Skip to main content

भोग आणि ईश्वर १३२

भोग आणि ईश्वर  १३२
 
व्यसनाधीनतेच्या वाटेवर जाणं वा जावं लागणं आणि त्यापायी त्रास सहन करणं किंवा इतरांना त्रास देणं, हे सुद्धा प्रारब्धाचे भोग आहेत. व्यसनात गुरफटून गेलेली व्यक्ती, शारीरिक आणि त्याहीपेक्षा मानसिकरित्या, त्या व्यसना धीनतेच्या पूर्ण आहारी किंवा कब्जात गेलेली असती. म्हणजेच त्या व्यक्तीची मानसिकता, त्या व्यसन करण्यापायी लाचार होण्यापर्यंत खालच्या पातळीवर पोचलेली असते.  

अशी लाचारी परिस्थितीग्रस्त माणसालासुद्धा पत्करावी लागते, आर्थिक मदत वा हातउसाने मागताना. पण त्या वेळी त्या परिस्थितीने त्रस्त माणसाला मनात का होईना, याची जाण असते की, आपण जे करत आहोत ते परिस्थितीमुळे करत आहोत आणि ही लाचारी तात्पुरती आहे. त्यामुळे परिस्थिती बदलताच अशी व्यक्ती, पुन्हा सहसा मदतीसाठी याचना करत नाही.

व्यसनाधीन व्यक्ती, या सर्व भावनांच्या पलीकडे पोचलेली असते. नैतिक अनैतिक योग्य अयोग्य या सर्व संज्ञापलीकडे ती व्यक्ती पोचलेली असते. अश्या व्यक्तीला त्या पातळीवरून खाली आणणं गरजेचं आहे वा प्रथम उपचार म्हणावा लागेल.  अर्थात प्रश्न असा आहे की, सदर व्यक्ती ही व्यसनामुळे काही समजण्यापलीकडे गेलेली असल्यामुळे गैर आणि योग्य हे त्या व्यक्तीला सांगून काहीही फायदा नसतो.  परंतु एक प्रयत्न म्हणून दृढ इच्छाशक्तीचा वापर करता येईल का हे पहायला हरकत नाही. कारण जोपर्यंत त्याव्यक्तीच्या मनात भाव जागृत होत नाहीत, तोपर्यंत काहीही उपाय गैर आहे. 

त्यासाठी सदर व्यक्तीच्या जवळील वा परिवारातील व्यक्तीने, ज्या व्यक्तीला सुधारणा व्हावी अशी इच्छा आहे अश्या व्यक्तीने, ती इच्छा मनात धरून, मनात संकल्प करून, सकाळी लवकर किंवा पहाटे शुचिर्भूत होऊन, कोणत्याही सोमवार पासून २१ दिवस ओम नमः शिवाय, किंवा शनिवारपासून सुरू करून २१ दिवस ओम श्रीअंजनेय नमः किंवा ओम श्रीशनैश्चराय नमः हा मंत्र १०८ वेळा म्हणायचा आणि रोज एक माळ वाढवत जायची. यामध्ये हात जोडून, संकल्प पहिल्या दिवशी सोडायचा, तोही मनातच. तो संकल्प करत असताना इच्छाशक्ती दृढ हवी. म्हणून त्यासाठी पूर्ण एकाग्रता, त्या व्यक्तीबद्दलचे प्रेमभाव मनात धरून,कोणताही राग द्वेष वा इतर काहीही गैरभाव, अंशभरसुद्धा असता कामा नयेत.

जो दिवस वा मंत्र जो आपण निवडला असेल तो रोज सकाळी लवकर उठून आपला संकल्प आठवून, त्यायोगे एकाग्रता साधून २१ दिवस म्हणायचं आहे. यात पहिल्या दिवशी एक माळ करून  रोज १ एक माळ वाढवत जायची. म्हणजेच २१व्या दिवशी २१ माळा होतील. यात संकल्प जो योजयचा आहे तो साधारण असा असावा, 

"मी दृढसंकल्पाने पूर्ण एकवीस दिवस, चढत्या क्रमाने, निश्चयाने, मी योजलेला मंत्र या इच्छेने स्मरणार आहे, ज्यायोगे माझ्या इच्छाशक्तीच्या परिणामस्वरूप , माझ्या मनात असलेल्या व्यक्तीच्या व्यसनांच्या विळख्यातून, त्या व्यक्तीची सुटका होण्याची इच्छा जागृत व्हावी आणि त्या इच्छेच्या माध्यमातून ती व्यक्ती सुखरूप आणि पूर्णपणे बाहेर पडावी. त्यासाठी माझ्या इच्छा व आत्मशक्तीचे मला सहाय्य मिळुदे आणि मी योजलेल्या मंत्राची देवता व त्या देवतेची तारकशक्ती मला सहाय्यकारक होवो." 

हा संकल्प करून दृढ इच्छेने आणि सर्व आत्मशक्तीचं पाठबळ त्यामागे लावून हा संकल्पयोग पूर्ण करावा. आपल्या  स्वतःच्या दृढ इच्छाशक्तीच्या आधारावर कार्यसिद्धी होऊ शकेल. यात आपल्या मनात कोणतीही शंका वा किंतु येऊ न देता, श्रद्धापूर्वक हे करून पहा, नक्की कार्यसिद्धी होईल. 

उद्या एखादा नवीन मुद्दा घेऊन त्यावर चर्चा करू. तोपर्यंत नाम घ्या आणि ईश्वरस्मरण करत रहा. 
   -------------------------------------------------------------

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 

गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १(लेख १ ते ७६) " पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...