भोग आणि ईश्वर १२४
काल घेतलेल्या, कोविशील्ड लसीचा परिणाम सकाळी जाणवायला लागलाय. पण तो त्रास वाढण्याआधी ही पोस्ट लिहून पूर्ण करतोय. त्यामुळे जर काही चुका राहिल्या तर ते एकाग्रतेच्या अभावामुळे आहे, असं समजून, योग्य करून घेणे, ही विनंती.
मन हे तरल, प्रवाही तरीही शक्तीस्वरूप, उर्जास्वरूप आहे. ही शक्ती वा ऊर्जा मनाकडे येते कुठून असा एक प्रश्न निर्माण होतो. मुळात मनाची तुलना अवकाशाशी होते, असं मागे म्हणालो होतो. त्याप्रमाणे अवकाश हे तत्व त्यातील भाराने प्रभावित होऊन त्यानुसार कार्य करतं.
म्हणजे उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेने तप्त होतं, पावसाळ्यात काळ्या ढगांनी आच्छादित होऊन पाऊस आणि बाष्प यांनी युक्त होऊन, पावसाची बरसात करतं आणि थंडीत प्रफुल्लता आणि प्रसन्नता यांनी युक्त होऊन आपल्या मनाला आल्हादीत करतं.
त्याचप्रमाणे मन सुद्धा अवकाश तत्वाप्रमाणे रिक्त आणि रिक्त जागा भरण्यायुक्त असल्यामुळे, त्यात नेहमी काहीना काही भार हा भरला जातो. त्या भाराच्या गुणाप्रमाणे मनाचे विचार प्रभावित होऊन, आपल्या जागृत मन पटलावर उमटतात. ज्याला आपण आपले विचार म्हणतो. हा भार वा प्रभाव मनातील अमर्याद खोलीमुळे नेहमी प्रभावित राहतो वा असतो.
म्हणूनच मनाला सतत काहींना काही छंद, नाद, विचार वा भार लागतो. अन्यथा रिकाम्या अवकाशातील अनेक स्थित्यंतराप्रमाणे येथेही वादळे, वर्षा, वाळवंटातील प्रचंड उष्मां इत्यादी परिस्थिती निर्माण होऊन ते भावनांच्या रुपात बाहेर पडतं. ज्यांच्या मनाच्या अवकाशात पोकळी जास्त असते त्यांच्या मनात आंदोलनं आणि हेलकावे जास्त होतात. त्यांना आपण अनेक मतांनी प्रभावित होतो असं जाणवतं, पण उपाय सुचत नाही. तर काही व्यक्ती प्रखर वादळात आपलं मन खंबीर ठेवू शकतात.
यामागे शास्त्र आहे, कदाचित भौतिकशास्त्र असेल. मुळात मनातील आंदोलनं वा हेलकावे आणि त्याद्वारे येणारे विचार आणि घडणाऱ्या कृती, या मनावर असलेल्या ऋण वा धन अर्थात negative वा positive भारामुळे घडतं. ज्या ठिकाणी या दोन्हींचा अभाव अथवा समतोल असतो, म्हणजे नुट्रल स्थिती असते, त्या मनात या दोन्ही भारांचा प्रभाव फार कमी जाणवतो आणि जाणवला तरी तो कृतीच्या पातळीवर येत नाही.
अश्या मनाचे मालक हे प्रारब्धात तसं वरदान आपल्या पूर्वकर्माने घेऊन आलेले असतात. ते कणखर मनाचे असतात. यांना मनातील आंदोलनं हाताळणं, सहज नाही, पण प्रयत्नपूर्वक साध्य होतं.
याव्यतिरिक्त बाकीच्यांना हा नुट्रल योग साधण्यासाठी सतत सकारात्मक अर्थात धनभार वाढता ठेवून मनाचा ताळमेळ ठेवत जाणं हे साधावं लागतं. यात पुन्हा दोन प्रकार आहेत.
त्रास वाढतोय त्यामुळे एकाग्रता येत नाहीये, त्यामुळे आज इथेच थांबू, पुढील भाग उद्या पाहूया. नाम घेत रहा, सद्गुरू स्मरण करत रहा आणि सकारात्मक रहा.
भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा.
-------------
गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल.
सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.
पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809 वर त्याचा तपशील पाठवावा.
G Pay no 9049275866
IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale
A/c No. 0455104000227179
IFSC : IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201
Phonepay id : 9049275866@ybl
पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले.
9049353809
9960762179
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment