Skip to main content

भोग आणि ईश्वर १३८

भोग आणि ईश्वर  १३८
 
मंत्र आणि स्तोत्र यांचा वापर पुराण काळापासून मानवाच्या उद्धारासाठी, सकारात्मक लहरी उत्पन्न करून त्यायोगे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. मुळात हे मंत्र, स्तोत्र इत्यादी, आत्मोद्धार करून ईश्वरीय चेतनाशक्तीशी तादात्म्य पावून वा एकरूप होऊन आपल्या जन्माचं कायमस्वरूपी सार्थक करून, आत्मोन्नत्ती साधण्या साठीच ब्रह्मदेव वा इतर ऋषीमुनी यांच्या माध्यमातून विधात्याने निर्माण केले आहे. हे मूळ तत्व लक्षात घेतलं तर, अनेक गोष्टी आपोआप तर्कसंगत वाटत जातात आणि त्यांचा लाभ करून घेण्याची इच्छा उत्पन्न होऊ शकते. हा आहे, त्याचा व्यापक आणि आत्महेतु साध्य करण्यासाठीचा मार्ग आणि उद्देश. 

परंतु, वेदशास्त्र पुराणं यातून मांडलेला मंत्र , स्तोत्र श्लोक आदिद्वारे पवित्र मंगलमय लहरी उत्पन्न करून आपल्या इप्सिताला वा इच्छेला आपल्या संचितातील मर्यादित शक्तीमुळे अपुरं पडणारं पाठबळ मिळवणं, हा मर्यादित अर्थसुद्धा आहेच. मुळात खूपवेळा आपल्याला प्रश्न पडतो की, हे मंत्र, श्लोक, स्तोत्र इत्यादीनी काय साध्य होणार. कदाचित यामागची शास्त्रीय संगती, पार्श्वभूमी व कारणमीमांसा माहीत नसल्या मुळे आपण मुळातच हे स्तोत्र,मंत्र व श्लोक पठण मर्यादित स्वरुपात व बरेचवेळा उपचार म्हणजे फॉर्मलिटी म्हणून वापरतो वा म्हणतो.

या मागचं तर्कशास्त्र जाणून घेतल्यानंतर, आपण त्याचा योग्य कार्यार्थ, सदहेतुप्रित्यर्थ वापर नक्कीच करू शकतो. खरतर प्रत्येक क्षण आपण कर्मरत असतोच असतो. कर्म, चिंता, काळज्या इत्यादी क्षणक्षण आपल्या सोबत असतात. काही जणांना पूर्वसुकृतामुळे असेल, पण कणखर मन व प्रबळ इच्छाशक्ती प्राप्त असते. हे संचितानुसार त्यांना, एकप्रकारे वारसाहक्कासारखं प्राप्त असतं. परंतु ज्यांना ही प्रबळ इच्छाशक्ती प्राप्त नाही आणि तरीही कर्म करत राहून जीवनात पुढे जायचं आहे, त्यांना इच्छित आत्मबल प्राप्ती साठी, एखादी supportive system म्हणून वा उपचार म्हणजेच helping hand म्हणून किंवा एक trusted app म्हणून ह्या मंत्रादी साधनांचा उपयोग होऊन, आपल्या अपुऱ्या इच्छाशक्तीच्या वृद्धीसाठी वापरात नक्कीच आणता येतील. 

यात एक आक्षेपाचा मुद्दा असाही येऊ शकतो की, व्यावहारिक दृष्टीने अश्या साधानांचा उपयोग हा दुरुपयोग नाही का. तर यावर माझा तर्क व तार्किक उत्तर असं आहे. पुराणकाळापासून सूर व असुर यांसह मानवानेसुद्धा या मंत्र, स्तोत्र शक्तींचा वापर आपापल्या उद्देशांसाठी केला आहे. त्यामध्ये त्यांना पूर्णतः ते मर्यादित यश प्राप्त झालं आहे. विधाता हा स्वनिर्मित व्यवस्थेने ब्रीदबद्ध असल्याने, जे जे या साधनांचा वापर करून, त्यात यश व ध्येयप्राप्ती करतील, त्या सर्वांना इच्छित वर, दान करता झाला आहे. त्यानुसार त्या त्या सूर असुर व मानव यांनी त्याचा सदुपयोग वा दुरुपयोग केला. 

जिथे सदुपयोग केला गेला, तिथे विधाता त्या त्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभा राहून, रक्षणकर्ता झाला. जिथे दुरुपयोग झाला, तिथे त्यांना सुधारण्याची संधी, सूचना देऊन, तद्नंतर त्यांना मृत्युदंडापर्यंत  उचित शासन देण्यात विधात्याने मागेपुढे पाहिले नाही. म्हणजेच इतकी चोख व्यवस्था विधात्याने रचलेली असल्यामुळे, जर त्याचा अयोग्य गोष्टींसाठी वा उद्देशांसाठी वापर होत असेल तर, सदर व्यक्तीस त्याच्या कर्मानुसार व कर्मफल सिद्धांतानुसार योग्य ते फल मिळेल हे नक्कीच. 

पण आपण त्या साधनांचा वापर आपल्या सद् इच्छा आणि आत्मिक शक्ती वृद्धीसाठी जर करत असू तर, यात आपण हानीकारक काही करतच नाही. म्हणून आणि म्हणजेच या स्तोत्र मंत्र इत्यादींचा योग्य तो उपयोग, आपलं धैर्य, मनोबल आणि त्याद्वारे इच्छाशक्ती वृद्धीसाठी केल्यास, आपल्या चांगल्या इच्छा व सकारात्मक उद्देश नक्कीच साध्य होऊ शकतात. 

विषय अजून अपूर्ण आहे. पण आज इथेच थांबू. उद्या पुन्हा सुरू करू, तोपर्यंत नामात रहा, साधनेत रहा, गुरूआज्ञेत रहा. शक्तीचक्र वा बलचक्र निर्माण करा. (शक्तीचक्र म्हणजे काय यावर आताचा विषय संपला की त्यापुढील भागात चर्चा करूया). 

 -------------------------------------------------------------

लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, ज्यांनी आगाऊ रक्कम भरून नोंदणी केली आहे त्यांना, पुस्तकं लवकरच वितरित केली जातील. आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिला साठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...