Skip to main content

भोग आणि ईश्वर १३१

भोग आणि ईश्वर  १३१
 
मनाचा संबंध वा साधर्म्य आकाशाशी आहे वा केलं जातं, हे आपण मागच्या बऱ्याच लेखांमध्ये पाहिलं.  परंतु ते आकाशा प्रमाणेच पृथ्वीशी नाळ जोडून आहे. पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी वर्षातील काही काळ वा काही वेळा ते झुकलेलं वा उतरलेलं आपण पाहतो. ऋतुचक्र आणि हवामान यानुसार आकाशात अनेक हालचाली होतात. त्यातील बऱ्याच आपण पाहू शकतो, पण काही ज्या आपल्या नजरेच्या टप्प्यात येत नाहीत, त्या आपल्याला दिसत नाहीत.

पण या सर्वात निरभ्रता , शांतता आणि निर्गुणत्व जे निळ्या रंगात, आकाशात दिसतं,  ते पाहून मनाला मिळणारी प्रसन्नता अवर्णनीय आहे. आपण स्वतः ह्याचा अनुभव घ्या. एखाद्या शांतवेळी आकाश निरभ्र असेल अर्थात clear sky ज्याला म्हणता येईल आणि त्यावेळी असलेल्या फिकट निळसर रंगाकडे काही क्षण बघितल्या नंतर, एका वेगळ्या शांततेचा अनुभव मनाला जाणवतो. 

या शांततेचा अनुभव आपण मनाला देण्यासाठी, अर्थात मनाला त्या भावावस्थेत घेऊन जाण्यासाठी, आकाशात होणाऱ्या बदलांसारख्या बदलांची वाट पाहण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. याचं कारण आकाश हे विचाररहित आहे आणि मानवी मन हे विचार आणि विचारांच्या लहरींनी भरलेलं आहे. त्यामुळे जसे विचार येतील वा विचारांची आंदोलनं येतील वा होतील, त्याप्रमाणे मन हेलकावे खातं आणि कधी वाहावत तर कधी गटांगळ्या खात जातं. 

कोणत्याही  विचारांचा हा प्रवाह आपण जसा येऊ देऊ, तसा तो येत जातो आणि ज्याप्रकारचा प्रश्न, चिंता, काळजी, समस्या असेल त्यानुसार त्याचा वेग असतो. मन आपोआप त्या प्रवाहात वाहात जाऊन विचारचक्रात अडकत जातं. बराच वेळ वा काळ विचार केल्यानंतर मग उत्तर येत नाही. पण तोपर्यंत मनाला या विचारांच्या व्यसनाची सवय होऊन गेलेली असते. म्हणूनच खूपवेळा असा प्रश्न, अशी चिंता वा अशी काळजी मिटल्यानंतर सुद्धा हलकं झालेलं मन उगाच पुन्हा वा निष्कारण विचार करतं. 

या सर्व भावावस्था वा आंदोलनं किंवा प्रवाह हे आकाशाला सतत बदलत ठेवणाऱ्या ऋतूंप्रमाणे आहे. पण यात माणूस म्हणून तसेच हेलकावे खाणं म्हणजे निरर्थक आहे. कारण आकाश हे देहहीन असल्यामुळे, त्याला स्वतःची विचारशक्ती वा विचारचेतना नाही किंवा स्वतःचं नियंत्रण नाही. पण मानवी मनाला ते आहे, कारण ते मन पंचमहाभूतरुप देहात आहे. त्यामुळे देहात असल्याचे जे फायदे तोटे आहेत, त्यांनी ते मन बद्ध आहे. 

तोटे कोणते तर प्रत्येक भोग वा दुःख हे भोगावंच लागतं वा ताप सहन करावाच लागतो. पण फायदा काय, तर एखाद्या नियंत्रकाच्या सहाय्याने मनाला बांधून त्याला प्रवाहपतीत होण्यापासून परावृत्त करता येतं किंवा रोखता येतं. मुळात खंबीर असलेल्या मनात असा नियंत्रक मूलतः प्रारब्धाने प्राप्त असतोच. म्हणजेच अश्या खंबीर मनाच्या व्यक्तींना त्यांच्या पूर्वकर्मातील फलस्वरुप, असा मनाचा खंबीरपणा प्राप्त झालेला असतो. पण मध्यम ते अति संवेदनशील व्यक्तींनाच अश्या नियंत्रकाची गरज असते. 

व्यसन हे त्यापैकी एक नियंत्रक म्हणून सुरवातीला येतं. शौक म्हणून व्यसन करणारे वेगळे आणि त्याकडे आधार म्हणून बघणारे वेगळे. मी जो संदर्भ देतोय तो दुसऱ्या प्रकारातील व्यक्तींचा. अश्या व्यक्तीचं मन हे कमकुवत असल्यामुळेच त्यांना या कृत्रिम नियंत्रकाच्या मदतीची गरज भासते. कदाचित ही मदत सुरवातीला एखाद्या समस्येपासून सुटण्यासाठी येते नन्तर ती मनाचा आणि देहाचा ताबा घेते.

त्यावर असलेल्या भूमीचा आधार घेऊन काही काळ मनाला समस्या सतावत नाही अथवा समस्या दूर गेली किंवा आपल्याला त्याचा विसर पडला असा आभास मनात निर्माण होतो. अर्थात, यामुळे मूळ समस्या सुटत नाही, पण इतर अनेक प्रश्न निर्माण होऊन व्यर्थ व्यथा, दुःख, समस्या मागे लागून, मन अजूनच बद्ध होऊन,  त्या वाढलेल्या परिस्थितीच्या फेऱ्यातून वा भीतीतून बाहेर येऊ इच्छित नाही. 

कारण अश्या व्यक्तींना पूर्ण माहीत असतं किंवा जाग आल्यावर अथवा नशा उतरल्यावर त्यांना स्वतःच्या व स्वतः निर्माण केलेल्या समस्यांच्या राक्षसाची भीती सतावते. पुन्हा त्यापासून वाचण्यासाठी, पुन्हा आभासी जगाची निर्मिती स्वतःपुरती करून, त्यात स्वतःला गुरफटून वा लपेटून घेणं इतकंच काम आणि विश्व त्यांना उरलेलं असतं. कदाचित मानवी मनाची ही समस्यांपासून पळण्याची वा त्यांना तोंड न देण्याची कमजोर वृत्ती, यांच्या ठायी का आली या मूळ कारणात जर जाता आलं, तरच ही समस्या मुळापासून सुटू शकते. 

बऱ्याच वेळा ही एक सहज सोप्पी पाऊलवाट वाटते आणि नन्तर तो राजमार्ग होतो. यावर उपाय म्हणजे शारीरिक कमजोरी प्रमाणे मानसिक कमजोरीसाठी काही करता येणं जास्त गरजेचं आहे. यावर उद्या पुढे विचार करूया. पण तोपर्यंत नामात रहा, गुरूआज्ञा धरून रहा आणि सतत धनभारीत राहायचा प्रयत्न करा.
   -------------------------------------------------------------

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 

गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...