Skip to main content

भोग आणि ईश्वर १३७

भोग आणि ईश्वर  १३७
 
लहरींच्या कार्याचा पुन्हा एकदा थोडा विचार करूया, एका वेगळ्या अनुषंगाने. सर्व प्रकारच्या लहरी निर्माण होऊन आपल्या लक्षापर्यंत, त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार अर्थात फ्रिक्वेन्सीनुसार मार्गस्थ होतात. ज्या कमी क्षमतेच्या असतात त्या निर्माण होऊन फार दूर मार्गस्थ न होता, दुसऱ्या अति बलवान लहरींपुढे शरणागत होऊन, त्यामध्ये विरून जातात हे मागे आपण पाहिलं आहे. म्हणून आपण तीव्र इच्छाशक्तीने जे मनात योजू त्याच्या बलवान लहरी अंतराळात वा अवकाशात जाऊन, त्यासम वा तत्सम लहरींशी संयोग पाऊन  त्या संयोगातून निर्माण होणारी ऊर्जा, चेतना व बल प्राप्त करून आपल्या मूळ निर्माण स्थानाकडे उद्देशापूर्तीसाठी परत येतात. 

यातूनच त्या उद्देश प्राप्तीसाठीची मानसिकता आणि आत्म शक्ती सदर व्यक्तीच्या अंतरंगात जागृत होऊन, महत्तम कार्य घडतात. यामध्ये त्या व्यक्तीला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. किंबहुना सदर व्यक्तीच्या इच्छेच्या बलानुसार,त्या लहरींकडून येणारी प्रतिक्रिया असल्यामुळे, त्याचं श्रेय खचितच त्या व्यक्तीचं असतं. यात आपल्या पूर्वकर्माच्या अर्थात संचिताचा हातभार नक्कीच असतो. कारण समसमान बल निर्माण करणाऱ्या दोन व्यक्तींच्या तीव्र इच्छा फलद्रुप होतीलच असं नाही.

याचं कारण म्हणजे सदर व्यक्तीच्या संचितातील नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी कर्मफलं, जर त्याचवेळी परिपक्व झाली तर, इच्छाशक्तीने निर्माण झालेल्या लहरी व सदर लहरींना मिळणारा प्रतिसाद यात, अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याच्या परिणामस्वरूप, कार्यात कमी यश वा अपयश वा कार्यनाश हे आपल्याला दिसून येतं. यावर दोन उपाय आहेत. एक आपली त्या लक्षाप्रत जाण्याची इच्छा व इच्छा बल कुठेही कमी पडणार नाही, यासाठी सतत जागृत राहून कार्य करणं. 

कदाचित अश्या अडचणी या लहरीं स्वरूपात न येता प्रसंगस्वरूपात येतात. अश्या वेळी धीर खचणे, मार्ग चुकणे, मनाचा वेग व बल कमी होऊन कार्यामागची इच्छाशक्ती दुर्बल वा क्षीण होणं, या गोष्टी संभवू शकतात. अश्याच प्रसंगात मानवाची, मानवी मनाची, आत्मबलाची खरी कसोटी असते. अश्याच प्रसंगांसाठी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली आहे. त्यातील प्रत्येक श्लोक हा अश्या प्रसंगात धीरोदात्त राहण्याचा व पथभ्रष्ट न होण्याचा मार्ग व प्रकाश दाखवतो.  

दुसरा मार्ग जो थोडा श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे, त्यावर आज चर्चा करूया. आपण खूप वेळा वाचतो, आपल्या पुराणात, वेदांमध्ये विशिष्ट देवतांची वा देवींची उपासना, स्तोत्र, मंत्र इत्यादी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे केल्यास कार्यसिद्ध होऊ शकतं, किंवा मार्गातील संकटं वा विघ्न दूर होतात. मुळात हे आहे काय ते आधी बघूया. परमेश्वराने सर्व ब्रह्मांड निर्माण करताना मानव या प्राण्याची, कर्मगतीच्या फेऱ्याची आणि त्या चक्रान्वये जीवाच्या उद्धाराची निसर्गनिर्मित प्रणाली निर्मिली अर्थात प्रोग्रॅम निर्माण केला. 

त्यावेळीच त्यातून पथभ्रष्ट झालेल्या जीवांना मार्ग व प्रकाश मिळावा यासाठी काही उर्जास्थान, चेतानाशक्ती वा लहरींची केंद्रस्थानं निर्माण केली. ही केंद्रस्थानं हा त्या प्रोग्रॅम अर्थात प्रणालीचाच एक भाग आहे हे लक्षात घ्या. एक लक्षात ठेवा प्रत्येक कुलुपाला चावी ही संकल्पना मुळात विधात्याचीच आहे. म्हणजेच प्रत्येक चक्रासाठी चक्रभेद वा प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर असं त्याचं स्वरूप आहे.

कारण एक नक्की आहे की, विज्ञान म्हणतं त्याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीमागे कारणमीमांसा, तर्कसंगती, गणितीय समीकरण नक्कीच आहे. कोणतीही गोष्ट ईश्वराने अकारण, अहेतुक व विनाउद्देश निर्माणच केली नाही. या कारणांचा शोध व वेध घेऊन त्यांची शास्त्रीय मांडणी वेदशास्त्र इत्यादींमधून मांडण्यात आली आहे. याचा खरतर शोध लागला आहे, फक्त विज्ञान त्यांना नव्याने तंत्र स्वरूपात व सर्वांना समजेल आणि लक्षात येईल, अशा स्वरूपात मांडत आहे, असं माझं मत आहे आणि हे काळाला सुसंगतच आहे. 

मात्र त्यांचा विध्वंसक उपयोग होऊ नये यासाठी, शास्त्र व वेदमंत्र या सांकेतिक स्वरूपात ते मांडण्यात आलं. तरीही याचा विध्वंसक उपयोग असुरशक्तींनी आणि महाभारत युद्धात दुर्योधनादी वीरांनी केलाच. पण याचा खरा चेहरा स्पष्टपणे दिसला तो,  ज्यावेळी सदर अस्त्राचा दुरुपयोग अश्वत्थामाने पांडवांविरुद्ध करून, उत्तरेच्या गर्भातील पुत्राचा वध करण्याचा प्रयत्न केला. खरतर संपूर्ण महाभारत अश्या अनेक शास्त्रीय व वैज्ञानिक घटनांचा महासागर आहे.  यावरसुद्धा कधीतरी दीर्घ लेखमाला लिहायचा मानस आहे. बघू कधी योग येतो.

पण आजचा विषय आणि दुसरा मार्ग यावर उद्या चर्चा करूया. तोपर्यंत नाम घ्या, गुरुस्मरण करा आणि शक्तीचक्र वा बलचक्र निर्माण करा. (शक्तीचक्र म्हणजे काय यावर आताचा विषय संपला की त्यापुढील भागात चर्चा करूया). 

 -------------------------------------------------------------

लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...