Skip to main content

भोग आणि ईश्वर १३०

भोग आणि ईश्वर  १३०
 
आपल्या कर्माच्या वाचेच्या व  मनातील तरंग व लहरी यावर आपण मागे  चर्चा केली. आज पुन्हा त्यांचा मागोवा घेऊया.  या तरंगांचा प्रसार आसमंतात व विश्वात आणि समस्त ब्रह्मांडात होत असतो. त्यांच्या तीव्रतेनुसार त्या कार्यरत असतात आणि त्याचप्रकारच्या ब्रह्मांडातील लहरींशी त्यांचा संयोग अर्थात आकर्षण व विरुद्ध लहरींशी प्रतिकर्षण होतं. त्याच्या परिणामस्वरूप ज्या लहरी निर्माण होतात, त्या पुन्हा परावर्तित होऊन, मूळ स्थानी परत येतात. हेच आपल्या कर्माचं फलस्वरुप आपल्याला प्राप्त होणारं भाग्य वा भोग असतं. 

मागे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या तीव्रतेवर, त्यांचं आकर्षण व प्रतिकर्षण अवलंबून असतं. नकारात्मक लहरींची तीव्रता ही प्रचंड असते आणि त्या तितक्याच ताकदीने समान लहरींना आकर्षित करतात आणि विरुद्ध शक्तींच्या लहरींना प्रतिकर्षित करतात अर्थात भेदतात. म्हणूनच नकारात्मक विचार आले की तीव्र वेगात संपूर्ण मनाचा आणि वातावरणाचा ताबा घेतात. कारण त्यांची शक्ती अफाट असते. आता आसमंतातून घरात येऊ. 

जर नकारात्मक लहरी ब्रह्मांडातील लहरींना इतक्या तीव्रतेने आकर्षित करत असतील आणि हे वैज्ञानिक आहे, तर घरात त्यांचा प्रभाव किती तीव्र असेल. कारण घराचं क्षेत्रफळ हे ब्रह्मांडापेक्षा कैक पटींनी कमी असतं. या विचारांची तीव्रता काळानुसार सुद्धा कमी जास्त असते. अर्थात ब्राह्ममुहूर्ता पासून ते सूर्योदयाच्या वेळे पर्यंतची वेळ ही सकारात्मक विचार व कार्य यांसाठी सर्वात उत्तम असते. पण संध्याकाळ पासूनची वेळ ही नकारात्मक लहरी खेचण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

या वेळेत वा संध्या समयापासून ते ब्राम्हमुहूर्ताआधीचा काळ, हा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऋणभारित व वाईट परिणाम करणाऱ्या लहरींसाठी उत्तम काळ आहे. याच कारणासाठी संध्याकाळी परवचा वा रामरक्षा आणि मारुती स्तोत्र इत्यादींच्या नित्य स्तोत्र पठणासाठी सर्वोत्तम काळ आहे. कारण यामुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक व धनभारीत लहरी, सर्व प्रकारच्या ऋणभारित नकारात्मक लहरींना प्रतिकर्षित करतात अर्थात दूर सारतात. म्हणूनच संध्याकाळी वा त्यानंतर नकारात्मक व चुकीचे विचार येणार नाहीत याची विशेष दक्षता घेतली पाहिजे. 

अश्या सकारात्मक लहरी निर्माण करणाऱ्या स्तोत्र आदींचा अजून एक लाभ म्हणजे जरी आपल्या घरात अश्या लहरी निर्माण होत नसतील तरी, बाहेरून येणाऱ्या अश्या लहरींना अटकाव करण्याची ऊर्जा व शक्ती या अश्या सकारात्मक पठण इत्यादीमधून मिळते. याच प्रमाणे हेही लक्षात घ्या की, म्हणूनच परवचा वा स्तोत्र मंत्र इत्यादी, जे त्यावेळी म्हणायचे असते ते मोठ्या आवाजात म्हणावे. कारण ध्वनिमुळे निर्माण होणाऱ्या लहरी जास्त दूरपर्यंत व जास्त तीव्रतेने निर्माण होऊन जास्त परिणामकारक असतात. 

आपण बघतो की,  पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या विजेच्या प्रकाशापेक्षा, आवाजाची तीव्रता व भय जास्त वाटतं. कारण ध्वनी लहरी आकर्षण व प्रतिकर्षण अधिक तीव्रपणे करतात, विशेषतः त्या संध्याकाळात. म्हणूनच संध्याकाळी चमकणाऱ्या विजेची भीती जास्त वाटते. कारण कंपनं व लहरी यांना वाहून नेण्याची गती त्या काळात तीव्र असते. याचकारणाने संध्या समयी विशेष जरुरी सकारात्मक विचार आचार व उच्चार यांची असते. 

जर आपला स्तोत्र मंत्र इत्यादींवर विश्वास नसेल तरीही, त्या वेळेत नकारात्मक व चुकीचे विचार करण्यापेक्षा सकारात्मक वाचन मनन आणि चिंतन हे नक्कीच करू शकतो. शेवटी लहरींशी व कंपनांशी, त्याच परिभाषेत उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. ते वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा योग्य आहे. कारण संध्या समयी नकारात्मक विचार मनाचा व बुद्धीचा तीव्रतेने ताबा घेऊन कार्य करू शकतात. त्यावेळी त्यांची शक्ती ही अति प्रभावी असते.  म्हणूनच संध्या समयी वादविवाद, ओरडाआरडा इत्यादी टाळावं. अर्थात  इतरवेळी देखील वाद वा भांडणं गैरच आहे. पण त्याचा वातावरणावर परिणाम त्या संध्या काळात जास्त प्रभावी पणे होतो. म्हणून विशेष दक्षता घ्यावी.

उद्या अजून एका मुद्द्यावर बोलू पण तोपर्यंत नामात रहा, गुरूआज्ञा धरून रहा आणि सतत धनभारीत राहायचा प्रयत्न करा.
--------------------------------------

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 
गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...