Skip to main content

भोग आणि ईश्वर १२६

भोग आणि ईश्वर  १२६
 
मनावरील ऋणभार, धनभार,  त्याचं महत्व पाहिलं. यातील ऋणभार हा काही अंशी आपल्या मनाची स्थिती, काही अंशी घडणाऱ्या घटना,येणारी संकटं आणि या सर्वाला आपण त्या त्या क्षणी देत असलेला सकारात्मक वा नकारात्मक प्रतिसाद आणि प्रतिक्रिया, यावर अवलंबून आहे. पण घडणाऱ्या घटनांच्या किंवा प्रसंगांच्या संदर्भात ते आपल्या नियंत्रणा बाहेर आहे. कारण त्या घटना वा ते प्रसंग आपल्या हातून घडून गेलेल्या कर्माचं फलस्वरुप आहे. त्या कारणाने ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, पण आपणच भूतकाळात ते निर्माण केलं आहे, हे नक्की. 

पण यामध्ये आपल्या नियंत्रणातील गोष्ट म्हणजे या ऋण भाराला कमी करून, समतोल राखू शकणारा धनभार निर्माण करणं वा वाढवणं, ही आपल्या हातातील गोष्ट आहे. तेवढी निदान आपण करावी वा आपल्याकडून व्हावी. आता धनभार निर्माण करणाऱ्या घटना वा गोष्टी कोणत्या. तर सकारात्मकता वाढवणाऱ्या आणि मनाला प्रफुल्लित व प्रसन्न करणाऱ्या गोष्टी जसं नामजप, चांगली भक्तीरसपूर्ण वा भावगीत प्रकारातील गाणी, चांगली निसर्गदृश्य असलेली चित्र अथवा व्हीडिओ इत्यादी., 

मुळात आपण ऋणभारित आहोत हे कसं ओळखायचं. त्याचं मुख्य लक्षण म्हणजे आपण त्यावेळी निरुत्साही, हताश, निराश, नकारात्मक कल्पना व विचार यांनी भरलेले, एखादी गोष्ट करण्यास अनुत्सुक असे असतो. एखादी गोष्ट वा कोणी सांगत असलेला एखादा मुद्दा आपल्या कानावर पडत असतो पण आपण त्यावर विचार करण्याच्या मनःस्थितीत नसतो. अगदी आपल्याला कसलाच विचार न करता नुसतं बसून राहावंसं वाटतं, काम करण्याचा कोणताही मूड नसतो. अशावेळी नक्की समजावं की आपण ऋणभारित आहोत. 

मनाच्या या स्थितीला बॅलन्स अर्थात समतोल कसं करायचं हा विचारसुद्धा खरतर त्याक्षणी नको असं वाटतं. पण अश्याच वेळी, आपण स्वतःला जागं करून, समजावून धनभार अर्थात पॉझिटीव्हीटी वाढवली पाहिजे. यासाठी वर सांगितलेले अनेक मार्ग आहेत. परंतु त्यातील काहीही करण्याची इच्छा वा मनःस्थिती नसेल तर, निदान काहीकाळ, शक्य असल्यास, शांत बसून, डोळे मिटून, नुसतं श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि बाकी काही न करता शांतपणे बसून राहिलं तरी, त्या क्षणी निर्माण झालेला ऋणभार कमी होऊन, मनातील विवेक,विचार जागा होतो. त्यावेळी असलेलं नकारात्मक ढगांचं धुकं वा मळभ दूर होतं. 

ज्याप्रमाणे घरात उष्णता जास्त आहे असं वाटत असेल तर, आपण पंखा, वातानुकूलन, एक्झास्ट इत्यादी सुरू करतो. जे केल्यामुळे वातावरणातील उष्मा अर्थातच हवेतील ऋण भारित कण कमी होऊन धनभार वाढायला मदत होते. हवेचं जे तत्व आकाशात व अवकाशात आहे, तेच मनाच्या बाबतीत लागू होतं. त्याक्षणी तो ऋणभार कमी करणं गरजेचं असतं.  अगदी काही न करता,  शांत बसल्याने बराचसा उद्देश साध्य होतो. म्हणूनच अश्या स्थितीत कोणतीही प्रतिक्रिया वा प्रतिसाद हा घातक असतो. म्हणूनच म्हटलं जातं की,राग आल्यावर,  दहा आकडे मोजा इत्यादी. कारण त्यावेळी निर्माण झालेला अतिरिक्त ऋणभार निघून जाणं, जरुरी असतं. याचसाठी त्या स्थानाचा तात्पुरता त्याग करून, काही काळ दुसरीकडे जाऊन बसण्यानेसुद्धा, कार्य साधू शकतं. कारण आपल्या मनाप्रमाणे ते स्थानसुद्धा ऋणभारित झालेलं असतं. म्हणून हवेतील बदल मनासाठी आणि त्या स्थानासाठी खूप महत्वाचा असतो. 

यावर अजून पुढे चर्चा करू,आज इथेच थांबू.

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 
-------------
गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...