Skip to main content

भोग आणि ईश्वर १४९

भोग आणि ईश्वर  १४९
 
नामात गोडी येत नाही अशी एक सर्वसामान्य तक्रार येते. खूप नेटाने करतो, पण मन लागत नाही. असंही काहीजण म्हणतात. यात खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण नामासाठी नाम घेत नाही तर मनातील इच्छेप्रमाणे वा कधीकधी अनिच्छेने नाम घेतो,असा याचा अर्थ आहे. कदाचित नाम हे येता जाता जमलं तर किंवा गरजेचं आहे,  पण मनाला समजावता न आल्यामुळे, आपण मनाचा पूर्ण सहभाग नसताना किंवा मनाचा सहभाग गृहीत धरून घेतो. इथे आतला मी डोकावतो असं माझं मत आहे.

मी यासाठी की, मुळात मन गुंतवलं तरच आत्मा यातून आनंद घेईल वा घेऊ शकेल. त्यामुळे मन पूर्ण गुंतलं नसताना वा सहभागी नसताना केलेली कोणतीही कृती निश्चित परिणाम साधणार नाही, हे तर सर्वमान्य आहेच. मग व्यावहारिक वा भौतिक जगतात हा नियम आहेच तर आध्यत्मिक बाबीत मनाच्या सहभागाशिवाय कसं सर्व साध्य होईल. अनंतापर्यंत असलेल्या या आत्म्याच्या प्रवासात देहातील सर्वात महत्वाचं इंद्रिय, जे मन आहे, ते जर पूर्णांशाने सहभागी नाही झालं, तर काहीच साध्य होणार नाही.

अर्थात मनाच्या सहकार्याशिवाय व सहभागाशिवाय केलेलं नाम हे कधीही लक्षाप्रत पोचणारच नाही. कारण स्वतः पुरुषोत्तम परमेश्वराने भगवद्गीतेत साक्ष दिली आहे की, इंद्रियांमध्ये मी मन आहे. याचा वास्तविक अर्थ आपण जाणून घेऊ. हृदयस्थ ईश्वरच मन रुपात वास करून आहे असा याचा अर्थ समजायचा का. नाही. याचा वास्तविक अर्थ असा आहे की, अध्यात्मिक मार्गातील प्रवासात जर तुमचं मन  हृदयातील आत्म्याशी तादात्म्य पावलं, तर हृदयातील ईश्वर स्वतः मनाच्या माध्यमातून, आपल्या सर्व योग क्षेम व कार्य यांचं वहन अर्थात चलनवलन पाहतो. 

म्हणजेच आपण आतील अर्थात अंतस्थ ईश्वर जाणून, त्याला पूर्ण शरण जाऊन, त्याला आपलं सर्व जीवन स्वाधीन करून, निश्चीन्त झालात आणि फक्त त्याला स्मरत गेलात तर, त्याचं ब्रीद आहे तो तुमचं सर्व हित पाहून त्यानुसार नेहमी तुमच्या सहाय्यार्थ, अर्जुनाच्या पाठी उभा राहिला तसा, उभा राहील. म्हणजे कसा तर, ज्यावेळी भोगाचा काळ असेल त्यावेळी, ते भोगण्याची शक्ती आणि त्या काळात आवश्यक तटस्थता प्रदान करेल, जेणेकरून भोगाच्या दुःखात मन गुंतणार नाही आणि साधनेवरील विश्वास व श्रद्धा दृढ राहील, मनातील साशंकता नष्ट होईल. 

मन तेंव्हाच निःशंक होईल, ज्यावेळी ते निश्चीन्त होईल. मन सहसा निश्चीन्त कधीच होत नाही. कारण नित्य त्याला काहिनाकाही चिंता, प्रश्न, काळज्या, दुःख, विरह इत्यादी सतावत असतंच. निर्विचारी व निर्विहारी मन फक्त आणि फक्त साधनेच्या काळात असतं किंवा असावं. याचं कारण मनाला या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की, नामस्मरण हे एकमेव साधन आहे, जे मनाला त्याची पूर्ण शांतता, परम आनंद आणि परम ध्येय प्राप्ती करून देऊ शकेल. 

कारण बाकी सर्व जगराहाटीतील कोणतीही गोष्ट तात्पुरता आणि फसवा आनंद देतील.कारण त्या सर्व कर्माधिष्टीत आहेत. त्यामुळे त्यांना वैश्विक नियमांचा शाप आहे. तो नियम म्हणजे अपूर्णत्व, मर्यादित आनंद पण अमर्याद दुःख, आणि अशाश्वतता. विश्व निर्मिती करतानाच हा नियम घालून देण्यात आला की, या जगतातील कोणतीही गोष्ट मग ती सजीव असुदे वा निर्जीव कधीनाकधी नष्ट होईल आणि क्षण क्षण बदलणाऱ्या काळाप्रमाणे नित्य बदलत जाईल. 

असा हा बदल हाच या विश्वाचा नियम आहे. त्यामुळे सुख, दुःख, आनंद,  हर्ष, चिंता, काळज्या इत्यादी नित्य येतील आणि आपली वेळ व कार्य झालं की आपोआप निघून जातील. फक्त त्यांचा कालावधी हा आपण आपल्या पूर्वकर्मानुसार नियोजित करून ठेवलेला असतो. म्हणून मनाला कोणत्याही गैरसमजात न ठेवता, घडत जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे वा घटनेकडे, तात्पुरती घटना वा परिणाम म्हणूनच पाहावं. 

याचा परिणाम असा होईल की, नित्य घडणाऱ्या कोणत्याही आनंदात वा दुःखात मन गुंतून न राहता, ते दुःख वा तो आनंद सारल्यानंतर, मन पुढे जाईल म्हणजेच गुंतून राहणार नाही. त्यामुळे दुःखात मनाला माहीत असेल की हे तात्पुरतं आहे आणि आनंदात मन त्या क्षणाचा आनंद घेईल, पण तो क्षण संपल्यावर पुनः पूर्वपदाला येऊन मनाचा तोल, अर्थात बॅलन्स राखला जाईल.

हा विषय अजून अपूर्ण आहे त्यामुळे उद्या चर्चा पुढे सुरू ठेवू. पण तोपर्यंत नाम घ्या, गुरुवंदन करा. 

भोग आणि ईश्वर भाग १,  या पुस्तकाची आगाऊ नोंदणी केलेल्या सर्वांची पुस्तकं उद्या रवाना होतील आणि त्यांना त्याचा तपशील उद्या किंवा परवा त्यांच्या व्हाट्सअप्पवर देण्यात येईल. 

अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...