Skip to main content

भोग आणि ईश्वर १२९

भोग आणि ईश्वर  १२९
 
मनाची सकारात्मक अवस्था टिकवणं हे नित्य करावं लागणारं कार्य नाही हे सर्वात प्रथम लक्षात घ्या. कारण सर्वसामान्यपणे प्रत्येकजण सतत निराश वा हताश वा निरुत्साही असेल असं नाही. मुळात यामध्ये आपली मनोवृत्ती बदलणं हे सर्वात प्रथम अपेक्षित आहे. जेंव्हा मन हे पाऱ्यासम असतं, तेंव्हाच ते परिस्थितीनुसार हेलकावे खातं आणि नित्य कोणत्याना कोणत्या प्रभावा खाली असतं. आलेल्या परिस्थितीला जुळवून वा टक्कर देऊन पुढे जाण्याची वृत्ती वा प्रवृत्ती ज्यांची असते, त्यांना परिस्थिती तील बदल फार फरक करत नाहीत.

या प्रकारात मी अजून एका वृत्तीच्या लोकांना मोजीन. ज्यांची साधनेवर आणि सद्गुरूंवर ठाम श्रद्धा असते असे कोणत्याही स्थितीला वा परिस्थितीला खंबीरपणे तोंड देतात आणि आपल्या साधनेवरील व सद्गुरुंवरील दृढ विश्वासाच्या जोरावर, मनाचं संतुलन राखून पुढे जात राहतात. त्या श्रद्धेचा,  विश्वासाचा भरभक्कम आधार मनाला बांधून ठेवतो आणि कोणत्याही वादळात मन द्विधा होत नाही.

मग बाकीच्यांनी काय करायचं हा प्रश्न उरतो. मुळात इथे काही गोष्टी लक्षात घ्या. मन हे निर्गुण निराकार आकाश आहे. बाह्य स्थिती म्हणजेच पर स्थिती ही त्या आकाशात वातावरणातील बदलाप्रमाणे काम करते. म्हणजे काय तर जर आकाश स्वच्छ व शांत असेल तर त्यात भीती, निराशा, दुःख, काळजी, चिंता यांचं चित्र निर्माण करून गर्मी अर्थात उष्मा किंवा उष्णता निर्माण करते, ज्यामुळे ऋण कण अर्थात निगेटिव्ह आयर्न निर्माण करते. ज्यामुळे पारा तप्त होऊन लगेच मनावरील ताबा सुटतो.

काहीजण या स्थितीत निराश वा हताश वा दुःखी होतात आणि विचारचक्र खुंटतं किंवा विचार तीव्रगतीने सुरू होतात. हे म्हणजे कमी वा उच्च रक्तदाबाप्रमाणे असतं.  म्हणून त्यावर त्यानुसार औषध दिलं जातं. तसंच मनालाही करणं गरजेचं आहे. कारण शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे सर्वजण स्थिर मती, स्थिर चित्त,अचल वृत्ती आणि ठाम विचार असतील असं शक्य नाही. जसं सर्वांनाच रक्तदाब असेल असं शक्य नाही, त्याप्रमाणेच. आता या दोन स्थिती, निराशा वा हाताशा वा दुःख यांनी विचारचक्र बंद होणं किंवा अतिजलद विचार सुरू होऊन मनात गोंधळ निर्माण होणं यावर  विचार करू.

दोन्ही स्थितीत, त्यावेळी शांतता महत्वाची असते. किंवा मनाला अतिजलद स्थितीतून सामान्य स्थितीत आणि निराशे तून सामान्य स्थितीत आणणं,  हा प्रथमोपचार महत्वाचा आहे. हा प्रथमोपचार झाला की,  ज्यांना ही स्थिती आल्यावर मनावरील नियंत्रण  जातं किंवा मन अकार्यक्षम होतं अश्या सर्वांनी हे लक्षात घ्या की, कोणतीही परिस्थिती जी समोर आली आहे, त्यात दोन शक्यता लक्षात घ्यायच्या. मी काही करू शकतो का व  काय करू शकतो. परिस्थिती बदलणं जर शक्य असेल तर त्या शक्यतेचा प्रथम विचार सुरू करावा. हे केल्याने मनाची स्थिती बदलून मन वेगळा विचार सुरू करेल.

जर मी काही बदल या स्थितीत करू शकत नसेल,  तर व्यर्थ चिंता करून मनाला कमकुवत बनवण्यात काहीही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. पहिल्या शक्यतेत खंबीर राहून आपल्या श्रद्धेवर विश्वासून, आपल्या सद्गुरूंना स्मरून जे आपल्या हाती जे आहे ते सुरू करावं. जर आपल्या हातात काही नसेल अर्थात परिस्थिती बदलणं शक्य नसेल तर सकारात्मक राहून, दृढ श्रद्धेने आपली साधना, त्याक्षणी सुरू करणं गरजेचं आहे.  हे करताना, आपल्या इच्छाशक्तीला कार्यरत करावं आणि मनाचा तोल त्यावर टिकवून ठेवावा. आपली श्रद्धा बरेचवेळा अशक्य ते शक्य करू शकते,कारण तेही एक बल वा फोर्स आहे, जे, त्या बाह्य स्थितीवर उलट बाजूने जोर लावून परिस्थितीत बदल करू शकतं. 

या प्रासंगिक गोष्टी झाल्या. पण मूळ वृत्ती वा त्वरित मनामध्ये होणारे नकारात्मक बदल कायमस्वरूपी बंद करण्यासाठी त्या मनाला आतून सशक्त करणं गरजेचं आहे. त्यासाठी नामरूप साधन वा औषधी कायमस्वरूपी गरजेची व उपयोगाची आहे. नित्य साधना आणि नामा वरील गाढ निष्ठा, कमजोर मनाला सबळ वा सशक्त बनवतं. मुळातच नित्य साधनेत व निष्ठावान असणाऱ्यांना कधीही दोलायमान राहायची गरज नसते आणि श्रद्धेत व साधनेत प्रत्यक्ष परमेश्वराला खेचून आणण्याची शक्ती असते, हे सूत्र ध्यानात ठेवून आपली मनःस्थिती नित्य सकारात्मक राखावी. 

आपण दोलायमान होतो म्हणजेच आपण द्विधा होतो म्हणजेच आपल्या मनात द्वैत आहे, याचा अर्थ आपली श्रद्धा, निष्ठा व विश्वास हा शंभरटक्के नाही. तो वाढवण्या वर भर दिला पाहिजे आणि आपण त्यासाठी करत असलेलं साधन वा नाम दृढपणे करून, त्या व्यतिरिक्त त्याआड येणारे  बाकी सर्व विचार ही माया अथवा मायेचा असर आहे हे ध्यानात घ्या. त्यामुळे जिथे माया आहे  तिथे द्वैत आणि जिथे मायेचा असर वा प्रभाव शून्य तिथे अद्वैत आहे. अद्वैत स्थितीतील मन हे कधीही आपली भावावस्था ढळू देत नाही. म्हणून द्विधा स्थिती वा द्वैत सोडून, साधनेतील अद्वैत मनात दृढ करा आणि निष्ठेने पुढे जा व जात रहा. 

उद्या अजून एका मुद्द्यावर बोलू पण तोपर्यंत नामात रहा, गुरूआज्ञा धरून रहा आणि सतत धनभारीत राहायचा प्रयत्न करा.

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 
-------------
गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...