Skip to main content

भोग आणि ईश्वर १४८

भोग आणि ईश्वर  १४८
 
 खरतर नाममार्गी झाल्यानंतर सर्व भोगांचा दुःखांचा आणि चिंतांचा अंत व्हावा किंवा होईल अशी धारणा असते. म्हणजे मी नाम घ्यायला सुरुवात केली म्हणजे आता कोणतीही संकटं मला त्रास देता कामा नयेत आणि जर संकटं आलीच तर मग नाम घेण्यात काय अर्थ असा एक समज वा अपसमज असतो. 

मुळात इथे एक लक्षात घ्या नाम हा सौदा नाही किंवा व्यवहार नाही की, इस हात लो और उस हात दो. मुळात परमार्थ हा व्यवहाराच्या विरुद्ध आहे किंवा असतो आणि व्यवहाराचे नियम इथे उलट लागू होतात. म्हणजे इथे एकमार्गी देणं फक्त ज्ञात असलं पाहिजे, एखाद्या साधकाला वा भक्ताला. पण आपण काही अपेक्षा ठेवता कामा नयेत. हा झाला पहिला नियम वा निकष, खरा नाममार्गी असण्याचा. दुसरं इथे केलेल्या कर्माचं मोजमाप होता कामा नये. किंवा करता कामा नये. 

कारण व्यवहारातील आणि कालचक्रातील कर्म सिद्धांत सांगतो की कर्म कर फ़ल मिळेल, पण कधी ते माहीत नाही, इतकंच. पण भक्ती, नाम साधना या संज्ञा सर्व परिमाणं आणि सिद्धांत यांच्यापलीकडे असल्यामुळे आणि तिथे आपल्या इष्टदेवतेच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असल्यामुळे त्या मार्गात मोजमाप चालत नाही. 

तिथे फक्त विधाता, जो सर्व मार्गांचा शेवटचा टप्पा आहे, तो विधाता प्रसन्न होणं आणि त्याच्या कृपेला पात्र होता येणं, हेच अंतिम उद्दिष्ट असल्याने, त्यात भक्तीचं आणि साधनेचं मोजमाप करण्याचा संबंध येतच नाही. प्रभूंच्या एका कृपा कटाक्षाने जन्मजन्मांचे  पापांचे पर्वत उन्मळून पडणार असल्यामुळे, आपण फक्त आणि फक्त साधना करत जायचं. 

एक उदाहरण देतो, अर्जुनासह पांडव कृष्णाचे भक्त आणि द्रौपदीसह सर्व पांडव व कुंतीसुद्धा कृष्णाच्या नामात नित्य 
रममाण असूनसुद्धा पांडवांनी कृष्णाकडे आपल्या आयुष्यातील त्रासाच्या, दुःखाच्या व वनवासातील कष्टांचा एक अंश मात्र सुद्धा कमी वा वर्ज्य करून मागितला नाही. कृष्णाने एकदाही याबाबत त्यांना आश्वासन दिलं नाही. 

पण तरीही प्रत्येक संकटात, अडचणीत तो कोणत्या ना कोणत्या रुपात समोर येऊन मदत करता झाला, न सांगता व न मागता. प्रत्यक्ष महाभारत युद्धात वा युद्धाची पार्श्वभूमी तयार होण्याच्या कार्यकाळात कृष्ण ठामपणे व खंबीरपणे पांडवांचा पक्ष घेऊन उभा ठाकला. युद्धाच्या प्रसंगी अर्जुन द्विधा मनःस्थितीत असताना युद्ध थांबवून अर्जुनाला गीतारुप उपदेश करून, त्याला युद्धासाठी मनाने आत्म्याने खंबीर बनवून युद्धसज्ज केलं. 

युद्ध त्याच्या करवीच करून घेतलं, त्याला प्रत्यक्ष त्यात सर्वस्व  ओतायला लावलं. प्रत्यक्ष आपला भाचा अर्थात अर्जुनपुत्र अभिमन्यू कामी येणार हे माहीत असूनही युद्ध घडवलं आणि पांडवांना प्रयत्नपूर्वक यश प्राप्त करून दिलं. प्रसंगी आपण रथावरून उतरून सुदर्शनचक्र काढून भीष्मांवर चाल केली, हे जाणूनसुद्धा की आपण या कृतीद्वारे आपलीच प्रतिज्ञा मोडत आहोत. तरीही पर्वा न करता प्रतिज्ञाभंगाचा आरोप शिरावर घ्यायची तयारी ठेवली. 

यातून एक बोध नक्की आहे की अर्जुनासारखी निस्सीम व निरिच्छ भक्ती केल्यास, प्रभू स्वतः आपले नियम मोडून सुद्धा भक्ताला सहाय्य करू शकतात. म्हणून नामात साधनेत ती निरिच्छता प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं, हेच ध्येय असावं, असलं पाहिजे, असुदे. तरच नामाची खरी अनुभूती मिळेल. अन्यथा एक तक्रार सतत येत राहील नामात गोडी येत नाही वा मध्ये मध्ये मन लागत नाही.

यावर अजून उद्या पुढे बोलूया. पण तोपर्यंत तरीही नाम घ्या आणि नामात रहा. 

भोग आणि ईश्वर या पुस्तकाची आगाऊ नोंदणी केलेल्या सर्वांची पुस्तकं उद्या रवाना होतील आणि त्यांना त्याचा तपशील उद्या किंवा परवा त्यांच्या व्हाट्सअप्पवर देण्यात येईल. 

अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...