माणसाला मूलतः जे प्राप्त आहे त्यानुसार त्याचं पुढील कर्म घडत जाणार. अर्थात, त्यानुसार त्याची पुढील कर्मगती ठरणार आणि पुढील कर्मफल. आधीच्या कर्माने त्याने प्राप्त भोग, उपभोग योग हे सर्व ठरवलेलं असतं. म्हणजेच रागीट असल्याने, क्रोधाने अयोग्य कृती करणं, क्रोधात संबंध तोडणं, त्यासाठी भांडणं करणं, रागाच्या भरात वाईट बोलणं इत्यादी सर्व, जे घडणाऱ्या कर्मफला बद्दल...